शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

महानगरपालिकांनी महसुलाचे स्रोत वाढवावे : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 20:56 IST

राज्यातील अनेक महानगरपालिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्य शासन विविध माध्यमातून पाच हजार कोटींहून अतिरिक्त अनुदान महानगरपालिकांना देत आहे. मात्र महानगरपालिकांनीदेखील आपले आर्थिक स्रोत वाढविण्याची आवश्यकता आहे. ४० टक्के चल संपत्तीवर कुठलाच कर घेतल्या जात नाही. सर्व संपत्तीवरील कर शंभर टक्के वसूल झाला तर महानगरपालिकांची आर्थिक अडचण बऱ्याच अंशी दूर होईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शनिवारी नागपुरात १६ व्या महाराष्ट्र महापौर परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्दे१८ व्या महाराष्ट्र महापौर परिषदेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील अनेक महानगरपालिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्य शासन विविध माध्यमातून पाच हजार कोटींहून अतिरिक्त अनुदान महानगरपालिकांना देत आहे. मात्र महानगरपालिकांनीदेखील आपले आर्थिक स्रोत वाढविण्याची आवश्यकता आहे. ४० टक्के चल संपत्तीवर कुठलाच कर घेतल्या जात नाही. सर्व संपत्तीवरील कर शंभर टक्के वसूल झाला तर महानगरपालिकांची आर्थिक अडचण बऱ्याच अंशी दूर होईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शनिवारी नागपुरात १६ व्या महाराष्ट्र महापौर परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.वनामती येथील सभागृहात झालेल्या या परिषदेला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी, आ.सुधाकर देशमुख, आ.जोगेंद्र कवाडे, आ.सुधाकर कोहळे, मुंबईचे महापौर व परिषदेचे अध्यक्ष विश्वनाथ महाडेश्वर, नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, संयोजक रणजित चव्हाण, उपमहापौर दीपराज पार्डीकर, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, विभागीय आयुक्त संजीवकुमार, मनपा आयुक्त रवींद्र ठाकरे, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, मनपा स्थायी समिती अध्यक्ष विक्की कुकरेजा, मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे प्रामुख्याने उपस्थित होते. २१ व्या शतकात सर्वात मोठे आव्हान हे अस्तित्वाचे आहे. पुढील १०-२० वर्षात जगाचे तापमान दोन अंश सेल्सिअसने वाढणार असून त्याचा परिणाम जीवसृष्टी, दुष्काळ व पाणीटंचाई या रूपाने दिसेल. या संकटावर मात करण्यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करणारी व्यवस्था उभी करावी लागेल. शहराची वाढती लोकसंख्या पाहता शहरातील सांडपाणी व दळणवळण व्यवस्था शहरांना प्रदूषित करणारी ठरणार आहे. यासाठी घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी विकेंद्रीकरण गरजेचे आहे. महापालिकांनी आपल्या उत्पन्नाचे स्रोत निर्माण करून शहराच्या शाश्वत विकासावर भर द्यावा. तसेच शहरांमधील दळणवळणाची व्यवस्था ही पेट्रोल व डिझेलपासून मुक्त व्हावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. परिषदेदरम्यान लक्ष्मणराव लटके यांनी लिहिलेल्या ‘सारथी’ या पुस्तकाचे तसेच नंदा जिचकार यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन करण्यात आले. दयाशंकर तिवारी यांनी संचालन केले तर रणजित चव्हाण यांनी आभार मानले.तर महापौरांना खर्च करण्याचा अधिकारमहापौरांच्या आर्थिक अधिकाराबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, नियमितपेक्षा अतिरिक्त उत्पन्न वाढविल्यास अतिरिक्त उत्पन्नाच्या दहा टक्के निधी खर्च करण्याचा अधिकार महापौरांना देण्याची शासनाची तयारी आहे. मनपा अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचा अधिकार महापौरांना आहे. मात्र यात सुसूत्रता असावी, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.विकास आराखडे मंजुरीत लेटलतिफीवर गडकरींची नाराजीयावेळी नितीन गडकरी यांनी विकास आराखड्याच्या मंजुरीला होत असलेल्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली. महानगरपालिकांमध्ये ही सर्वात मोठी समस्या असते. ३०-३० वर्षे विकास आराखडा मंजूर होत नाही. अनधिकृतपणे विकास झाला की मग विकास आराखडा मंजूर होतो. त्यामुळे शहराच्या विकासावर परिणाम होतो. यातूनच झोपडपट्ट्या वाढतात. त्यामुळे वीज, पाणी आणि रस्ते, दळणवळण व्यवस्था या बाबीची पूर्तता केल्यानंतरच विकास आराखडा मंजूर केला जावा. महापालिकेचे उत्पन्न कमी असले तरी विविध मार्गाने उत्पन्न वाढविण्याची संधी महानगरपालिकांना उपलब्ध आहे, असे गडकरी यांनी सांगितले.आता काचमिश्रित रस्तेपर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी महानगरपालिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन गडकरी यांनी केले. नागपुरात आम्ही ‘इथेनॉल’वर चालणाऱ्या बसेस सुरू केल्या होत्या. मात्र मनपाच्या उदासीनतेमुळे ‘बस आॅपरेटर’ने पळ काढला. गंभीरतेने विचार करून राज्यातील महानगरपालिकांनी ‘इथेनॉल’वर चालणाऱ्या बसेस सुरू कराव्यात. घनकचरा व्यवस्थापनाचा मोठा प्रश्न असला तरी यावर उपाययोजना करणे कठीण नाही. दहा टक्के प्लास्टिक, दहा टक्के रबर, दहा टक्के काचमिश्रीत रस्ते तयार करण्यास केंद्र सरकार मंजुरी देणार असून यामुळे शहराचा रस्ते विकास तर होईलच सोबतच घनकचऱ्याचा प्रश्नदेखील मार्गी लागेल, असेदेखील गडकरी यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMuncipal Corporationनगर पालिका