शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

फळबाग लागवड योजनेत मौदा, रामटेक माघारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:07 IST

गोपालकृष्ण मांडवकर नागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या फळबाग ...

गोपालकृष्ण मांडवकर

नागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या फळबाग लागवड व वृक्ष लागवड योजनेच्या उद्दिष्ट्यपूर्तीमध्ये मौदा आणि रामटेक हे दोन तालुके माघारले आहेत. या दोन्ही तालुक्यांमध्ये एकही फळबाग लागवड न झाल्याने कृषी विभागासाठी ही आश्चर्याची बाब मानली जात आहे.

ही १०० टक्के केंद्र पुरस्कृत योजना असून जॉबकार्डधारक शेतकऱ्यांची या योजनेसाठी निवड केली जाते. ग्रामसभांची मंजुरी मिळाल्यानंतर लाभार्थी निश्चित होतात. या वर्षात राबविण्यात आलेल्या योजनेमध्ये १,१९९ शेतकऱ्यांच्या प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी मिळूनही प्रत्यक्षात ८७९ शेतकऱ्यांचा सहभाग घेतला. रामटेक तालुक्यासाठी १८० हेक्टर क्षेत्राचे लक्षांक ठरविण्यात आले होते, तर मौदा तालुक्यासाठी १९० हेक्टर लक्षांक होते. मात्र दोन्ही तालुक्यात एक हेक्टर क्षेत्रावरही फळबाग उभी राहू शकली नाही. पारशिवणी तालुक्यासाठी १९० हेक्टर क्षेत्राचे लक्षांक होते. मात्र फक्त १३.२० हेक्टर क्षेत्रावरच फळबागा उभ्या राहिल्या. यामुळे या विभागातील शेतकऱ्यांची उदासिनता लक्षणीय ठरली आहे.

...

२,६४० हेक्टर लक्ष्यापैकी फक्त ७२४ हेक्टरवरच साध्यता

या योजनेसाठी प्रत्यक्षात २,६४० हेक्टर क्षेत्राचे लक्षांक ठरविण्यात आले होते. मात्र ७२४.७१ हेक्टर क्षेत्रावरच फळबाग लागवड होऊ शकली. रामटेक उपविभागाची कामगिरी सर्वात कमी राहिली. उमरेड विभागातही ५६० पैकी ८६.१ हेक्टर क्षेत्रावरच फळबागा उभ्या राहिल्या. नागपूर विभागातही ८५० पैकी १९१.६८ क्षेत्रावरच हे उद्दिष्ट साध्य झाले. काटोल विभागात चांगला प्रतिसाद मिळाला. ६७० हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट होते, ४३३.७३ हेक्टर साध्य झाले.

...

संत्रा, मोसंबीला अधिक पसंती

आंबा, संत्रा, मोसंबी, पेरू, सीताफळ, कागदी लिंबू, चिकू, साग, शेवगा या फळबागांसाठी जिल्ह्यात योजना राबविण्यात आली होती. शेतकऱ्यांनी संत्रा आणि मोसंबीसाठी अधिक पसंती दिली. जिल्ह्यात संत्रासाठी ४५६..०६ हेक्टर तर मोसंबीसाठी १४७ हेक्टरवर फळबाग लागवड झाली. यात काटोल, नरखेड आणि कळमेश्वर हे तालुके आघाडीवर आहेत. पेरू ३ हेक्टरवर आणि शेवगा फक्त १ हेक्टरवर लागवड झाली. यासोबतच आंबा १८.१ हेक्टर, सीताफळ ४७.६५, कागदी लिंबू २३.८०, चिकू ४० आणि साग ७० हेक्टरवर लावण्यात आला.

...

कोट

आजवरच्या काळात यंदाची साध्यता सर्वाधिक आहे. कृषी सहायकांना प्रत्येक उपविभागनिहाय उद्दिष्ट दिले जाते. मौदा आणि रामटेक हे भात उत्पादक तालुके असल्याने उद्दिष्ट घटले आहे. बदलत्या ऋतुमानाचाही परिणाम झाला. येत्या एप्रिलपासून सुरू होणाऱ्या यंदाच्या योजनेमध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.

- मिलिंद शेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नागपूर