शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

३२ हजारांवर ग्राहकांनी २०२० पासून वीजबिल भरलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2022 08:00 IST

Nagpur News ३२ हजारांवर ग्राहकांनी २०२० पासून तब्बल ६२५२.९० लाख रुपयांचे बिल भरलेच नाही, तरी त्यांच्याविरुद्ध कारवाई नाही. मग ही वसुलीची कारवाई नेमकी कुणासाठी, असा प्रश्न उपस्थित झाला असून महावितरणचे पितळ उघडले पडले आहे.

ठळक मुद्दे६२५३ लाखांचे वीजबिल थकीतमहावितरणच्या वसुली मोहिमेचे पितळ उघडेऔद्योगिक, वाणिज्यिक ग्राहकांचा समावेश :

कमल शर्मा

नागपूर : कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी वीजबिल भरले नसल्याचे सांगत महावितरणने वसुली मोहीम सुरू केली आहे. काही हजार रुपयांची थकबाकी असली, तरी वीज कनेक्शन कापले जात आहे. दुसरीकडे, मात्र दोन वर्षांपासून वीजबिल न भरणाऱ्या तब्बल ३२,०६८ ग्राहक व कंपन्यांना मात्र संरक्षण दिले जात आहे. या ग्राहकांनी २०२० पासून तब्बल ६२५२.९० लाख रुपयांचे बिल भरलेच नाही, तरी त्यांच्याविरुद्ध कारवाई नाही. मग ही वसुलीची कारवाई नेमकी कुणासाठी, असा प्रश्न उपस्थित झाला असून महावितरणचे पितळ उघडले पडले आहे.

कंपनीने या ग्राहकांची फक्त श्रेणीनिहाय माहिती दिली आहे. ग्राहकांची व्यक्तिगत माहिती दिलेली नाही. दुसरीकडे, सूत्रांचे म्हणणे आहे की, यापैकी अनेक लोक हे वजनदार आहेत. सरकारने केवळ थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दिलासा दिला आहे. मात्र, कंपनीने या थकबाकीदारांकडे पाहणेच बंद केल्याचे दिसून येते. २०२० पासून बिल न भरणाऱ्या ३२,०६८ ग्राहकांपैकी १९१२ ग्राहक विदर्भाचे आहेत. त्यांच्यावर ३८९.५७ लाखा रुपयांची थकबाकी आहे. वर्धा व गोंदिया जिल्ह्यात अशा थकबाकीदारांची संख्या शून्य आहे.

काही कनेक्शन तात्पुरते कापण्यात आले

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, २०२० पासून बिल न भरणाऱ्या गाहकांचीही वीज कापण्यात येईल. त्यांच्यावरही कंपनीचे लक्ष आहे. यातील काहींनी थोडी रक्कम भरून स्वत:ला कारवाईपासून वाचविले आहे. तर काहींची वीज तात्पुरत्या स्वरूपात कापण्यात आली होती. परंतु, काही रक्कम भरून कारवाईपासून वाचण्याचा पर्याय सर्वसामान्य नागरिकांना का दिला जात नाही आहे, याचे उत्तर मात्र कुणी दिले नाही.

 

 

टॅग्स :electricityवीज