शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
4
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
5
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
6
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
7
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
8
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
9
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
10
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
11
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
12
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
13
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
14
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
15
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
16
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
17
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
18
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
19
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
20
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी

मोदी यांची ‘बॅक डोअर डिप्लोमसी फेल्युअर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2016 03:05 IST

अमेरिकेने पाकिस्तानला सर्वात विकसित असे एफ-१६ हे लढाऊ विमान पुरवठा करण्याचा निर्णय घेऊन आम्ही भारतासोबत नाही पाकिस्तानसोबत आहोत, हे दाखवून दिले आहे.

प्रकाश आंबेडकर : अपयश लपविण्यासाठीच जेएनयू प्रकरण नागपूर : अमेरिकेने पाकिस्तानला सर्वात विकसित असे एफ-१६ हे लढाऊ विमान पुरवठा करण्याचा निर्णय घेऊन आम्ही भारतासोबत नाही पाकिस्तानसोबत आहोत, हे दाखवून दिले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘बॅक डोअर डिप्लोमसी’ ही पूर्णपणे ‘फेल्युअर’ ठरली आहे. आपले हे अपयश लपविण्यासाठीच जेएनयू प्रकरण घडविण्यात आले आहे, असा थेट आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, जेएनयू (जवाहरलाल नेहरू विद्यापीठ) प्रकरण असो की हैदराबाद येथील रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण असो यासंदर्भात केंद्र शासनाची भूमिका ही पूर्णपणे दिशाहीन आणि संभ्रमात टाकणारी आहे. पीडीपीचे अध्यक्ष मुफ्ती मोहम्मद सईद यांनी अफजल गुरू आमचे गुरू आहेत, असे जाहीर वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यातून त्यांनी कधी माघार घेतली नाही. त्याच पीडीपीसोबत भाजपाने हातमिळवणी करून काश्मीरमध्ये सरकार स्थापन केले. त्याच अफजल गुरूसंदर्भातील चर्चा जेव्हा जेएनयूमध्ये होते तेव्हा त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो. तेव्हा भाजपने हे जे केले ते देशद्रोहाच्या कायद्यात बसते की नाही, याचा खुलासा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने करावा, असे आव्हानसुद्धा त्यांनी दिले. केवळ घोषणा दिल्या म्हणून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करता येत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने एक नव्हे दोनदा निर्णय दिला असतानाही केवळ आपले अपयश लपविण्यासाठी शासन तरुणांवर देशद्रोहाचे आरोप लावत असेल तर हे दुर्दैव आहे. हीच आरएसएसची राष्ट्रभक्ती आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)भाजपा-आरएसएसने देशाला ऐरणीवर टाकलेकाश्मीरमध्ये अनेक प्रकारचे लोक राहतात. तेथील अतिरेकी हे वेगवेगळे लढत होते. ते कधीच एकत्र आले नाही. अफजल गुरूच्या फाशीमुळे त्यांना एकत्र येण्याची संधी काँग्रेस आणि भाजपने उपलब्ध करून दिली. तसेच काश्मीरमध्ये आजवर जे काही होत होते, त्याचा आवाज हा देशाबाहेर फारसा जात नव्हता. परंतु जेएनयू प्रकरणामुळे हा मुद्दा आता जगभरात पोहोचला असून काश्मीरप्रश्न आणखी बिकट झाला आहे. याप्रकरणी जी संवेदनशीलता शासनाने दाखवायला हवी होती, त्याचा अभाव दिसून आला. राजकीय लाभासाठी हिंदू मतांच्या ध्रुवीकरणासाठी भाजपा आणि आरएसएसने देशाला ऐरणीवर टाकले आहे, असा आरोपही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. मारहाण करणाऱ्या वकिलांचे परवाने रद्द करावे कन्हय्या याच्यावर न्यायालय परिसरात हल्ला करणाऱ्या वकिलांचे परवाने रद्द करण्यात यावे. बार कौन्सिलने त्यांची सनद रद्द करावी. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि दोषी आढळल्यास शिक्षा करावी, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.