शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मोदींनी लोकांना मूर्ख बनवले

By admin | Updated: October 13, 2014 01:12 IST

देशाची सत्ता हस्तगत करण्यासाठी लोकांना चांगले दिवस आणण्याचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी यांनी लोकांना मूर्ख बनवले आहे. आता महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्यासाठी पुन्हा एकदा मोदी लोकांना मूर्ख बनवायला

चिटणीस पार्क : सिनेअभिनेत्री नगमा यांचे प्रतिपादन नागपूर : देशाची सत्ता हस्तगत करण्यासाठी लोकांना चांगले दिवस आणण्याचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी यांनी लोकांना मूर्ख बनवले आहे. आता महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्यासाठी पुन्हा एकदा मोदी लोकांना मूर्ख बनवायला निघाले आहेत, तेव्हा देश तोडणाऱ्या विचारसरणीपासून सावध राहा, मूर्ख बनू नका, असा इशारा सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री आणि काँग्रेसच्या प्रचारक नगमा यांनी आज येथे दिला. मध्य नागपूर मतदार संघातील काँग्रेस-पीरिपाचे उमेदवार डॉ. अनिस अहमद यांच्या प्रचारार्थ रविवारी सायंकाळी चिटणीस पार्कवर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी माजी खासदार विलास मुत्तेमवार, काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा शोभा ओझा, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आ. नदीम जावेद, खा. अविनाश पांडे, राजकुमार पटेल, छत्तीसगडच्या महापौर वाणी राव, डॉ. विठ्ठलराव कोंबाडे, सुजाता कोंबाडे आदी व्यासपीठावर होते. नगमा म्हणाल्या, नरेंद्र मोदी यांनी चांगले दिवस आणण्याचे स्वप्न दाखविले. परंतु सत्ता येताच त्यांची भाषा बदलली. मोदी पंतप्रधान झाल्यावर महागाई वाढली, जीवनावश्यक औषधांच्या किमती भरमसाट वाढल्या. विलास मुत्तेमवार, शोभा ओझा आणि नदीम जावेद यांनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदींसह भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार प्रहार केले. समाजाच्या तोडणाऱ्या विचारसरणीपासून सावध राहण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)विकासासाठी मत द्याभाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोकं लोकांची घरे जाळून मतं मागतात तर काँग्रेस लोकांची घरे बनवून मत मागतात, हा दोन विचारसरणीतल फरक आहे. या देशाला, समाजाला तोडणारी विचारसरणी नको तर जोडणारी हवी. या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी मत द्या, अशी विनंती काँग्रेसचे उमेदवार डॉ. अनिस अहमद यांनी केली. याप्रसंगी त्यांनी मध्य नागपुरात त्यांनी केलेल्या विकास कामांचा पाढा वाचून दाखविला. भाजपचे आमदार गेल्या पाच वर्षात मतदार संघात फिरकलेच नाही. त्यामुळे क्षेत्राचा विकास करण्यासाठी एक वेळ संधी द्या, अशी विनंती त्यांनी केली.