शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

फळबाग लागवड योजनेत मौदा, रामटेक माघारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:07 IST

गोपालकृष्ण मांडवकर नागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या फळबाग ...

गोपालकृष्ण मांडवकर

नागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या फळबाग लागवड व वृक्ष लागवड योजनेच्या उद्दिष्ट्यपूर्तीमध्ये मौदा आणि रामटेक हे दोन तालुके माघारले आहेत. या दोन्ही तालुक्यांमध्ये एकही फळबाग लागवड न झाल्याने कृषी विभागासाठी ही आश्चर्याची बाब मानली जात आहे.

ही १०० टक्के केंद्र पुरस्कृत योजना असून जॉबकार्डधारक शेतकऱ्यांची या योजनेसाठी निवड केली जाते. ग्रामसभांची मंजुरी मिळाल्यानंतर लाभार्थी निश्चित होतात. या वर्षात राबविण्यात आलेल्या योजनेमध्ये १,१९९ शेतकऱ्यांच्या प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी मिळूनही प्रत्यक्षात ८७९ शेतकऱ्यांचा सहभाग घेतला. रामटेक तालुक्यासाठी १८० हेक्टर क्षेत्राचे लक्षांक ठरविण्यात आले होते, तर मौदा तालुक्यासाठी १९० हेक्टर लक्षांक होते. मात्र दोन्ही तालुक्यात एक हेक्टर क्षेत्रावरही फळबाग उभी राहू शकली नाही. पारशिवणी तालुक्यासाठी १९० हेक्टर क्षेत्राचे लक्षांक होते. मात्र फक्त १३.२० हेक्टर क्षेत्रावरच फळबागा उभ्या राहिल्या. यामुळे या विभागातील शेतकऱ्यांची उदासिनता लक्षणीय ठरली आहे.

...

२,६४० हेक्टर लक्ष्यापैकी फक्त ७२४ हेक्टरवरच साध्यता

या योजनेसाठी प्रत्यक्षात २,६४० हेक्टर क्षेत्राचे लक्षांक ठरविण्यात आले होते. मात्र ७२४.७१ हेक्टर क्षेत्रावरच फळबाग लागवड होऊ शकली. रामटेक उपविभागाची कामगिरी सर्वात कमी राहिली. उमरेड विभागातही ५६० पैकी ८६.१ हेक्टर क्षेत्रावरच फळबागा उभ्या राहिल्या. नागपूर विभागातही ८५० पैकी १९१.६८ क्षेत्रावरच हे उद्दिष्ट साध्य झाले. काटोल विभागात चांगला प्रतिसाद मिळाला. ६७० हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट होते, ४३३.७३ हेक्टर साध्य झाले.

...

संत्रा, मोसंबीला अधिक पसंती

आंबा, संत्रा, मोसंबी, पेरू, सीताफळ, कागदी लिंबू, चिकू, साग, शेवगा या फळबागांसाठी जिल्ह्यात योजना राबविण्यात आली होती. शेतकऱ्यांनी संत्रा आणि मोसंबीसाठी अधिक पसंती दिली. जिल्ह्यात संत्रासाठी ४५६..०६ हेक्टर तर मोसंबीसाठी १४७ हेक्टरवर फळबाग लागवड झाली. यात काटोल, नरखेड आणि कळमेश्वर हे तालुके आघाडीवर आहेत. पेरू ३ हेक्टरवर आणि शेवगा फक्त १ हेक्टरवर लागवड झाली. यासोबतच आंबा १८.१ हेक्टर, सीताफळ ४७.६५, कागदी लिंबू २३.८०, चिकू ४० आणि साग ७० हेक्टरवर लावण्यात आला.

...

कोट

आजवरच्या काळात यंदाची साध्यता सर्वाधिक आहे. कृषी सहायकांना प्रत्येक उपविभागनिहाय उद्दिष्ट दिले जाते. मौदा आणि रामटेक हे भात उत्पादक तालुके असल्याने उद्दिष्ट घटले आहे. बदलत्या ऋतुमानाचाही परिणाम झाला. येत्या एप्रिलपासून सुरू होणाऱ्या यंदाच्या योजनेमध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.

- मिलिंद शेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नागपूर