शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

आमदार-नागरिकांचा संताप भोवला, दंगलग्रस्त भागातील ठाणेदाराकडून काढली जबाबदारी

By योगेश पांडे | Updated: April 1, 2025 22:40 IST

१७ मार्च रोजी झालेल्या हिंसाचारानंतर हंसापुरी येथील नागरिकांनी संजय सिंग यांच्याविरोधात नाराजीचा सूर लावला होता.

- योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १७ मार्च रोजी तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दंगलीनंतर स्थानिकांमधील रोष ठाणेदार संजय सिंग यांना भोवला आहे. त्यांच्याकडून ठाणेदारपदाची धुरा काढण्यात आली असून, गुन्हे शाखेतील निरीक्षक शुभांगी देशमुख यांच्याकडे ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याचे आव्हान देशमुख यांच्यासमोर राहणार आहे.

१७ मार्च रोजी झालेल्या हिंसाचारानंतर हंसापुरी येथील नागरिकांनी संजय सिंग यांच्याविरोधात नाराजीचा सूर लावला होता. मध्य नागपुरातील आमदार प्रवीण दटके यांनीदेखील त्यांच्याविरोधात भूमिका घेतली होती व बदलीची मागणी केली होती. सिंग यांच्याकडे काही काळाअगोदरच तहसीलची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र नागरिकांचा रोष लक्षात घेता त्यांच्याऐवजी आता शुभांगी देशमुख यांच्याकडे ठाणेदारपद देण्यात आले आहे. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी याबाबत निर्देश जारी केल. शुभांगी देशमुख या कणखर अधिकारी म्हणून ओळखल्या जातात व तहसीलमध्ये त्यांच्यासमोर अनेक आव्हाने राहणार आहेत.

हिंसाचार पसरविणाऱ्यांना धडा शिकविणार : पोलिस आयुक्तदरम्यान, हिंसाचार पसरविणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवू, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले. मंगळवारी शांतता समितीच्या बैठकीत पोलिस आयुक्त बोलत होते. रामनवमीच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सेंट्रल अव्हेन्यूवरील अग्रसेन भवन येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला तहसील, कोतवाली आणि गणेशपेठ येथील पोलिस अधिकारी आणि शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. दि. १७ मार्चचा हिंसाचार दुर्दैवी होता. पोलिसांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई केली. आवश्यक बळाचा वापर करण्यात आला. हिंसाचारात सहभागी असलेल्या आरोपींना अटक करण्याचे काम सुरू आहे. अनेक आरोपी फरार झाले आहेत. त्यांचा शोध घेतला जाईल आणि त्याला कोणत्याही परिस्थितीत अटक केली जाईल. पोलीस कोणालाही सोडणार नाहीत. आरोपी कितीही शक्तिशाली किंवा प्रभावशाली असले तरी ते गुन्हेगारच आहेत. सोशल मीडियावरील चॅट्स, फोटो, सीसीटीव्ही फुटेजच्या स्वरूपात पोलिसांना आरोपींविरुद्ध अनेक ठोस पुरावे मिळाले आहेत. त्या आधारे, फरार लोकांचा शोध घेतला जात आहे, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.

जर भविष्यात कोणी अशा हिंसाचारात सहभागी झाला तर त्याला एक संस्मरणीय धडा शिकविला जाईल. पोलीस जनतेचे शत्रू नाहीत. फक्त गुन्हेगारांनीच त्याला घाबरावे, असे ते म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूर