शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

प्रेमविवाहापेक्षा ‘अरेंज्ड मॅरेज’मध्येच होते जास्त ‘तू तू मै मै’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2022 08:00 IST

Nagpur News ‘भरोसा’ सेलकडे आलेल्या प्रकरणांपैकी ६८ टक्के तक्रारी या ‘अरेंज्ड मॅरेज’ झालेल्या दाम्पत्यांचीच आहेत. प्रेमविवाहाच्या तुलनेत ही संख्या फार जास्त आहे.

ठळक मुद्देभरोसा सेलकडे ६८ टक्के तक्रारी संयुक्त कुटुंबपद्धती असूनदेखील वाद वाढीस

योगेश पांडे

नागपूर : महिला अथवा मुलीला तिच्यावर झालेल्या अत्याचारांविरुद्ध लढण्यासाठी शारीरिक आणि मानसिक बळ मिळवून देण्याच्या उद्देशाने नागपूर पोलिसांनी सुरू केलेल्या ‘भरोसा’ सेलकडे पती-पत्नीच्या वादांची प्रकरणे जास्त प्रमाणात येतात. एरवी प्रेमविवाह केल्यानंतर पुढे त्याची परिणिती वादात होते, असा अनेकांचा समज आहे; परंतु ‘भरोसा’ सेलकडे आलेल्या प्रकरणांपैकी ६८ टक्के तक्रारी या ‘अरेंज्ड मॅरेज’ झालेल्या दाम्पत्यांचीच आहेत. प्रेमविवाहाच्या तुलनेत ही संख्या फार जास्त आहे.

जानेवारी २०१७ ते एप्रिल २०२२ या कालावधीत ‘भरोसा’ सेलकडे १० हजार १७३ प्रकरणे दाखल झाली. यात प्रेमविवाह झाल्यावर पती-पत्नीमध्ये वाद विकोपाला गेल्यावर आलेल्या प्रकरणांची संख्या २ हजार ७७४ म्हणजेच २७ टक्के इतकी होती. तर नातेवाईक व घरच्यांच्या संमतीने लग्न ठरविलेल्या दाम्पत्याचा आकडा ६ हजार ९२७ इतका होता. प्रेमविवाहापेक्षा ‘अरेंज्ड मॅरेज’मध्येच जास्त वाद झाल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

संयुक्त कुटुंबातील वादाच्या ४२ टक्के तक्रारी

या कालावधीत संयुक्त कुटुंबातील पती-पत्नींच्या वादाच्या ४ हजार २८३ तक्रारी आल्या. ही टक्केवारी ४२ टक्के इतकी आहे. तर विभक्त कुटुंबात राहणाऱ्या दाम्पत्याच्या वादाच्या ४ हजार ४७८ प्रकरणांची नोंद झाली.

दुसऱ्या विवाहाच्या कमी तक्रारी

भरोसा सेलकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये प्रामुख्याने प्रथम व दुसऱ्या विवाहाच्या तक्रारी जास्त असतात. त्यातही प्रथम विवाहातून निर्माण होणाऱ्या वादांचे प्रमाण जास्त आहे. प्रथम विवाहातील वादातून ९ हजार १६० प्रकरणांची नोंद झाली, तर द्वितीय विवाहानंतरच्या भांडणामुळे ५४१ प्रकरणे नोंदविल्या गेली.

‘लिव्ह-इन’ व प्रेमप्रकरणातील वाददेखील ‘भरोसा’ सेलकडे

केवळ पती-पत्नी किंवा ज्येष्ठ नागरिकच नव्हे तर ‘लिव्ह-इन’मध्ये राहणारे तसेच प्रेमप्रकरण सुरू असलेल्या अविवाहित ‘कपल्स’च्या वादाच्या प्रकरणांचीदेखील ‘भरोसा’ सेलकडे नोंद झाली आहे. २०१७ पासून ‘लिव्ह इन’मधील वादातून ५९, तर प्रेमप्रकरणातील भांडणातून अविवाहित ‘कपल्स’च्या तक्रारीनंतर ९१ प्रकरणे नोंदविण्यात आली.

 

टॅग्स :marriageलग्न