शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी यांची ‘बॅक डोअर डिप्लोमसी फेल्युअर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2016 03:05 IST

अमेरिकेने पाकिस्तानला सर्वात विकसित असे एफ-१६ हे लढाऊ विमान पुरवठा करण्याचा निर्णय घेऊन आम्ही भारतासोबत नाही पाकिस्तानसोबत आहोत, हे दाखवून दिले आहे.

प्रकाश आंबेडकर : अपयश लपविण्यासाठीच जेएनयू प्रकरण नागपूर : अमेरिकेने पाकिस्तानला सर्वात विकसित असे एफ-१६ हे लढाऊ विमान पुरवठा करण्याचा निर्णय घेऊन आम्ही भारतासोबत नाही पाकिस्तानसोबत आहोत, हे दाखवून दिले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘बॅक डोअर डिप्लोमसी’ ही पूर्णपणे ‘फेल्युअर’ ठरली आहे. आपले हे अपयश लपविण्यासाठीच जेएनयू प्रकरण घडविण्यात आले आहे, असा थेट आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, जेएनयू (जवाहरलाल नेहरू विद्यापीठ) प्रकरण असो की हैदराबाद येथील रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण असो यासंदर्भात केंद्र शासनाची भूमिका ही पूर्णपणे दिशाहीन आणि संभ्रमात टाकणारी आहे. पीडीपीचे अध्यक्ष मुफ्ती मोहम्मद सईद यांनी अफजल गुरू आमचे गुरू आहेत, असे जाहीर वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यातून त्यांनी कधी माघार घेतली नाही. त्याच पीडीपीसोबत भाजपाने हातमिळवणी करून काश्मीरमध्ये सरकार स्थापन केले. त्याच अफजल गुरूसंदर्भातील चर्चा जेव्हा जेएनयूमध्ये होते तेव्हा त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो. तेव्हा भाजपने हे जे केले ते देशद्रोहाच्या कायद्यात बसते की नाही, याचा खुलासा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने करावा, असे आव्हानसुद्धा त्यांनी दिले. केवळ घोषणा दिल्या म्हणून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करता येत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने एक नव्हे दोनदा निर्णय दिला असतानाही केवळ आपले अपयश लपविण्यासाठी शासन तरुणांवर देशद्रोहाचे आरोप लावत असेल तर हे दुर्दैव आहे. हीच आरएसएसची राष्ट्रभक्ती आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)भाजपा-आरएसएसने देशाला ऐरणीवर टाकलेकाश्मीरमध्ये अनेक प्रकारचे लोक राहतात. तेथील अतिरेकी हे वेगवेगळे लढत होते. ते कधीच एकत्र आले नाही. अफजल गुरूच्या फाशीमुळे त्यांना एकत्र येण्याची संधी काँग्रेस आणि भाजपने उपलब्ध करून दिली. तसेच काश्मीरमध्ये आजवर जे काही होत होते, त्याचा आवाज हा देशाबाहेर फारसा जात नव्हता. परंतु जेएनयू प्रकरणामुळे हा मुद्दा आता जगभरात पोहोचला असून काश्मीरप्रश्न आणखी बिकट झाला आहे. याप्रकरणी जी संवेदनशीलता शासनाने दाखवायला हवी होती, त्याचा अभाव दिसून आला. राजकीय लाभासाठी हिंदू मतांच्या ध्रुवीकरणासाठी भाजपा आणि आरएसएसने देशाला ऐरणीवर टाकले आहे, असा आरोपही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. मारहाण करणाऱ्या वकिलांचे परवाने रद्द करावे कन्हय्या याच्यावर न्यायालय परिसरात हल्ला करणाऱ्या वकिलांचे परवाने रद्द करण्यात यावे. बार कौन्सिलने त्यांची सनद रद्द करावी. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि दोषी आढळल्यास शिक्षा करावी, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.