शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
3
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
4
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
6
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
7
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
8
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
9
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
10
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
11
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
12
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
13
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
14
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
15
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
16
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
17
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
18
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
19
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
20
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग

मोदी यांची ‘बॅक डोअर डिप्लोमसी फेल्युअर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2016 03:05 IST

अमेरिकेने पाकिस्तानला सर्वात विकसित असे एफ-१६ हे लढाऊ विमान पुरवठा करण्याचा निर्णय घेऊन आम्ही भारतासोबत नाही पाकिस्तानसोबत आहोत, हे दाखवून दिले आहे.

प्रकाश आंबेडकर : अपयश लपविण्यासाठीच जेएनयू प्रकरण नागपूर : अमेरिकेने पाकिस्तानला सर्वात विकसित असे एफ-१६ हे लढाऊ विमान पुरवठा करण्याचा निर्णय घेऊन आम्ही भारतासोबत नाही पाकिस्तानसोबत आहोत, हे दाखवून दिले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘बॅक डोअर डिप्लोमसी’ ही पूर्णपणे ‘फेल्युअर’ ठरली आहे. आपले हे अपयश लपविण्यासाठीच जेएनयू प्रकरण घडविण्यात आले आहे, असा थेट आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, जेएनयू (जवाहरलाल नेहरू विद्यापीठ) प्रकरण असो की हैदराबाद येथील रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण असो यासंदर्भात केंद्र शासनाची भूमिका ही पूर्णपणे दिशाहीन आणि संभ्रमात टाकणारी आहे. पीडीपीचे अध्यक्ष मुफ्ती मोहम्मद सईद यांनी अफजल गुरू आमचे गुरू आहेत, असे जाहीर वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यातून त्यांनी कधी माघार घेतली नाही. त्याच पीडीपीसोबत भाजपाने हातमिळवणी करून काश्मीरमध्ये सरकार स्थापन केले. त्याच अफजल गुरूसंदर्भातील चर्चा जेव्हा जेएनयूमध्ये होते तेव्हा त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो. तेव्हा भाजपने हे जे केले ते देशद्रोहाच्या कायद्यात बसते की नाही, याचा खुलासा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने करावा, असे आव्हानसुद्धा त्यांनी दिले. केवळ घोषणा दिल्या म्हणून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करता येत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने एक नव्हे दोनदा निर्णय दिला असतानाही केवळ आपले अपयश लपविण्यासाठी शासन तरुणांवर देशद्रोहाचे आरोप लावत असेल तर हे दुर्दैव आहे. हीच आरएसएसची राष्ट्रभक्ती आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)भाजपा-आरएसएसने देशाला ऐरणीवर टाकलेकाश्मीरमध्ये अनेक प्रकारचे लोक राहतात. तेथील अतिरेकी हे वेगवेगळे लढत होते. ते कधीच एकत्र आले नाही. अफजल गुरूच्या फाशीमुळे त्यांना एकत्र येण्याची संधी काँग्रेस आणि भाजपने उपलब्ध करून दिली. तसेच काश्मीरमध्ये आजवर जे काही होत होते, त्याचा आवाज हा देशाबाहेर फारसा जात नव्हता. परंतु जेएनयू प्रकरणामुळे हा मुद्दा आता जगभरात पोहोचला असून काश्मीरप्रश्न आणखी बिकट झाला आहे. याप्रकरणी जी संवेदनशीलता शासनाने दाखवायला हवी होती, त्याचा अभाव दिसून आला. राजकीय लाभासाठी हिंदू मतांच्या ध्रुवीकरणासाठी भाजपा आणि आरएसएसने देशाला ऐरणीवर टाकले आहे, असा आरोपही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. मारहाण करणाऱ्या वकिलांचे परवाने रद्द करावे कन्हय्या याच्यावर न्यायालय परिसरात हल्ला करणाऱ्या वकिलांचे परवाने रद्द करण्यात यावे. बार कौन्सिलने त्यांची सनद रद्द करावी. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि दोषी आढळल्यास शिक्षा करावी, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.