शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला आवरण्यासाठी अधिक कडक उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाची लाट थोपविण्यासाठी राज्य सरकार आवश्यक त्या सर्व उपाययोजना करीत आहे. आवश्यकता भासल्यास अधिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाची लाट थोपविण्यासाठी राज्य सरकार आवश्यक त्या सर्व उपाययोजना करीत आहे. आवश्यकता भासल्यास अधिक कडक धोरण राबविल्या जाईल, असे वक्तव्य पालकमंत्री नितीन राऊत यांनी केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने शनिवारी, रविवारी असे दोन दिवस बंद पाळण्याचा निर्णय जाहीर केला. आजच्या पहिल्याच दिवशी जनतेने बंदला कसा प्रतिसाद दिला, ते बघण्यासाठी पालकमंत्री राऊत यांनी शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता बाजारपेठेची पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलले. यावेळी त्यांच्यासोबत महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., पोलीस आयुक्त अमितेशकुमार होते.

कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जनतेचा जीव वाचविणे आमचे आद्यकर्तव्य आहे. त्यासाठी आवश्यकता भासल्यास कडक उपाययोजना करण्यात येईल, असे पालकमंत्री म्हणाले. त्यांनी जनतेला सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले. रविवारी स्पर्धा परीक्षेनिमित्त मोठ्या प्रमाणावर बाहेरगावचे उमेदवार नागपुरात येतील. त्यांची व्यवस्था जिल्हा प्रशासन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

---

दारू कधीपासून झाली अत्यावश्यक?

बंदच्या दरम्यान अत्यावश्यक सेवेची वगळता दुसरी कोणतीही दुकाने सुरू राहणार नाहीत, असे प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र, ठिकठिकाणी देशी-विदेशी दारूची दुकाने सुरू असल्याचे आणि दुकानात मोठी गर्दीही असल्याचे चित्र आज बघायला मिळाले. त्यामुळे ‘दारूची दुकाने कधीपासून अत्यावश्यक सेवेत आली’, असा प्रश्न पत्रकारांनी केला. त्यावर बोलताना ‘हा विषय माझ्या अखत्यारित नाही. तो राज्य सरकारचा निर्णय आहे’, असे म्हणत पालकमंत्र्यांनी विषयाला बगल दिली.

-----