शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिमांनी मूलनिवासींसोबत संवाद वाढवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 01:39 IST

मुस्लिमांना नेहमीच आतंकवादी कारवायात गोवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. परंतु मुस्लिम हे आतंकवादी नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघच आतंकवादी कारवाया घडविण्याचे काम करते...

ठळक मुद्देमौलाना खलिलुल रहेमान सज्जाद नोमानी : राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचा भव्य मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुस्लिमांना नेहमीच आतंकवादी कारवायात गोवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. परंतु मुस्लिम हे आतंकवादी नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघच आतंकवादी कारवाया घडविण्याचे काम करते. या षड्यंत्राविरुद्ध सावध होऊन मुस्लिम बांधवांनी आपल्यावरील अत्याचार दूर करण्यासाठी एस. सी, एस. टी, एन. टी. ओबीसी या मूलनिवासींसोबत संवाद वाढवावा, असे प्रतिपादन आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य मौलाना खलिलुल रहेमान सज्जाद नोमानी यांनी केले.राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्यावतीने कस्तूरचंद पार्कच्या मैदानावर आयोजित पूर्व विदर्भस्तरीय जलस्यात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम होते. व्यासपीठावर जागतिक लिंगायत परिषद कर्नाटकचे कोरणेश्वर स्वामी, माजी पोलीस महासंचालक एस. एम. मुश्रीफ, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे राष्ट्रीय प्रभारी प्रा. विलास खरात, सुखदेव जानोरकर, गुरुद्वाराचे पूर्व प्रधान मलकित सिंग बल उपस्थित होते. नोमानी म्हणाले, भारतात अत्याचाराने सीमा गाठली आहे. मुस्लिमांनी केवळ नमाज न पढता समाजातील अत्याचार झालेल्यांशी नाते जोडण्याची गरज आहे. माजी पोलीस महासंचालक एस. एम. मुश्रीफ म्हणाले, आयबी ही गुप्तचर संघटना ब्राह्मणांनी काबीज केली असून हेमंत करकरे यांनी मालेगावच्या स्फोटात हिंदू संघटना असल्याची बाब उघडकीस आणली. परंतु करकरेंनाच संपविण्याचे काम या हिंदू संघटनांनी केले. मलकित सिंग बल म्हणाले, देशाला अंतर्गत शक्तींपासून धोका आहे. सर्व धर्मांना एकमेकांशी लढवत ठेऊन आपला स्वार्थ साधणाºयांविरुद्ध सावध होण्याची गरज आहे. कोरणेश्वर स्वामी यांनी ब्राह्मणांनी लिंगायत धर्मावर अत्याचार केल्यामुळे वेगळा धर्म स्थापन करण्यात आल्याचे सांगून सर्वांना ब्राह्मणवादाविरुद्ध एकजूट होण्याचे आवाहन केले. प्रा. विलास खरात यांनी त्रस्त लोकांना एकत्र करण्याचे काम राष्ट्रीय मुस्लिम मोर्चातर्फे करण्यात येत असल्याचे सांगितले.सुखदेव जानोरकर यांनी लोकांपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचल्या नसताना हा कोणता विकास आहे, असा प्रश्न उपस्थित केला. भोपाळच्या भिक्खूणी संघमित्रा यांनी राष्ट्रीय एकता जोपासून देश भ्रष्टाचारमुक्त करण्याचे आवाहन केले. अकिल मिर्झा यांनी अत्याचार करणाºयांना रोखण्याचे आवाहन केले.हमीमुल्ला कासीम यांनी मुलनिवासींना वेगवेगळे करून देशा बाहेरील लोक सत्ता भोगत असल्याचे सांगितले. डॉ. वंदना बेंजामीन यांनी एकता हाच एकमेव पर्याय असून प्रत्येकाने संविधानानुसार वाटचाल करण्याचे आवाहन केले. आभार रहमत अली यांनी मानले.एससी, एसटीला हिंदू समजू नका : वामन मेश्रामअनुसूचित जाती, जमातीला ब्राह्मणांनी स्पर्शही न करता येणारी जमात म्हणून घोषित केले. तरीही मुस्लिम बांधव आदिवासी, एससी समाजाला हिंदू समजतात. साडेतीन टक्के ब्राह्मणात इतरांचा समावेश झाल्यामुळे ब्राह्मणांची संख्या ७८ टक्के झाली असून ते बहुसंख्य होऊन इतरांवर राज्य करीत आहेत. प्रत्यक्षात पंतप्रधानच काय तर गावचा सरपंच होण्याची त्यांची पात्रता नाही. मोदींनी ओबीसी मुलांची शिष्यवृत्ती बंद करून त्यांच्यावर अन्याय केला. आम्ही मुस्लिमांसोबत मिळून याविरुद्ध लढाई लढवू इच्छित आहोत. मूलनिवासींना सहा हजार जातीत विभागणाºया ब्राह्मणांपासून सावध होऊन मुस्लिमांनी काँग्रेस, भाजपाशिवाय अन्य पर्याय उपलब्ध करण्याचे आवाहन मेश्राम यांनी केले.