शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

फळबाग लागवड योजनेत मौदा, रामटेक माघारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:07 IST

गोपालकृष्ण मांडवकर नागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या फळबाग ...

गोपालकृष्ण मांडवकर

नागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या फळबाग लागवड व वृक्ष लागवड योजनेच्या उद्दिष्ट्यपूर्तीमध्ये मौदा आणि रामटेक हे दोन तालुके माघारले आहेत. या दोन्ही तालुक्यांमध्ये एकही फळबाग लागवड न झाल्याने कृषी विभागासाठी ही आश्चर्याची बाब मानली जात आहे.

ही १०० टक्के केंद्र पुरस्कृत योजना असून जॉबकार्डधारक शेतकऱ्यांची या योजनेसाठी निवड केली जाते. ग्रामसभांची मंजुरी मिळाल्यानंतर लाभार्थी निश्चित होतात. या वर्षात राबविण्यात आलेल्या योजनेमध्ये १,१९९ शेतकऱ्यांच्या प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी मिळूनही प्रत्यक्षात ८७९ शेतकऱ्यांचा सहभाग घेतला. रामटेक तालुक्यासाठी १८० हेक्टर क्षेत्राचे लक्षांक ठरविण्यात आले होते, तर मौदा तालुक्यासाठी १९० हेक्टर लक्षांक होते. मात्र दोन्ही तालुक्यात एक हेक्टर क्षेत्रावरही फळबाग उभी राहू शकली नाही. पारशिवणी तालुक्यासाठी १९० हेक्टर क्षेत्राचे लक्षांक होते. मात्र फक्त १३.२० हेक्टर क्षेत्रावरच फळबागा उभ्या राहिल्या. यामुळे या विभागातील शेतकऱ्यांची उदासिनता लक्षणीय ठरली आहे.

...

२,६४० हेक्टर लक्ष्यापैकी फक्त ७२४ हेक्टरवरच साध्यता

या योजनेसाठी प्रत्यक्षात २,६४० हेक्टर क्षेत्राचे लक्षांक ठरविण्यात आले होते. मात्र ७२४.७१ हेक्टर क्षेत्रावरच फळबाग लागवड होऊ शकली. रामटेक उपविभागाची कामगिरी सर्वात कमी राहिली. उमरेड विभागातही ५६० पैकी ८६.१ हेक्टर क्षेत्रावरच फळबागा उभ्या राहिल्या. नागपूर विभागातही ८५० पैकी १९१.६८ क्षेत्रावरच हे उद्दिष्ट साध्य झाले. काटोल विभागात चांगला प्रतिसाद मिळाला. ६७० हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट होते, ४३३.७३ हेक्टर साध्य झाले.

...

संत्रा, मोसंबीला अधिक पसंती

आंबा, संत्रा, मोसंबी, पेरू, सीताफळ, कागदी लिंबू, चिकू, साग, शेवगा या फळबागांसाठी जिल्ह्यात योजना राबविण्यात आली होती. शेतकऱ्यांनी संत्रा आणि मोसंबीसाठी अधिक पसंती दिली. जिल्ह्यात संत्रासाठी ४५६..०६ हेक्टर तर मोसंबीसाठी १४७ हेक्टरवर फळबाग लागवड झाली. यात काटोल, नरखेड आणि कळमेश्वर हे तालुके आघाडीवर आहेत. पेरू ३ हेक्टरवर आणि शेवगा फक्त १ हेक्टरवर लागवड झाली. यासोबतच आंबा १८.१ हेक्टर, सीताफळ ४७.६५, कागदी लिंबू २३.८०, चिकू ४० आणि साग ७० हेक्टरवर लावण्यात आला.

...

कोट

आजवरच्या काळात यंदाची साध्यता सर्वाधिक आहे. कृषी सहायकांना प्रत्येक उपविभागनिहाय उद्दिष्ट दिले जाते. मौदा आणि रामटेक हे भात उत्पादक तालुके असल्याने उद्दिष्ट घटले आहे. बदलत्या ऋतुमानाचाही परिणाम झाला. येत्या एप्रिलपासून सुरू होणाऱ्या यंदाच्या योजनेमध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.

- मिलिंद शेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नागपूर