शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

नागपुरात ऑटोचालक सापडले संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 22:45 IST

गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमधून आता शिथिलता मिळायला लागली आहे. दुकाने, उद्योगधंदे, कार्यालये आता सुरू व्हायला लागली असून नागरिकांची ये-जा वाढली आहे. हा दिलासा मिळताना ऑटोचालक हा वर्ग दुर्लक्षित राहिला आहे. ५५ दिवसांपासून बेरोजगार असलेल्या ऑटोचालकांवर संकट कायम आहे.

ठळक मुद्देव्यवसाय बंद, आवक नाही : चौथ्या लॉकडाऊनमध्ये दिलासा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमधून आता शिथिलता मिळायला लागली आहे. दुकाने, उद्योगधंदे, कार्यालये आता सुरू व्हायला लागली असून नागरिकांची ये-जा वाढली आहे. हा दिलासा मिळताना ऑटोचालक हा वर्ग दुर्लक्षित राहिला आहे. ५५ दिवसांपासून बेरोजगार असलेल्या ऑटोचालकांवर संकट कायम आहे.शहर उघडले आहेत. आरटीओ कार्यालय सुरू झाले आहे पण ऑटोचालकांना परवानगी मिळाली नाही. आधीच बेरोजगार असलेल्या आॅटोचालकांना इतर उद्योगांप्रमाणे पॅकेजची गरज आहे, अशी भावना विदर्भ ऑटो चालक-मालक संघटनेचे विलास भालेकर यांनी व्यक्त केली. कुटुंबाचे पालनपोषण करता यावे म्हणून ऑटोचालकाना ५००० रुपये द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी सांगितले की ८० टक्के ऑटोचालकांवर वाहन कर्ज आहे. कर्जधारकांना ऑगस्टपासून कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी दिलासा दिला आहे पण व्याज जिवंत आहे. दोन महिन्यांपासून बेरोजगार असलेल्या ऑटोचालकांना कुटुंबासाठी दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडली असताना व्याजाचे पैसे कसे भरणार, हा प्रश्न आहे. प्रत्येकाला ३५०० ते ५००० रुपये कर्जाचे हफ्ते भरावे लागतात. व्यवसाय बंद आहे, शिवाय शाळा, कॉलेज बंद असल्याने होणारी थोडीबहुत आवकही बंद आहे. त्यामुळे हे कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न भालेकर यांनी उपस्थित केला. सरकारने नैतिक जबाबदारी स्वीकारून ऑटोचालकाना दिलासा द्यावा, पॅकेज द्यावे आणि त्यांना आपला व्यावसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी संघटनेतर्फे भालेकर यांनी केली.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्या