शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

आईला तीन महिन्यांच्या मुलाचा ताबा : हायकोर्टाचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 19:27 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी तीन महिन्याच्या मुलाचा ताबा त्याच्या आईकडे सोपवला. त्यामुळे आईला मोठा दिलासा मिळाला. आईपासून विभक्त झालेल्या वडिलाने त्या मुलाला बळजबरीने सोबत नेले होते.

ठळक मुद्देविभक्त वडिलाने बळजबरीने सोबत नेले होते

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने शुक्रवारी तीन महिन्याच्या मुलाचा ताबा त्याच्या आईकडे सोपवला. त्यामुळे आईला मोठा दिलासा मिळाला. आईपासून विभक्त झालेल्या वडिलाने त्या मुलाला बळजबरीने सोबत नेले होते.रिना कनोजे असे आईचे तर, योगेश असे वडिलाचे नाव असून ते अकोला जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मुलाला न्यायालयात आणण्याचा आदेश दोन दिवसांपूर्वी देण्यात आला होता. त्यानुसार मूर्तिजापूर पोलिसांनी मुलाला त्याच्या आईवडिलासह न्यायालयात आणले. त्यानंतर न्यायालयाने मुलाला तात्पुरत्या स्वरूपात आईच्या स्वाधीन करण्यास सांगितले. तसेच, योगेश कनोजे, अकोला पोलीस अधीक्षक व मूर्तिजापूरचे पोलीस निरीक्षक यांना यावर उत्तर सादर करण्यासाठी एक आठवड्याची मुदत वाढवून दिली. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली.रिना कनोजे यांनी मुलाचा ताबा व पाच लाख रुपये भरपाई मिळण्यासाठी रिट याचिका दाखल केली होती. तिची एक विनंती तात्पुरती पूर्ण झाली. रिनाने योगेश व सासू-सासरे हुंड्यासाठी छळ करीत असल्याची तक्रार मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. त्यासंदर्भातील खटला मूर्तिजापूर येथील फौजदारी न्यायालयात प्रलंबित आहे. दरम्यान, दोन्ही पक्षकार पोलीस ठाण्यातील महिला कक्षात उपस्थित असताना रिनाच्या ताब्यात असलेल्या मुलाला योगेश बळजबरीने सोबत घेऊन गेला होता. त्यावेळी मुलगा केवळ दोन महिन्याचा होता. उच्च न्यायालयात याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. संतोष चांडे व अ‍ॅड. राजू कडू यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर