शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

मोदी नावाचा फुगा फुटला  : ज्ञानेश वाकुडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 23:17 IST

नरेंद्र मोदी नावाचा फुगा आता फुटला आहे. ज्या फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडियाचा वापर करून सत्ता हस्तगत करण्यात आली. तो सोशल मीडिया आता भाजपावरच उलटत आहे. २०१४ ची परिस्थिती आता राहिलेली नाही. २०१९ नव्या पर्यायाचा शोधात असून हा पर्याय निश्चितच देता येऊ शकतो, असा दावा प्रसिद्ध कवी व राजकीय विश्लेषक प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी येथे व्यक्त केला.

ठळक मुद्देनव्या पर्यायाच्या शोधात-२०१९

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : नरेंद्र मोदी नावाचा फुगा आता फुटला आहे. ज्या फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडियाचा वापर करून सत्ता हस्तगत करण्यात आली. तो सोशल मीडिया आता भाजपावरच उलटत आहे. २०१४ ची परिस्थिती आता राहिलेली नाही. २०१९ नव्या पर्यायाचा शोधात असून हा पर्याय निश्चितच देता येऊ शकतो, असा दावा प्रसिद्ध कवी व राजकीय विश्लेषक प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी येथे व्यक्त केला.जनमंचतर्फे शनिवारी शंकरनगर चौकातील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात आयोजित ‘नव्या पर्यायाच्या शोधात-२०१९ ’या जनसंवाद कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जनमंचचे ज्येष्ठ सदस्य प्रकाश इटनकर होते. जनमंचचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.प्रा. ज्ञानेश वाकुडकर म्हणाले, देवेगौडा, व्ही.पी. सिंग किंवा मनमोहन सिंह हे पंतप्रधान होतील, असा विचारही कुणी केला होता का? त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकते. पर्यायांची कमतरता नाही. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र देशातील या पाच मोठ्या राज्यांमध्ये एकूण २०८ लोकसभेच्या जागा आहेत. यापैकी १९२ जागा या भाजपाकडे आहेत. २०१४ ची परिस्थिती आता राहिलेली नाही. ही बाब भाजपा व आरएसएसचे अनेक नेतेही खासगीत मान्य करतात. यापैकी अर्ध्या जागाही कमी झाल्या तरी भाजपाला रोखणे कठीण नाही, असे गणितही त्यांनी यावेळी मांडले.भाजपासारखे विकृत सरकार पुन्हा या देशात येऊ नये. बँका बुडाल्या, शेतकरी मोडला, शाळा बंद पडताहेत, विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशीप बंद झाल्या आहेत. दलित, आदिवासी, मुस्लीम, ओबीसी सारेच त्रस्त आहेत. नोटाबंदी ही या देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. देशद्रोहासारखा तो गुन्हा आहे, अशी टीकाही त्यांनी केली.प्रकाश इटनकर यांनी अध्यक्षीय भाषण केले. तर प्रा. शरद पाटील यांनी भूमिका विषद केली. संचालन सुहास खांडेकर यांनी केले.प्रामाणिकपणे काम करणारे राजकारणात यावेराजकारणात चांगली प्रामाणिक माणसं येणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या शहरात राहणाऱ्या  मुलांनी पुढे येण्याची गरज आहे. समाजात अनेक चांगली प्रामाणिकपणे काम करणारी मंडळी आहेत. विद्यार्थी, तरुण, शेतकरी, कवी, प्राध्यापक, पत्रकार, विचारवंत, उद्योजक यांच्यामधूनही नवीन पर्याय पुढे येऊ शकतात. या दिशेने प्रयत्न सुरु असल्याचेही प्रा. वाकुडकर म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूरPoliticsराजकारण