शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

भावपूर्ण अनुभूतीचे ‘क्षण एक पुरे...’

By admin | Updated: November 3, 2014 00:43 IST

समाजातील भौतिक सुखांपुढे कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे पाठ फिरविणाऱ्या तरुणाईच्या संकुचित मानसिकतेवर प्रकाश टाकणारे नाट्य म्हणजे ‘क्षण एक पुरे..’ आज अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या

दीपरंग महोत्सव : स्वानंद संस्थेचे सादरीकरण नागपूर : समाजातील भौतिक सुखांपुढे कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे पाठ फिरविणाऱ्या तरुणाईच्या संकुचित मानसिकतेवर प्रकाश टाकणारे नाट्य म्हणजे ‘क्षण एक पुरे..’ आज अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेतर्फे आयोजित दीपरंग नाट्य महोत्सवात सादर करण्यात आले. भावपूर्ण अनुभूतीचे हे नाट्य रसिकांची दाद घेणारे होते. मानवी जीवनातील सर्वच वळणांवर प्रेम, माया, जिव्हाळा या बाबी सुखी व आनंदी जगण्यासाठी अनिवार्य असतात. काही युवकांना मात्र आपल्या गुलाबी प्रेमापुढे घरातील म्हातारी माणसे नकोशी वाटतात. नाना आणि त्याची प्रेयसी तृप्ती यांच्या अनुषंगाने पुढे जाणारे हे नाट्य होते. अंथरुणाला खिळलेले भाऊ, त्यांच्यामुळे उद्भवणारे वाद अधोरेखित करणारे हे कौटुंबिक नाट्य होते. आईच्या जाण्यानंतर मात्र तृप्तीला जीवनातल्या खऱ्या प्रेमाचे महत्त्व कळते. ती भाऊंचा राग करीत असते पण त्याच भाऊंमुळे नाना तिचा स्वीकार करतो. स्वानंद संस्थेतर्फे या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. लेखिका माणिक वड्याळकर यांच्या लेखणीतून उतरलेल्या या भावपूर्ण प्रयोगाचे दिग्दर्शन रोशन नंदवंशी यांनी केले. ऐन तारुण्यात पतीच्या अकाली निधनानंतर खचून न जाता नोकरी सांभाळून घरातील जबाबदाऱ्या निभावणारी, म्हाताऱ्या सासऱ्याची सेवा करणारी सुलभा तर जबाबदाऱ्या नाकारणारी संकुचित मनाची तृप्ती यांच्या वैचारिक विरोधाभासावर हे नाट्य आधारित होते. विकलांग भाऊंची भूमिका श्याम आस्करकर यांनी रसिकांची दाद घेतली. सीमा गोडबोले, स्नेहा अहेर, महेश गोडबोले, विजय अंधारे, आकाश दुधनकर यांनी आपापल्या भूमिकांना न्याय दिला. संजय काशीकर यांचे अनुरूप नेपथ्य होते. प्रकाशयोजना मिथुन मित्रा यांनी केली. संगीत अनिल इंदाणे, वेशभूषा कल्याणी तपासे तर निर्मिती रवींद्र फडणवीस यांनी केली. आर्ट आॅफ अ‍ॅक्चींगच्या विद्यार्थ्यांनी रंगमंच व्यवस्था पाहिली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बँक आॅफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर टी. बी. रमणमूर्ती, इन्फ्रा बिल्डकॉनचे संचालक अर्जुन शहाणे, अर्पित शहाणे, अंजली कदम, लेखक गणेश वडोदकर यांचे स्वागत रमण सेनाड आणि श्रद्धा तेलंग व प्रभा देऊस्कर यांनी केले. (प्रतिनिधी)