शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

पराभव समोर दिसत असल्याने मोदींचा तोल गेला : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:00 IST

पराभव समोर दिसत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तोल गेला आहे. ते वैयक्तिक टीका करीत आहेत. त्यांच्याकडे बोलण्यासाठी मुद्देच नसल्याने ते आता धमक्या देत फिरत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

ठळक मुद्देमुद्देच नसल्याने धमक्या देत आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पराभव समोर दिसत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तोल गेला आहे. ते वैयक्तिक टीका करीत आहेत. त्यांच्याकडे बोलण्यासाठी मुद्देच नसल्याने ते आता धमक्या देत फिरत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.भंडारा-गोंदिया लोकसभेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पाटील नागपूरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पाच वर्षांत काय केले त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही. याकरिता ते पवारांना लक्ष्य करीत आहेत तर दुसरीकडे हिंदुत्वाची हाक देत आहेत. आजवर पंतप्रधान आपल्या भाषणात त्यांनी काय केले आणि भविष्यात काय करणार हे सांगत होते. परंतु मोदी फक्त इतरांची उणीदुणी काढत फिरत आहेत. त्यांनी वेगळाच पायंडा पाडला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ते शेतमालाला दुप्पट हमी भाव देऊ, युवकांना रोजगार देऊ, महागाई, भ्रष्टाचार रोखू अशा भरमसाट घोषणा मागील निवडणुकीच्या पूर्वी केल्या होत्या. यापैकी काहीच केले नाही. त्यांचे महाराष्ट्रातील चेलेही तेच काम करीत आहेत. मोदींच्या चेहऱ्याकडे बघून त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याचे दिसून येते, असेही जयंत पाटील म्हणाले.गरीबांना ७२ हजार रुपये देण्याची घोषणा ही व्यवहारी आहे. रघुराम राजन यांच्यासारख्या अर्थतज्ज्ञांशी चर्चा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार केल्यानंतरच ही घोषणा करण्यात आली आहे. त्याला चांगला प्रतिसादही लाभत आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना आम्ही आघाडीत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते. त्यांची वाटही बघितली. मात्र त्यांनी नकार दिला. त्यांच्या एकाही उमेदवाराला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. एकूणच परिस्थिती झपाट्याने काँंग्रेस आघाडीच्या बाजूने अनुकूल होत असल्याचा दावाही जयंत पाटील यांनी केला. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार प्रकाश गजभिये, अनिल अहीरकर, बाबा गुजर, ईश्वर बाळबुधे, प्रवीण कुंटे, शब्बीर विद्रोही आदी उपस्थित होते.... म्हणून पवारांवर मोदींची टीकाभाजपविरोधी महाआघाडी करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी प्रमुख भूमिका बजावली आहे. सर्वांना एकत्र आणण्याचे कसब त्यांच्यात असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक टीका करीत असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJayant Patilजयंत पाटीलbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019