शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर पसरला चिखल, नियमांकडे दुर्लक्ष बांधकाम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:09 IST

() नागपूर : पावसाळ्याच्या दरम्यान बांधकाम, रस्त्याचे खोदगाम आदी कामे मनपा प्रशासनाकडून थांबविण्यात येतात; परंतु नियमांकडे दुर्लक्ष ...

()

नागपूर : पावसाळ्याच्या दरम्यान बांधकाम, रस्त्याचे खोदगाम आदी कामे मनपा प्रशासनाकडून थांबविण्यात येतात; परंतु नियमांकडे दुर्लक्ष करून पारडी फ्लायओव्हरचे बांधकाम सुरू आहे. पिल्लर टाकण्यासाठी पूर्ण चौक खोदण्यात आला आहे. खोदण्यात आलेल्या गड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. रस्त्याच्या कडेला खोदकामाच्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे रस्त्यावर चिखल पसरला आहे.

नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) तर्फे फ्लायओव्हरचे बांधकाम करण्यात येत आहे. सोबतच मेट्रो रेल्वेचे कामही सुरू आहे. त्यामुळे प्रजापतीनगर ते पारडी चौकादरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वर्धमाननगरातील बँक ऑफ इंडियापासून पारडी चौकादरम्यान दोन पिलरचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे या रस्त्याचीही अवस्था अतिशय बिकट झाली आहे. रात्रीच्या वेळी येथून अवजड वाहनांची वर्दळ असते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी यासंदर्भात स्थानिक नगरसेवक चेतना टांक, प्रदीप पोहणे यांच्याकडे तक्रार केली. गुरुवारी नागरिकांनी नगरसेविका चेतना टांक यांना बोलावून रस्त्यावर पसरलेला चिखल व खराब झालेले रस्ते दाखविले. त्यांनी तत्काळ मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना यासंदर्भात हस्तक्षेप करून लोकांच्या समस्या सोडविण्यात याव्या, अशी मागणी केली.

- खड्ड्यांमुळे होऊ शकतो जीवघेणा अपघात

प्रजापतीनगर ते एचबी टाऊन चौकादरम्यान मोठमोठे खड्डे पडलेले आहे. खाणापूर्ती म्हणून खड्ड्यात माती व चुरी टाकण्यात आली आहे. पावसामुळे माती व चुरी रस्त्यावर पसरली आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर अंधार पसरलेला असतो. या रस्त्यावर मेट्रो रेल्वे अथवा एनएचएआयने विजेची व्यवस्था केली नाही. एखादी नवीन व्यक्ती रस्त्यावरून गेल्यास अपघात होण्याची शक्यता आहे. दोन्ही यंत्रणा मोठा अपघात होण्याची वाट बघत आहेत.

- अवडज वाहनांची रोकथांब नावाचीच

रात्री अवजड वाहनांच्या प्रवेशाला बंदी घातली आहे; परंतु ही रोकथांब नावाचीच आहे. रात्रीच्या वेळी २० फुटांच्या या रस्त्यावर अवजड वाहनांचे अवागमन सुरू असते. अशात या रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीचालकांना अपघात होण्याची भीती असते. येथील लोकप्रतिनिधीदेखील दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.