शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

एसटीकडून आकारला जातो आहे दुपटीहून अधिक प्रवासी कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2022 09:00 IST

Nagpur News महाराष्ट्र शासन मात्र एसटीकडून १७.५ टक्के प्रवासी कर वसूल करीत आहे.

ठळक मुद्दे दरवर्षी एसटीला कोट्यवधींचा भुर्दंडप्रवासी करातून वगळण्याची मागणी

दयानंद पाईकराव

नागपूर : एसटी महामंडळ बिकट आर्थिक स्थितीतून वाटचाल करीत आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी एसटी महामंडळाकडे निधी नसल्यामुळे अनेकदा कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या बिकट आर्थिक परिस्थितीतून एसटी महामंडळाला बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे. परंतु इतर राज्यात सार्वजनिक प्रवासी कर सात ते आठ टक्के लावण्यात येत असताना महाराष्ट्र शासन मात्र एसटीकडून १७.५ टक्के प्रवासी कर वसूल करीत आहे. यामुळे आधीच तोट्यात असलेल्या एसटीची आर्थिक स्थिती आणखीनच बिकट होत असून महाराष्ट्र शासनाची एसटी बाबतची ही भूमिका रास्त आहे काय ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

एसटी महामंडळ हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे. एसटी बस म्हणजे लालपरी ही महाराष्ट्राची लोकवाहिनी म्हणून ओळखल्या जाते. परंतु बिकट आर्थिक स्थितीमुळे एसटी महामंडळाला घरघर लागत असल्याची स्थिती आहे. तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाकडे कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासही पैसे नसल्यामुळे अनेकदा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

अशा बिकट स्थितीत महाराष्ट्र शासनाने एसटी महामंडळाला या परिस्थितीतून बाहेर काढून गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. एसटी महामंडळाला दरवर्षी १७.५ टक्के म्हणजे कोट्यवधी रुपयांचा प्रवासी कर भरावा लागतो. इतर राज्यांच्या तुलनेत हा कर महाराष्ट्रात दुपटीपेक्षा अधिक आहे. कर्नाटकमध्ये सार्वजनिक प्रवासी वाहतुकीला ५ टक्के द्यावा लागतो. तर इतर राज्यात हा कर १० टक्केपेक्षा कमी आहे.

परंतु महाराष्ट्रात एसटी महामंडळाला इतर राज्यांच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक प्रवासी कर आकारण्यात येत आहे. कोट्यवधी रुपये प्रवासी कराच्या रुपाने भरावे लागत असल्यामुळे एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. यातून एसटी महामंडळाला सावरण्यासाठी राज्य शासनाने प्रवासी करातून एसटीला वगळावे आणि वगळणे शक्य नसल्यास किमान प्रवासी कर आकारण्याची गरज आहे. त्यामुळे गोरगरिबांच्या लालपरीला गतवैभव मिळण्यास मदत होणार आहे. हिवाळी अधिवेशनात एसटी महामंडळाला प्रवासी करातून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

एसटीला वरवरच्या नव्हे तर खोलवरच्या उपायांची गरज

‘ज्या राज्याची दळणवळण व्यवस्था मजबूत असते, त्या राज्याची सर्वांगीण प्रगती होते. त्यामुळे दररोज ६५ लाख लोकांना सुरक्षित सेवा देणाऱ्या लालपरीला प्रवासी कर माफ करणे अत्यंत आवश्यक आहे. हा कर माफ झाला तर प्रवाशांना दर्जेदार सेवा देऊन एसटीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल.’

-संदीप शिंदे, केंद्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना

............

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक