शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

एसटीकडून आकारला जातो आहे दुपटीहून अधिक प्रवासी कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2022 09:00 IST

Nagpur News महाराष्ट्र शासन मात्र एसटीकडून १७.५ टक्के प्रवासी कर वसूल करीत आहे.

ठळक मुद्दे दरवर्षी एसटीला कोट्यवधींचा भुर्दंडप्रवासी करातून वगळण्याची मागणी

दयानंद पाईकराव

नागपूर : एसटी महामंडळ बिकट आर्थिक स्थितीतून वाटचाल करीत आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी एसटी महामंडळाकडे निधी नसल्यामुळे अनेकदा कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या बिकट आर्थिक परिस्थितीतून एसटी महामंडळाला बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे. परंतु इतर राज्यात सार्वजनिक प्रवासी कर सात ते आठ टक्के लावण्यात येत असताना महाराष्ट्र शासन मात्र एसटीकडून १७.५ टक्के प्रवासी कर वसूल करीत आहे. यामुळे आधीच तोट्यात असलेल्या एसटीची आर्थिक स्थिती आणखीनच बिकट होत असून महाराष्ट्र शासनाची एसटी बाबतची ही भूमिका रास्त आहे काय ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

एसटी महामंडळ हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे. एसटी बस म्हणजे लालपरी ही महाराष्ट्राची लोकवाहिनी म्हणून ओळखल्या जाते. परंतु बिकट आर्थिक स्थितीमुळे एसटी महामंडळाला घरघर लागत असल्याची स्थिती आहे. तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाकडे कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासही पैसे नसल्यामुळे अनेकदा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

अशा बिकट स्थितीत महाराष्ट्र शासनाने एसटी महामंडळाला या परिस्थितीतून बाहेर काढून गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. एसटी महामंडळाला दरवर्षी १७.५ टक्के म्हणजे कोट्यवधी रुपयांचा प्रवासी कर भरावा लागतो. इतर राज्यांच्या तुलनेत हा कर महाराष्ट्रात दुपटीपेक्षा अधिक आहे. कर्नाटकमध्ये सार्वजनिक प्रवासी वाहतुकीला ५ टक्के द्यावा लागतो. तर इतर राज्यात हा कर १० टक्केपेक्षा कमी आहे.

परंतु महाराष्ट्रात एसटी महामंडळाला इतर राज्यांच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक प्रवासी कर आकारण्यात येत आहे. कोट्यवधी रुपये प्रवासी कराच्या रुपाने भरावे लागत असल्यामुळे एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. यातून एसटी महामंडळाला सावरण्यासाठी राज्य शासनाने प्रवासी करातून एसटीला वगळावे आणि वगळणे शक्य नसल्यास किमान प्रवासी कर आकारण्याची गरज आहे. त्यामुळे गोरगरिबांच्या लालपरीला गतवैभव मिळण्यास मदत होणार आहे. हिवाळी अधिवेशनात एसटी महामंडळाला प्रवासी करातून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

एसटीला वरवरच्या नव्हे तर खोलवरच्या उपायांची गरज

‘ज्या राज्याची दळणवळण व्यवस्था मजबूत असते, त्या राज्याची सर्वांगीण प्रगती होते. त्यामुळे दररोज ६५ लाख लोकांना सुरक्षित सेवा देणाऱ्या लालपरीला प्रवासी कर माफ करणे अत्यंत आवश्यक आहे. हा कर माफ झाला तर प्रवाशांना दर्जेदार सेवा देऊन एसटीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल.’

-संदीप शिंदे, केंद्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना

............

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक