शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

आमदार-नागरिकांचा संताप भोवला, दंगलग्रस्त भागातील ठाणेदाराकडून काढली जबाबदारी

By योगेश पांडे | Updated: April 1, 2025 22:40 IST

१७ मार्च रोजी झालेल्या हिंसाचारानंतर हंसापुरी येथील नागरिकांनी संजय सिंग यांच्याविरोधात नाराजीचा सूर लावला होता.

- योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १७ मार्च रोजी तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दंगलीनंतर स्थानिकांमधील रोष ठाणेदार संजय सिंग यांना भोवला आहे. त्यांच्याकडून ठाणेदारपदाची धुरा काढण्यात आली असून, गुन्हे शाखेतील निरीक्षक शुभांगी देशमुख यांच्याकडे ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याचे आव्हान देशमुख यांच्यासमोर राहणार आहे.

१७ मार्च रोजी झालेल्या हिंसाचारानंतर हंसापुरी येथील नागरिकांनी संजय सिंग यांच्याविरोधात नाराजीचा सूर लावला होता. मध्य नागपुरातील आमदार प्रवीण दटके यांनीदेखील त्यांच्याविरोधात भूमिका घेतली होती व बदलीची मागणी केली होती. सिंग यांच्याकडे काही काळाअगोदरच तहसीलची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र नागरिकांचा रोष लक्षात घेता त्यांच्याऐवजी आता शुभांगी देशमुख यांच्याकडे ठाणेदारपद देण्यात आले आहे. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी याबाबत निर्देश जारी केल. शुभांगी देशमुख या कणखर अधिकारी म्हणून ओळखल्या जातात व तहसीलमध्ये त्यांच्यासमोर अनेक आव्हाने राहणार आहेत.

हिंसाचार पसरविणाऱ्यांना धडा शिकविणार : पोलिस आयुक्तदरम्यान, हिंसाचार पसरविणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवू, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले. मंगळवारी शांतता समितीच्या बैठकीत पोलिस आयुक्त बोलत होते. रामनवमीच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सेंट्रल अव्हेन्यूवरील अग्रसेन भवन येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला तहसील, कोतवाली आणि गणेशपेठ येथील पोलिस अधिकारी आणि शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. दि. १७ मार्चचा हिंसाचार दुर्दैवी होता. पोलिसांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई केली. आवश्यक बळाचा वापर करण्यात आला. हिंसाचारात सहभागी असलेल्या आरोपींना अटक करण्याचे काम सुरू आहे. अनेक आरोपी फरार झाले आहेत. त्यांचा शोध घेतला जाईल आणि त्याला कोणत्याही परिस्थितीत अटक केली जाईल. पोलीस कोणालाही सोडणार नाहीत. आरोपी कितीही शक्तिशाली किंवा प्रभावशाली असले तरी ते गुन्हेगारच आहेत. सोशल मीडियावरील चॅट्स, फोटो, सीसीटीव्ही फुटेजच्या स्वरूपात पोलिसांना आरोपींविरुद्ध अनेक ठोस पुरावे मिळाले आहेत. त्या आधारे, फरार लोकांचा शोध घेतला जात आहे, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.

जर भविष्यात कोणी अशा हिंसाचारात सहभागी झाला तर त्याला एक संस्मरणीय धडा शिकविला जाईल. पोलीस जनतेचे शत्रू नाहीत. फक्त गुन्हेगारांनीच त्याला घाबरावे, असे ते म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूर