शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर पसरला चिखल, नियमांकडे दुर्लक्ष बांधकाम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:09 IST

() नागपूर : पावसाळ्याच्या दरम्यान बांधकाम, रस्त्याचे खोदगाम आदी कामे मनपा प्रशासनाकडून थांबविण्यात येतात; परंतु नियमांकडे दुर्लक्ष ...

()

नागपूर : पावसाळ्याच्या दरम्यान बांधकाम, रस्त्याचे खोदगाम आदी कामे मनपा प्रशासनाकडून थांबविण्यात येतात; परंतु नियमांकडे दुर्लक्ष करून पारडी फ्लायओव्हरचे बांधकाम सुरू आहे. पिल्लर टाकण्यासाठी पूर्ण चौक खोदण्यात आला आहे. खोदण्यात आलेल्या गड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. रस्त्याच्या कडेला खोदकामाच्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे रस्त्यावर चिखल पसरला आहे.

नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) तर्फे फ्लायओव्हरचे बांधकाम करण्यात येत आहे. सोबतच मेट्रो रेल्वेचे कामही सुरू आहे. त्यामुळे प्रजापतीनगर ते पारडी चौकादरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वर्धमाननगरातील बँक ऑफ इंडियापासून पारडी चौकादरम्यान दोन पिलरचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे या रस्त्याचीही अवस्था अतिशय बिकट झाली आहे. रात्रीच्या वेळी येथून अवजड वाहनांची वर्दळ असते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी यासंदर्भात स्थानिक नगरसेवक चेतना टांक, प्रदीप पोहणे यांच्याकडे तक्रार केली. गुरुवारी नागरिकांनी नगरसेविका चेतना टांक यांना बोलावून रस्त्यावर पसरलेला चिखल व खराब झालेले रस्ते दाखविले. त्यांनी तत्काळ मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना यासंदर्भात हस्तक्षेप करून लोकांच्या समस्या सोडविण्यात याव्या, अशी मागणी केली.

- खड्ड्यांमुळे होऊ शकतो जीवघेणा अपघात

प्रजापतीनगर ते एचबी टाऊन चौकादरम्यान मोठमोठे खड्डे पडलेले आहे. खाणापूर्ती म्हणून खड्ड्यात माती व चुरी टाकण्यात आली आहे. पावसामुळे माती व चुरी रस्त्यावर पसरली आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर अंधार पसरलेला असतो. या रस्त्यावर मेट्रो रेल्वे अथवा एनएचएआयने विजेची व्यवस्था केली नाही. एखादी नवीन व्यक्ती रस्त्यावरून गेल्यास अपघात होण्याची शक्यता आहे. दोन्ही यंत्रणा मोठा अपघात होण्याची वाट बघत आहेत.

- अवडज वाहनांची रोकथांब नावाचीच

रात्री अवजड वाहनांच्या प्रवेशाला बंदी घातली आहे; परंतु ही रोकथांब नावाचीच आहे. रात्रीच्या वेळी २० फुटांच्या या रस्त्यावर अवजड वाहनांचे अवागमन सुरू असते. अशात या रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीचालकांना अपघात होण्याची भीती असते. येथील लोकप्रतिनिधीदेखील दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.