शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

मोदी नावाचा फुगा फुटला  : ज्ञानेश वाकुडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 23:17 IST

नरेंद्र मोदी नावाचा फुगा आता फुटला आहे. ज्या फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडियाचा वापर करून सत्ता हस्तगत करण्यात आली. तो सोशल मीडिया आता भाजपावरच उलटत आहे. २०१४ ची परिस्थिती आता राहिलेली नाही. २०१९ नव्या पर्यायाचा शोधात असून हा पर्याय निश्चितच देता येऊ शकतो, असा दावा प्रसिद्ध कवी व राजकीय विश्लेषक प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी येथे व्यक्त केला.

ठळक मुद्देनव्या पर्यायाच्या शोधात-२०१९

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : नरेंद्र मोदी नावाचा फुगा आता फुटला आहे. ज्या फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडियाचा वापर करून सत्ता हस्तगत करण्यात आली. तो सोशल मीडिया आता भाजपावरच उलटत आहे. २०१४ ची परिस्थिती आता राहिलेली नाही. २०१९ नव्या पर्यायाचा शोधात असून हा पर्याय निश्चितच देता येऊ शकतो, असा दावा प्रसिद्ध कवी व राजकीय विश्लेषक प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी येथे व्यक्त केला.जनमंचतर्फे शनिवारी शंकरनगर चौकातील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात आयोजित ‘नव्या पर्यायाच्या शोधात-२०१९ ’या जनसंवाद कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जनमंचचे ज्येष्ठ सदस्य प्रकाश इटनकर होते. जनमंचचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.प्रा. ज्ञानेश वाकुडकर म्हणाले, देवेगौडा, व्ही.पी. सिंग किंवा मनमोहन सिंह हे पंतप्रधान होतील, असा विचारही कुणी केला होता का? त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकते. पर्यायांची कमतरता नाही. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र देशातील या पाच मोठ्या राज्यांमध्ये एकूण २०८ लोकसभेच्या जागा आहेत. यापैकी १९२ जागा या भाजपाकडे आहेत. २०१४ ची परिस्थिती आता राहिलेली नाही. ही बाब भाजपा व आरएसएसचे अनेक नेतेही खासगीत मान्य करतात. यापैकी अर्ध्या जागाही कमी झाल्या तरी भाजपाला रोखणे कठीण नाही, असे गणितही त्यांनी यावेळी मांडले.भाजपासारखे विकृत सरकार पुन्हा या देशात येऊ नये. बँका बुडाल्या, शेतकरी मोडला, शाळा बंद पडताहेत, विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशीप बंद झाल्या आहेत. दलित, आदिवासी, मुस्लीम, ओबीसी सारेच त्रस्त आहेत. नोटाबंदी ही या देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. देशद्रोहासारखा तो गुन्हा आहे, अशी टीकाही त्यांनी केली.प्रकाश इटनकर यांनी अध्यक्षीय भाषण केले. तर प्रा. शरद पाटील यांनी भूमिका विषद केली. संचालन सुहास खांडेकर यांनी केले.प्रामाणिकपणे काम करणारे राजकारणात यावेराजकारणात चांगली प्रामाणिक माणसं येणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या शहरात राहणाऱ्या  मुलांनी पुढे येण्याची गरज आहे. समाजात अनेक चांगली प्रामाणिकपणे काम करणारी मंडळी आहेत. विद्यार्थी, तरुण, शेतकरी, कवी, प्राध्यापक, पत्रकार, विचारवंत, उद्योजक यांच्यामधूनही नवीन पर्याय पुढे येऊ शकतात. या दिशेने प्रयत्न सुरु असल्याचेही प्रा. वाकुडकर म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूरPoliticsराजकारण