शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

अनुदानाच्या व्याजातून महावितरणची कमाई

By admin | Updated: December 27, 2014 02:58 IST

महाराष्ट्रातील उद्योगजगत संकटात आहे. वीज बिलात सूट देण्यासाठी ३९७ कोटी रुपयांच्या अनुदानाची घोषणा सरकारने केली.

कमल शर्मा नागपूर महाराष्ट्रातील उद्योगजगत संकटात आहे. वीज बिलात सूट देण्यासाठी ३९७ कोटी रुपयांच्या अनुदानाची घोषणा सरकारने केली. परंतु उद्योगांना २० टक्के वाढीव वीज बिल प्राप्त झाल्याने त्यांच्या आनंदावरच विरजण पडले आहे. सरकारने जी.आर. काढण्यात उशीर केल्याचे कारण सांगून महावितरणने आपले हात झटकले आहे. सोबतच पुढच्या बिलात अ‍ॅडजस्ट करण्यात येईल, असे आश्वासन देऊन उद्योगांची समजूत काढण्यात आली आहे. परंतु ३९७ कोटी रुपयांचे व्याज मात्र महावितरणाच्या खिशात आजच जमा झाले. गेल्यावर्षी वीज बिलदरात २० टक्के वाढ करण्यात आली होती. याचा भार सर्वसामान्य नागरिकांवर पडू नये म्हणून महावितरणला दर महिन्याला ७०६ कोटी रुपयाची सबसिडी देण्याचा निर्णय घेतला. परंतु आॅगस्टनंतर राज्यातील आर्थिक स्थिती पाहता ही सबसिडी बंद करण्यात आली. राज्यातील नवीन भाजपा-शिवसेना सरकारने या सबसिडीची जबाबदारी आॅक्टोबरपर्यंत घेतली. राज्य शासनाने केवळ कृषी वीज ग्राहकांसाठी ९२ कोटी रुपयांची सबसिडी सुरू ठेवली. त्यामुळे याचा फटका सर्वसामान्य नागरिक आणि उद्योगांवर पडला. त्यांच्या वीज बिलात २० टक्के वाढ झाली. खूप आरडाओरड झाल्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषीसोबतच उद्योगांनाही सवलत देण्यासाठी ३९७ कोटी रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आला.शासनाने याचे संकेत महावितरणला आधीच दिले होते. अशा परिस्थितीत स्वाभाविकपणे डिसेंबरमध्ये येणारे वीज बिल २० टक्के वाढीव यायला नको होते परंतु असे झाले नाही. उद्योगांवर ३९७ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार टाकण्यात आला. आता महावितरण सांगत आहे की, सबसिडीची रक्कम पुढच्या बिलात अ‍ॅडजस्ट केली जाईल. परंतु इतक्या मोठ्या रकमेवरील व्याजाबाबत मात्र महावितरणचे अधिकारी काही बोलायला तयार नाहीत. सहा टक्के व्याजही पकडले तर ही रक्कम जवळपास २५ कोटी रुपये इतकी होते. त्यामुळे साहजिकच महावितरणला काहीही न करता २५ कोटी रुपयाची कमाई झाली आहे.