शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

महाराजबागेत उद्यापासून मॉर्निंग वॉकसाठी ‘नाे एंट्री’, 'हे' आहे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2022 13:11 IST

येत्या ९ एप्रिलपासून महाराजबागेत माॅर्निंग वाॅकर्सवर बंदी घालण्यात आली आहे.

ठळक मुद्दे‘त्या’ भांडणाचे निमित्त : व्यवस्थापनाकडून असा दुजाभाव याेग्य नाही

नागपूर : शुद्ध हवेच्या इच्छेपाेटी सकाळी फिरायला येणाऱ्यांसाठी महाराजबागेचे गेट उद्या, शनिवारपासून बंद राहणार आहे. प्राणिसंग्रहालयात नुकत्याच दाेन गटांमध्ये झालेल्या भांडणाचे निमित्त करून प्राण्यांना त्रास हाेत असण्यापर्यंतची कारणे देत आधीपासून विचारार्थ असलेला निर्णय अखेर लादण्यात आला. येत्या ९ एप्रिलपासून महाराजबागेत माॅर्निंग वाॅकर्सवर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे राेज सकाळी फिरायला येणाऱ्यांचा हिरमाेड हाेणार असून ‘राेज पैसे देऊन येणाऱ्या हजाराे पर्यटकांमुळे प्राण्यांना त्रास हाेत नाही का?’ असा असंताेषपूर्ण सवाल माॅर्निंग वाॅकर्सनी उपस्थित केला आहे.

दि. ५ एप्रिल राेजी ‘महाराजबाग आराेग्य आसन मंडळा’च्या काही सदस्यांमध्ये भांडण झाले. याबाबत महाराजबाग प्रशासनाने बुधवारी सीताबर्डी पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर गुरुवारी कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करीत प्रशासनाने तडकाफडकी उद्या, शनिवारपासून प्राणिसंग्रहालयात सकाळी फिरणाऱ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. निर्णय घेताना इतरही कारणे सांगण्यात आली आहेत. भारतात काेणत्याही प्राणिसंग्रहालयात माॅर्निंग वाॅकर्सना परवानगी नाही. अधिक काळासाठी मानवी संपर्क आल्याने प्राण्यांवर विपरीत परिणाम हाेताहेत, ही परिस्थिती प्राणिसंवर्धनात अडथळा निर्माण करते. सकाळी फिरणारे काही नागरिक प्राण्यांना अनैसर्गिक अन्न चारण्याचाही प्रयत्न करीत असल्याची कारणे बंदी घालताना प्रशासनाने नमूद केली आहेत.

मात्र बंदीच्या निर्णयाची माहिती हाेताच माॅर्निंग वाॅकर्समध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. गेली अनेक वर्षांपासून रामदासपेठ, धरमपेठ, गाेकुळपेठ, सीताबर्डी, आदी भागांतील २५० ते ३०० नागरिक राेज सकाळी महाराजबागेत फिरायला येतात, तेव्हा कधी प्राण्यांना त्रास झाला नाही, मग आताच का? सकाळी काही थाेडे लाेक फिरतात म्हणून त्रास हाेताे तर राेज हजाराे पर्यटक पैसे देऊन महाराजबागेत येतात, त्यांच्यामुळे प्राण्यांना मजा येते का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाला केवळ पैसा दिसत असून या निर्णयामागे काहीतरी गाैडबंगाल आहे, असा संशयही नागरिकांनी उपस्थित केला. या निर्णयाविराेधात आंदाेलन करू, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे हा मुद्दा सकाळच्या गारव्यात उष्णता निर्माण करील, असे चिन्ह दिसत आहे.

दि. ५ एप्रिलला दाेन गटांत भांडण झाले आणि त्याची तक्रारही पाेलीस स्टेशनला केली आहे. मात्र सकाळच्या सुमारास प्राण्यांना मानवी संपर्कापासून दूर ठेवणे व ठरावीक तासांच्या वर प्राण्यांच्या विचरणात मानवी हस्तक्षेप टाळणे, असे नियम आहेत. त्यामुळे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने आधीच माॅर्निंग वाॅक बंद करण्याचे निर्देश देत अन्यथा मान्यता रद्द करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे हा निर्णय घेणे, हा आमचा नाइलाज आहे.

- डाॅ. सुनील बावस्कर, व्यवस्थापक, महाराजबाग

इतक्या वर्षांपासून नागरिक महाराजबागेत फिरायला जातात. काेराेनामुळे लाेकांमध्ये शुद्ध हवा व आराेग्याबाबत जागृती निर्माण झाली आहे. अशा वेळी हा निर्णय अन्यायकारक आहे. याविराेधात आम्ही आंदाेलन करू.

- राजेश कुंभलकर, महाराजबाग बचाव समिती

इतक्या वर्षांत कधी भांडणाचा विषय आला नाही. त्यामुळे एकदा झालेल्या भांडणाचे निमित्त करून महाराजबाग बंद करणे इतर अनेक नागरिकांसाठी अन्याय करण्यासारखे आहे. याविषयी बाेलून विषय मिटविता येताे. थेट फिरण्यावर बंदी घालणे अयाेग्य आहे. याविषयी आम्ही महाराजबाग प्रशासन व जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत जाऊ.

- राजेश जरगर, माजी नगरसेवक, सीताबर्डी

टॅग्स :environmentपर्यावरणMaharajbagh Nagpurमहाराजबाग नागपूर