शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

आचारसंहितेमुळे लांबणार मनपाचा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:13 IST

लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे वर्ष असल्याने आचारसंहितेत तीन ते चार महिन्यांचा कालावधी जाणार आहे. याचा विकास कामांना मंजुरी देण्यावर परिणाम होणार असल्याची शक्यता विचारात घेता २०१९-२० या वर्षाचा अर्थसंकल्प लोकसभा निवडणुका संपताच सादर क रण्याचे संकेत स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देएलबीटी अनुदान वाढल्याने दिलासा : मालमत्ता कराच्या वसुलीतही वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे वर्ष असल्याने आचारसंहितेत तीन ते चार महिन्यांचा कालावधी जाणार आहे. याचा विकास कामांना मंजुरी देण्यावर परिणाम होणार असल्याची शक्यता विचारात घेता २०१९-२० या वर्षाचा अर्थसंकल्प लोकसभा निवडणुका संपताच सादर क रण्याचे संकेत स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी दिले आहेत.विधानसभा निवडणुका विचारात घेता विकास कामांना वेळीच मंजुरी घ्यावी लागणार आहे. निवडणुकीपूर्वी विविध विकास कामांचे भूमिपूजन करावयाचे असल्याने मे महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल होताच स्थायी समितीचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या दृष्टीने स्थायी समिती नियोजन करणार आहे.स्थायी समितीने २०१८-१९ या वर्षाचा २,९४६ कोटींचा जम्बो अर्थसंकल्प सादर केला होता. मात्र ३१ मार्च २०१९ पर्यंत महापालिकेच्या तिजोरीत जमा होणारा महसूल विचारात घेता आयुक्तांनी २,२७७.०६ कोटींचा सुधारित अर्थसंकल्प सादर केला. स्थायी समितीला अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत ६६९ कोटींची कपात केली. राज्य शासनाने एलबीटी अनुदानात वाढ केली असल्याने पुढील वर्षात १०५० कोटींचे अनुदान प्राप्त होणार आहे. तसेच मालमत्ता करापासून ४०० कोटी उत्पन्न होईल. यामुळे बिकट आर्थिक स्थितीत महापालिकेला मोठा दिलासा मिळणार आहे. पुढील वर्षात महापालिकेला आवश्यक खर्चाची फारशी चिंता राहणार नाही. मात्र विकास कामांसाठी उत्पन्न वाढीवर भर द्यावा लागेल.गेल्या वषींच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत १५ ते २० टक्के वाढ अपेक्षित आहे. एलबीटी अनुदानातील वाढ व टॅक्समधील वाढ गृहीत धरता पुढील वर्षाचा अर्थसंकल्प तीन हजार कोटींच्या पुढे जाणार आहे. असे असले तरी पुढील काही महिने आधीच्या स्थायी समितीने मंजुरी दिलेले परंतु अद्याप कार्यादेश न झालेल्या कामांना मंजुरी द्यावी लागणार आहे. त्यामुळे नवीन कामांना अर्थसंकल्पानंतरच सुरुवात होण्याची शक्यता आहे.मालमत्ता कराच्या वसुलीत वाढ२०१८-१९ या वर्षात मालमत्ता करापासून २५० कोटींचे उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे. निवडणुकीचे वर्ष असल्याने पुढील वर्षात कोणत्याही स्वरुपाची करवाढ प्रस्तावित नसली तरी नवीन मालमत्ता कराच्या कक्षेत येणार असल्याने मालमत्ता कराच्या वसुलीत वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे आयुक्तांच्या अर्थसंकल्पातील ४०० कोटींचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची आशा आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBudgetअर्थसंकल्प