शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ऑटोचालक सापडले संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 22:45 IST

गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमधून आता शिथिलता मिळायला लागली आहे. दुकाने, उद्योगधंदे, कार्यालये आता सुरू व्हायला लागली असून नागरिकांची ये-जा वाढली आहे. हा दिलासा मिळताना ऑटोचालक हा वर्ग दुर्लक्षित राहिला आहे. ५५ दिवसांपासून बेरोजगार असलेल्या ऑटोचालकांवर संकट कायम आहे.

ठळक मुद्देव्यवसाय बंद, आवक नाही : चौथ्या लॉकडाऊनमध्ये दिलासा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमधून आता शिथिलता मिळायला लागली आहे. दुकाने, उद्योगधंदे, कार्यालये आता सुरू व्हायला लागली असून नागरिकांची ये-जा वाढली आहे. हा दिलासा मिळताना ऑटोचालक हा वर्ग दुर्लक्षित राहिला आहे. ५५ दिवसांपासून बेरोजगार असलेल्या ऑटोचालकांवर संकट कायम आहे.शहर उघडले आहेत. आरटीओ कार्यालय सुरू झाले आहे पण ऑटोचालकांना परवानगी मिळाली नाही. आधीच बेरोजगार असलेल्या आॅटोचालकांना इतर उद्योगांप्रमाणे पॅकेजची गरज आहे, अशी भावना विदर्भ ऑटो चालक-मालक संघटनेचे विलास भालेकर यांनी व्यक्त केली. कुटुंबाचे पालनपोषण करता यावे म्हणून ऑटोचालकाना ५००० रुपये द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी सांगितले की ८० टक्के ऑटोचालकांवर वाहन कर्ज आहे. कर्जधारकांना ऑगस्टपासून कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी दिलासा दिला आहे पण व्याज जिवंत आहे. दोन महिन्यांपासून बेरोजगार असलेल्या ऑटोचालकांना कुटुंबासाठी दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडली असताना व्याजाचे पैसे कसे भरणार, हा प्रश्न आहे. प्रत्येकाला ३५०० ते ५००० रुपये कर्जाचे हफ्ते भरावे लागतात. व्यवसाय बंद आहे, शिवाय शाळा, कॉलेज बंद असल्याने होणारी थोडीबहुत आवकही बंद आहे. त्यामुळे हे कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न भालेकर यांनी उपस्थित केला. सरकारने नैतिक जबाबदारी स्वीकारून ऑटोचालकाना दिलासा द्यावा, पॅकेज द्यावे आणि त्यांना आपला व्यावसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी संघटनेतर्फे भालेकर यांनी केली.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्या