शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मनपा निवडणूक पुढे जाण्याची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 12:24 IST

२०१७ च्या निवडणुकीसाठी ऑक्टोबर २०१६ पर्यंत महिला-पुरुषांसाठी आरक्षित जागांची सोडत काढण्यात आली होती. प्रभाग रचना निश्चित झाली होती. यावर्षी ही प्रक्रिया दीड महिना उशिराने होत आहे. निवडणूक आयोगाने तत्परता न दर्शविल्यास या प्रक्रियेला विलंब होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होणे अपेक्षित आहे. मात्र, अद्याप प्रभागरचनेचा कच्चा आराखडा मंजूर झालेला नाही. त्यात सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली आहे. याचा विचार करता महापालिका निवडणुका ठरलेल्या तारखांना न होता पुढे जाण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्याने विविध राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. यामुळे फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणाऱ्या निवडणुका मे महिन्यात होतील. असा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही.

वर्ष २०१७ च्या निवडणुकीसाठी ऑक्टोबर २०१६ पर्यत महिला व पुरुषांसाठी आरक्षित जागांची सोडत काढण्यात आली होती. प्रभाग रचना निश्चित झाली होती. परंतु या वर्षी ही प्रक्रिया दीड महिना उशिराने होत आहे. निवडणूक आयोगाने तत्परता न दर्शविल्यास या प्रक्रियेला विलंब होणार आहे. परिणामी निवडणूक लांबणीवर पडेल. मार्च, एप्रिल महिन्यात परीक्षा असतात. याचा विचार करता मे महिन्यात निवडणुका होतील, असा पदाधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

यासंदर्भात निवडणूक विभागातील अधिकारी बोलण्याचे टाळत आहे. मनपाने ३ डिसेंबरला प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे. यावर आक्षेप व सूचना मागविल्या नंतर अंतिम आराखडा जाहीर केला जाईल. सोडतीसोबतच निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित होईल. 

प्रभाग पद्धतीतील बदलामुळे विलंब

राज्य सरकारने आधी एक सदस्यीय पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रभागरचनेचा आराखडा करण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र नंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन सदस्यीय पध्दतीने निवडणूक घेण्याचा निर्णय झाला. यामुळे प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याला दीड महिना विलंब झाला. त्यात नगरसेवकांची संख्या १५१ वरून १५६ करण्यात आली. तर प्रभागही ३८ वरून ५२ झाले.

ओबीसी आरक्षणाचे सावट

ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. परंतु भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेसह सर्वच पक्षांना ओबीसी आरक्षणावर निवडणूक लढवायची आहे. अशा परिस्थितीत सर्वच पक्ष यातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहे. यामुळेही निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका