शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

गुन्हे दाखल झालेल्या मनसे नेत्यांनी शरण यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2022 19:48 IST

Nagpur News गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गुन्हे दाखल झालेल्या मनसे नेत्यांनी शरण यावे, अशी भूमिका मांडली आहे. मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बोलत होते.

ठळक मुद्देपोलिसांचे काम कायद्याप्रमाणेच, कुणीही नाराज होण्याचे कामच नाही

नागपूर : हनुमान चालिसा पठणाच्या मुद्द्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मनसैनिकांच्या धरपकडीवर नाराजी व्यक्त केल्याने राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गुन्हे दाखल झालेल्या मनसे नेत्यांनी शरण यावे, अशी भूमिका मांडली आहे. मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बोलत होते.

आरोपीला शोधणे हे पोलिसांचा कामच आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर पोलीस आपले काम करीत आहे. ज्या मनसे नेत्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांनी ताबडतोब पोलिसांकडे शरण आले पाहिजे. त्यांनी तातडीने पोलिसांसमोर उपस्थित व्हावे, असे त्यांनी स्पष्ट केले. मनसे नेत्यांसोबत कशी वागणूक केली पाहिजे याचा मार्गदर्शन आता राज ठाकरेंनीच करायला हवे. पोलीस कायद्याप्रमाणे आपले काम करीत असतात व त्यात गैर काहीही नाही. पोलीस आपल्या पद्धतीनेच काम करणार, त्यामुळे कुणीही नाराज होण्याचे कारण नाही, असे ते म्हणाले.

नागपुरातील स्फोटकांबाबत स्पष्टता नाही

नागपूर रेल्वेस्थानकावर आढळलेल्या स्फोटकांवरदेखील त्यांनी भाष्य केले. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. मात्र, अद्यापपर्यंत स्फोटकांबाबत तपासात स्पष्टता आलेली नाही, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटील