शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सातपुड्याच्या पायथ्यातील गावांमध्ये मूत्रपिंडाचे सर्वाधिक रुग्ण : धनंजय उखळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 00:58 IST

अनियंत्रित रक्तदाब व मधुमेहामुळे मूत्रपिंड निकामी होण्याचा सर्वाधिक धोका असतो. परंतु हे दोन आजार नसतानाही दक्षिण-पश्चिम विदर्भातील खारपाणपट्ट्यात मूत्रपिंड निकामी रुग्ण, विशेषत: सातपुड्याच्या डोंगरदऱ्याच्या पायथ्याशी असलेल्या छोट्या-छोट्या गावांमध्ये सर्वाधिक दिसून येत आहेत.

ठळक मुद्दे नेफ्रोलॉजी सोसायटीचा वार्षिक सोहळा रविवारी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अनियंत्रित रक्तदाब व मधुमेहामुळे मूत्रपिंड निकामी होण्याचा सर्वाधिक धोका असतो. परंतु हे दोन आजार नसतानाही दक्षिण-पश्चिम विदर्भातील खारपाणपट्ट्यात मूत्रपिंड निकामी रुग्ण, विशेषत: सातपुड्याच्या डोंगरदऱ्याच्या पायथ्याशी असलेल्या छोट्या-छोट्या गावांमध्ये सर्वाधिक दिसून येत आहेत. येथील पाण्याच्या तपासणीसाठी ‘नीरी’ची मदत घेतली जात आहे. आतापर्यंत ६० रुग्ण या आजाराचे आढळून आले आहे. लवकरच या संदर्भातील अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती, वरिष्ठ नेफ्रोलॉजिस्ट डॉ. धनंजय ऊकळकर यांनी येथे दिली.मूत्रपिंड (किडनी) विशेषज्ञ डॉक्टरांची संस्था ‘दि नेफ्रोलॉजी सोसायटी’चा वार्षिक सोहळा रविवार १५ मार्च रोजी रामदासपेठ येथील खासगी हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. पत्रपरिषदेला ‘दि नेफ्रोलॉजी सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. अश्विनीकुमार खांडेकर, सचिव डॉ. निशांत देशपांडे, डॉ. शिवनारायण आचार्य, डॉ. सुनीती खांडेकर व डॉ. विशाल रामटेके उपस्थित होते.डॉ. देशपांडे म्हणाले, दरवर्षी जागतिक मूत्रपिंड दिनी, संस्थेच्या वार्षिक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षी पीजीआय-चंदीगढ येथील नेफ्रोलॉजीच्या डॉ. ऋतंभरा नाडा, एसजीपीजीआय-लखनौ येथील रिनल न्युट्रिशनच्या डॉ. अनिता सक्सेना विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. कार्यशाळेच्या पहिला दिवस म्हणजे १४ मार्चला पॅथॉलॉजी सोसायटीच्या सहकार्याने ‘केस डिस्कशन’ आयोजित केले आहे. नेफ्रो पॅथोेलॉजिस्ट डॉ. राजन दुग्गल मार्गदर्शन करतील. ‘कॉम्प्लिमेन्ट ग्लोमेरुलोपॅथी’ या विषयावर डॉ. ऋतुंभरा नाडा, पद्मश्री डॉ. बी.एस. चौबे ओरेशन सादर करतील.मधुमेहामुळे ४० टक्के मूत्रपिंड निकामीडॉ. देशपांडे व डॉ. उखळकर म्हणाले, मधुमेहामुळे ४० ते ५० टक्के मूत्रपिंड निकामी होतात. या शिवाय, ‘क्रोनिक किडनी डिसीज’मुळे (सीकेडी) २० टक्के, उच्च रक्तदाबामुळे १२ ते १४ टक्के तर ‘पेन किलर्स’ व स्वत:हून औषधे घेतल्याने पाच ते १० टक्के मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता असते.देशात मूत्रपिंड विकाराचे २ हजार डॉक्टरविविध कारणांमुळे मूत्रपिंड विकाराचे रुग्ण वाढत आहे. परंतु त्या तुलनेत मूत्रपिंड विशेषज्ञांची संख्या फारच कमी आहे. भारताचा विचार केल्यास केवळ दोन हजार विशेषज्ञ आहेत. त्यातही मूत्रपिंड पॅथॉलॉजिस्टची संख्या फक्त ४०च्या आत आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरMediaमाध्यमे