शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

समता प्रतिष्ठानचे मुख्यालय मुंबईला हलवण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 23:30 IST

दिल्लीच्या डॉ. आंबेडकर फाऊंडेशनच्या धर्तीवर महाराष्ट्रातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. आंबेडकरी चळवळीचे केंद्र व जगाला समतेचा संदेश देणारी ऊर्जाभूमी म्हणून प्रसिद्ध असलेली दीक्षाभूमी असलेल्या नागपुरात या प्रतिष्ठानचे मुख्यालय उघडण्यात आले. सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत असलेल्या या प्रतिष्ठानचे मुख्यालय मंत्री बदलताच मुंबईला हलवण्याची तयारी सुरू झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देनागपूरचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिल्लीच्या डॉ. आंबेडकर फाऊंडेशनच्या धर्तीवर महाराष्ट्रातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. आंबेडकरी चळवळीचे केंद्र व जगाला समतेचा संदेश देणारी ऊर्जाभूमी म्हणून प्रसिद्ध असलेली दीक्षाभूमी असलेल्या नागपुरात या प्रतिष्ठानचे मुख्यालय उघडण्यात आले. सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत असलेल्या या प्रतिष्ठानचे मुख्यालय मंत्री बदलताच मुंबईला हलवण्याची तयारी सुरू झाल्याची माहिती आहे.समता प्रतिष्ठानचा मुख्य हेतू समाजात भारतीय संविधानाला अपेक्षित समता प्रस्थापित करणे आहे. प्रतिष्ठानतर्फे समाजातील सर्वच दुर्बल घटकांना तसेच शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या प्रदेशातील जनतेला उच्च दर्जाचे शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण मिळावे, समताधिष्ठित मूल्य जनमानसात रुजविण्याच्या उद्देशाने वाचनालय, अभ्यास कक्ष, संशोधन संस्था, शैक्षणिक केंद्रे इत्यादींची स्थापना करणे, तसेच विविध दुर्बल समाज घटकांच्या उन्नतीसाठी कार्यात्मक येजना तयार करून त्याची अंमलबजावणी करणे याशिवाय दुर्बल घटकांसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. या प्रतिष्ठानची स्थापना १० जुलै २०१७ रोजी कंपनी कायदा २०१३ च्या अनुच्छेद ८ अंतर्गत कुठलाही नफा न कमविण्याच्या तत्त्वावर करण्यात आली. सध्या प्रतिष्ठानचे कार्यालय हे सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीमध्ये आहे. परंतु उत्तर नागपुरात उभारण्यात येत असलेल्या डॉ. आंबेडकर कन्वेंशन सेंटरच्या भव्य इमारतीमध्ये प्रतिष्ठानचे कार्यालय लवकरच सुरू होणार आहे. यासाठी तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी बरेच परिश्रम घेतले आहे. प्रतिष्ठानतर्फे अनेक सामाजिक उपक्रमही राबवले जात आहेत.मिळालेल्या माहितीनुसार सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे हे समता प्रतिष्ठान मुंबईला हलविण्याच्या तयारीत आहेत. पुणे येथे हलवण्याचीही चाचपणी केली जात आहे. मंत्र्यांच्या कामासाठी सोयीचे ठरावे म्हणून समता प्रतिष्ठान मुंबईला हलवण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. परंतु हे महत्त्वाचे कार्यालय नागपुरातून हलवणे म्हणजे नागपूरचे महत्त्व कमी करण्यासारखेच होय. स्वत: मुख्यमंत्री याबाबत काय निर्णय घेतात यकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 मुख्य उद्देशालाच धक्का  दिल्ली येथील डॉ. आंबेडकर फाऊंडेशनच्या धर्तीवर जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले. तेव्हा याच्या मुख्यालयासाठी केवळ नागपूर शहराचेच नाव निश्चित करण्यात आले होते. नागपुरातील दीक्षाभूमी ही जगाला समतेचा संदेश देणारी ऊर्जाभूमी म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. म्हणूनच समता प्रतिष्ठानचे मुख्यालय हे नागपूर या परिवर्तन स्थळीच करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. पुरोगामी विचाराने प्रेरित या मातीतूनच प्रबोधनाचा संदेश जगभर पोहचावा, अशी महाराष्ट्र शासनाची भूमिका असल्याचे संगण्यात आले होते. तेव्हा हे कार्यालय नागपुरातून हलवण्यात आल्यास याच्या मूळ उद्देशालाच धक्का लावल्यासारखे होईल. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरMumbaiमुंबई