शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

कोरोनामुळे सर्वसमावेशक शिक्षणाचे अधिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 11:13 IST

Nagpur News कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शैक्षणिक धोरणात एकसूत्रता आणण्याचा प्रयत्नच केला नाही. त्यामुळे शैक्षणिक विषमता निर्माण केली आहे. कुठे शाळा सुरू, कुठे बंद असल्याने सर्वसमावेशक शिक्षणाचे नुकसान होत आहे.

ठळक मुद्दे५० टक्के अभ्यासक्रमावर घ्याव्यात बोर्ड परीक्षा राज्यात कुठे शाळा सुरू, तर काही बंद

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शैक्षणिक धोरणात एकसूत्रता आणण्याचा प्रयत्नच केला नाही. त्यामुळे शैक्षणिक विषमता निर्माण केली आहे. कुठे शाळा सुरू, कुठे बंद असल्याने सर्वसमावेशक शिक्षणाचे नुकसान होत आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यापासून घेण्याचा बोर्डाने निर्णय घेतला आहे. वर्षभरात झालेली शिक्षणाची वाताहात लक्षात घेता ५० टक्के अभ्यासक्रमावर बोर्डाच्या परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी आता शिक्षकांकडूनच होऊ लागली आहे.

२०२०-२१ या शैक्षणिक सत्राचे मोठे नुकसान कोरोनाने केले आहे. शासनाने ऑनलाईनच्या माध्यमातून घरोघरी शिक्षण पोहचविण्याचा प्रयत्न केला. पण ते सर्वसमावेशक होऊ शकले नाही. ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण शक्यच झाले नाही. त्याला तांत्रिक अडचणीसह आर्थिक बाबीही कारणीभूत ठरल्या. शहरातील शाळांनी ऑनलाईनच्या माध्यमातून अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा परिणाम अपेक्षित झाला नाही. ऑक्टोबर महिन्यापर्यंत ऑनलाईनचा पर्याय नसलेले विद्यार्थी संभ्रमातच होते. अशात नोव्हेंबरमध्ये आशा बळावली आणि ९ ते १२ वीचे वर्ग सुरू झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेत यायला लागले. शिक्षकांमध्ये उत्साह निर्माण झाला. मिळालेल्या तीन ते चार महिन्यात ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण होईल, या भावनेतून शिक्षक अध्यापनाला लागले. ९ ते १२ वीचे वर्ग सुरळीत सुरू झाल्याने शासनाने ५ ते ८ वीचे वर्ग सुरू करण्याचा प्रयत्न केला. अचानक फेब्रुवारी महिन्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले. आता विद्यार्थी त्याच्या जाळ्यात अडकले. प्रशासनाने त्याचा धसका घेतल्याने पुन्हा शाळा बंद झाल्या. पण हे नागपूर जिल्ह्यात झाले. राज्यातील इतर जिल्ह्यातील शाळा, ज्युनि. कॉलेज सुरू आहेत. वर्गही नियमित होत आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू असताना, नागपूर जिल्ह्यात शाळा बंद झाल्याने अभ्यास बंद झाला आहे.

- शैक्षणिक विषमता निर्माण झाली आहे

दहावी आणि बारावी हे महत्त्वाचे वर्ष आहे. कोरोनामुळे सातत्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात खंड पडला आहे. शहरात काही प्रमाणात ऑनलाईन वर्ग अभ्यासक्रम पूर्ण झाला असला तरी, ग्रामीण भागात शक्य झाले नाही. कोरोनामुळे आताही काही जिल्ह्यात शाळा, ज्युनि. कॉलेज सुरू आहे, तर काही जिल्ह्यात बंद झाल्या आहेत. दहावी आणि बारावीचा राज्यभरात एकच पेपर निघणार आहे. सर्वसमावेशक शिक्षण शक्य नाही. कोरोनामुळे आर्थिक विषमतेसारखी शैक्षणिक विषमता निर्माण झाली आहे.

डॉ. अशोक गव्हाणकर, प्राचार्य

- परिस्थिती लक्षात घेऊन अभ्यासक्रम कमी करा

ऑनलाईन शिक्षणाद्वारे अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकत नाही. शाळा सुरू झाल्यानंतर मिळालेल्या वेळेत ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य नाही. कुठे शाळा सुरू तर कुठे बंद आहे. त्यामुळे परीक्षा या ५० टक्के अभ्यासक्रमावरच घ्याव्यात, अशी आमच्या संघटनेची भूमिका आहे.

योगेश बन, विभागीय कार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद

- शिक्षक भारती बोर्डाच्या सचिवांना निवेदन

५० टक्के अभ्यासक्रमावर माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा घेण्यात याव्यात, यासंदर्भात शिक्षक भारती संघटनेच्या शिष्टमंडळाने बोर्डाच्या सचिव माधुरी सावरकर यांना निवेदन दिले. यावेळी राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे, कार्यवाह दिलीप तडस, संजय खेडीकर, किशोर वरभे, भाऊराव पत्रे, सपन नेहरोत्रा, विलास गभणे, भारत रेहपाडे, दीपक नागपुरे, रामकृष्ण ठाकरे, कोहिनूर वाघमारे, शशांक नंदनवार, तेजराम बागडकर, मधुकर चव्हाण आदी उपस्थित होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEducation Sectorशिक्षण क्षेत्र