शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

दीक्षाभूमीत येणारे मोदी तिसरे पंतप्रधान

By admin | Updated: April 6, 2017 02:09 IST

समस्त शोषित, वंचितांची प्रेरणा, ऊर्जा आणि क्रांतिभूमी असलेल्या दीक्षाभूमीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या १४ तारखेला भेट देणार आहेत.

अटल बिहारी वाजपेयी व मनमोहन सिंह यांनीही दिली होती भेट आनंद डेकाटे   नागपूर समस्त शोषित, वंचितांची प्रेरणा, ऊर्जा आणि क्रांतिभूमी असलेल्या दीक्षाभूमीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या १४ तारखेला भेट देणार आहेत. दीक्षाभूमीला भेट देणारे ते तिसरे पंतप्रधान असतील. यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंह यांनी दीक्षाभूमीला भेट दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा निश्चित झाला आहे. नागपुरात त्यांचे विविध कार्यक्रम असले तरी खास दीक्षाभूमीसाठीच ते नागपुरात येत आहेत, हे विशेष. यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांनी २७ आॅगस्ट २००० साली तर डॉ. मनमोहन सिंह यांनी १ जुलै २००६ साली पंतप्रधान असताना दीक्षाभूमीला भेट देऊन देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले होते. याशिवाय उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत, लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह, सुशीलकुमार शिंदे, शरद पवार, रामविलास पासवान, सीताराम येचुरी, सुषमा स्वराज, सत्यनारायण जटीया, चौधरी चुन्नीलाला, सोनिया गांधी, राजीव गांधी, बंगारू लक्ष्मण, डॉ. पद्म सिंह पाटील, एस. एम. कृष्णा, अजित जोगी या राजकीय व्यक्तींसह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, अशोक सिंघल, ज्योतिष पीठाचे शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती महाराज, स्वामी सत्यानंद, प्रसिद्ध निर्माते डॉ. जब्बार पटेल आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दीक्षाभूमीला भेटी दिल्या आहेत. सामाजिक न्याय के बिना स्वतंत्रता अधुरी है पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी २७ आॅगस्ट २००० साली दीक्षाभूमीला भेट दिली होती. डॉ. मनमोहन सिंह यांनी १ जुलै २००६ साली भेट दिली. पंतप्रधानांनी दीक्षाभूमीच्या व्हीजीट बुकमध्ये लिहिलेला संदेश आजही सांभाळून ठेवण्यात आलेला आहे. अटल बिहारी वाजपेयी यांनी हिंदीमध्ये केवळ एका ओळीत लिहिलेला ‘सामाजिक न्याय के बिना स्वतंत्रता अधुरी है.’ हा संदेश ऐतिहासिक असाच आहे. डॉ. मनमोहन सिंह यांनी सुद्धा इंग्रजीमध्ये अतिशय थोडक्यात पण मार्गदर्शक असा संदेश लिहिला आहे. (प्रतिनिधी)