शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

जगातील सर्वात कठीण मॅराथॉन सहारा वाळवंट अतुलला करायचा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 20:18 IST

दक्षिण आफ्रिकेच्या सहारा वाळवंटात दरवर्षी जगातील सर्वात कठीण मॅराथॉन आयोजित केली जाते. एप्रिल २०१८ मध्ये ही ३३ वी मॅराथॉन होत आहे. यात अजूनपर्यंत एकाही भारतीयाने सहभाग नोंदविला नाही. वाळवंटातील २५० किलोमीटरची ही मॅराथॉन पार करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती नागपुरातील अतुलकुमार चौकसे याने बाळगली आहे.

ठळक मुद्दे३२ वर्षांत एकही भारतीय धावला नाहीआतापर्यंत तिघांचा मृत्यू ,नऊ बेपत्ता

आॅनलाईन लोकमतनागपूर : दक्षिण आफ्रिकेच्या सहारा वाळवंटात दरवर्षी जगातील सर्वात कठीण मॅराथॉन आयोजित केली जाते. एप्रिल २०१८ मध्ये ही ३३ वी मॅराथॉन होत आहे. यात अजूनपर्यंत एकाही भारतीयाने सहभाग नोंदविला नाही. वाळवंटातील २५० किलोमीटरची ही मॅराथॉन पार करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती नागपुरातील अतुलकुमार चौकसे याने बाळगली आहे. या मॅराथॉनमध्ये भारताचा तिरंगा झळकविण्याचा त्याचा मानस आहे.अतुलकुमार चौकसे एक साहसी युवक आहे. मोहननगरमध्ये तो राहतो. १० ते १२ वर्षांपासून तो रनिंग करतो आहे. तो देशभरात होणाऱ्या २५ ते ३० मॅराथॉनमध्ये सहभागीसुद्धा झाला आहे. जीवनात काही तरी थ्रील करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे देशात होणाऱ्या  अवघड मॅराथॉनमध्येसुद्धा तो सहभागी झाला आहे. अतुलने लडाखमध्ये होणाऱ्या  खरडुंगा चॅलेंज या ७२ किलोमीटरच्या मॅराथॉनमध्ये नेत्रदीपक यश मिळविले आहे. ही मॅराथॉन समुद्रसपाटीपासुन १८,५०० किलोमीटरवर असते. देशातील सर्वात अवघड मॅराथॉन म्हणून नोंद आहे. येथे प्राणवायूचे प्रमाण कमी असते. त्यामुळे स्पर्धा पूर्ण करणे अनेकांना शक्य होत नाही. त्याचबरोबर लडाख येथील ४२ किलोमीटरची मॅराथॉन, बंगलोर येथे झालेली ७५ किलोमीटरची अल्ट्रा मॅराथॉनमध्ये तो धावला आहे. त्यात तिसरा रँक त्याने मिळविला आहे. त्याचबरोबर नागपूर-छिंदवाडा, नागपूर-अमरावती अशा १०६, १०४ किलोमीटर अंतर त्याने धावून पार केले आहे.अतुलचे हे साहसी अनुभव लक्षात घेता, त्याने जगातील सर्वात कठीण असलेली सहारा वाळवंटातील एमडीएस मॅराथॉन पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. ही मॅराथॉन अतिशय थरारक असून, त्यासाठी त्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.का अवघड आहे ही मॅराथॉनया मॅराथॉनला ‘मॅराथॉन डिसेबल’असे म्हंटल्या जाते. ही मॅराथॉन दक्षिण आफ्रिकेच्या मोरोक्को येथे होणार आहे. यात २५० किलोमीटर सहाराच्या वाळवंटात धावायचे आहे. धावताना २० किलो वजन घेऊन धावायचे आहे. या २० किलोमध्ये टेंट, खाण्याचे साहित्य, चाकू, स्लीपिंग बॅग राहणार आहे. कधी ३८ ते ५० डिग्री तर कधी ७ ते १३ डिग्री तापमानामध्ये तो धावणार आहे. रनिंग करताना वादळाचा सामना करावा लागणार आहे. येथे धावताना जीवाचा धोका आहे. वन्यप्राण्यांची जोखीम आहे. यात जखमी झाल्यास स्वत:लाच उपचार करायचे आहेत. या मॅराथॉनमध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. नऊ लोक बेपत्ता झाले आहेत. भारताकडून अजूनपर्यंत यात कुणीच सहभाग घेतला नाही.अतुलपुढे अडचणअतुलने मॅराथॉन पूर्ण करण्याचा संकल्प केला असला तरी, त्याच्यापुढे आर्थिक अडचणी आहेत. या मॅराथॉनमध्ये नोंदणी करण्यासाठी अडीच लाख रुपये लागतात. त्याचबरोबर जाण्या-येण्याचा खर्च असे सर्व मिळून १५ लाखाचा खर्च येणार आहे. अतुलचे एक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे. त्याने सरकारकडे आवाहन केले आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांनासुद्धा पत्र पाठविले आहे. अतुलने आपल्या फेसबुकवरूनसुद्धा आवाहन केले आहे. या जीवघेण्या मॅराथॉनमध्ये धावून देशाचा तिरंगा झळकविण्याचा त्याचा मानस पूर्ण करण्यासाठी समाजातूनसुद्धा त्याला मदतीची अपेक्षा आहे. त्याच्या मदतीसाठी या ८४४६३९९९८८ मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल.

 

 

 

टॅग्स :Marathonमॅरेथॉन