शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
4
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
5
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
6
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
7
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
8
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
9
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
10
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
11
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
12
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
13
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
14
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
15
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
16
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
17
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
18
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
19
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
20
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...

मोदी, फडणवीसांनी इंदिराजींच्या कार्यक्रमांवर बंदी लावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 01:37 IST

ज्या देशाच्या पंतप्रधान म्हणून इंदिराजींनी १७ वर्षे काम केले, त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याचे सौजन्य सध्याचे सरकार दाखवित नाही.

ठळक मुद्देकुमार केतकर यांचा आरोप : यांना स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पुसायचा आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या देशाच्या पंतप्रधान म्हणून इंदिराजींनी १७ वर्षे काम केले, त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याचे सौजन्य सध्याचे सरकार दाखवित नाही. पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांनी तर शासकीय कार्यालयांमध्ये इंदिराजींचे कार्यक्रम घेऊ नका, असे आदेशच काढले आहेत. नेहरू, इंदिराला विरोध करणारे हे लोक २०१९ मध्ये पुन्हा सत्तेत आले तर देशाचा इतिहास बदलतील. देशाला स्वातंत्र्य गांधींनी नव्हे तर गोळवलकर गुरुजींनी मिळवून दिले, असा इतिहास पाठ्यपुस्तकातून शिकवतील. काँग्रेसमुक्त देश करण्याच्या घोषणा देऊन यांना स्वातंत्र्य लढ्याचा इतिहासच पुसायचा आहे, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केली.धनवटे नॅशनल कॉलेज व राजीव गांधी स्टडी सर्कलतर्फे दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. बबनराव तायवाडे होते. या वेळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, अनंतराव घारड, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष शरद वानखेडे, नीलेश कोढे उपस्थित होते. केतकर म्हणाले, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या काळात झालेली सर्व कामे पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे. महिन्यातून एकदा ‘मन की बात’ करून मोठे होण्याचा पंतप्रधान मोदी यांचा भ्रम लवकरच दूर होणार आहे. नेहरू, इंदिरा, राजीव यांना स्वातंत्र्य लढ्याचा व राष्ट्रउभारणीचा एक इतिहास आहे. राहुल गांधी यांच्यावर सातत्याने टीका करून हा वारसा संपविण्याचा प्रयत्न होत आहे. जे लोक लष्करी हुकूमशाही मानणारे आहेत, तेच लोक लोकशाहीच्या मार्गाने सत्तेत आले असून आता हुकूमशाही लादू पाहत आहेत. अनिवासी भारतीयांनी स्वांतंत्र्याचा लढा समृद्ध केला, हे राहुल गांधी यांनी केलेले विधान बरोबर आहे. आरएसएसची संकल्पनाही एनआरआय कडूनच घेण्यात आली असल्याचा दावा त्यांनी केला.खासदार मोदींच्या दहशतीतमोदींना त्यांच्याच पक्षातील खासदारांचा पाठिंबा नाही. मोदींच्या दहशतीमुळे ते दबून आहेत. खासदार नाना पटोले यांनी ते उघडपणे बोलून दाखविले. यशवंत सिन्हा, अरुण शौरी, शत्रुघ्न सिन्हा हे पक्षातील नेते उघडपणे भूमिका घेऊ लागले आहेत. देश काँग्रेसमुक्त तर होणार नाहीच पण ज्या दिवशी मोदींचे पंतप्रधानपद जाईल त्या दिवशी भाजपाच्या विसर्जनास सुरुवात होईल, अशी टाकी केतकर यांनी केली....तर संघच मोदींना बदलेलइंदिराजींना २८२ जागा मिळाल्या तेव्हा काँग्रेसला ४१ टक्के मते मिळाली होती. मोदींना २८२ जागा मिळाल्या तेव्हा भाजपाला ३१ टक्के मते मिळाली आहेत. मोदींच्या भूलथापांमुळे भाजपाला अतिरिक्त १०० जागा मिळाल्या. आता भ्रमनिरास होऊन ही मते माघारी फिरत आहेत. शायनिंग इंडियाच्या वेळी प्रमोद महाजन ३५० जागा जिंकणार असल्याचे सांगत होते. प्रत्यक्षात १३८ जागा आल्या. आताही भाजपाची अपेक्षा तेवढीच आहे. मात्र, १८० वर जागा मिळणार नाही. तसे झाले तर संघच मोदींना बदलण्याची मागणी करेल. कारण, नियोजन आयोगाप्रमाणे मोदी रेशीमबागही विसर्जित करून टाकतील, अशी संघाला भीती आहे, असेही केतकर म्हणाले.