शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
3
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
5
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
6
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
7
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
8
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
9
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
10
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
11
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
12
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
13
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
14
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
15
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
16
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
17
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
18
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
19
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
20
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

काही बोलघेवडे मंत्री फक्त बोलत राहिले, त्यांनी राजीनामे द्यावेत : चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 17:07 IST

राज्य सरकारचे काही बोलघेवडे मंत्री बोलत राहिले, आणि समाजाचं नुकसान म्हणत राहिले. त्यांच्यामुळेच ओबीसींचे आरक्षण गेले असून त्या ओबीसी मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

नागपूर : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायलयात सुनावणी पार पडली. राज्य सरकारने सादर केलेला अंतरिम अहवाल न्यायालयानं फेटाळला. यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली.

आघाडी सरकारने ओबीसी समाजाशी बेईमानी केली. सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल टेस्ट पूर्ण करा आणि आरक्षण द्या, असं सांगितलं होतं. परंतु, राज्य सरकारने ते केले नाही. तसे केले असते तर आज ही वेळ आली नसती, असा हल्लाबोल बावनकुळे यांनी केला. 

राज्य सरकार वेळकाढूपणा करत आहे. या सरकारने दिशाभूल करणारा अंतिम अहवाल सादर केल्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं असून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दुर्दैवी, आोबीसी समाजाचं मोठ नुकसान करणारा असल्याचे बावनकुळे म्हणाले. राज्य सरकारमधील ओबीसी असलेल्या मंत्र्यांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.

आता आरक्षणाशिवायच आगामी निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्राच्या ७५ टक्के भागामध्ये निवडणुका आहेत. त्यात २००० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. नगर परिषद, नगरपंचायती आणि मोठ्या महानगरपालिकांच्याही निवडणुका होऊ घातल्या आहेत. याचा प्रचंड मोठा फटका समाजाला बसला असून आता ओबीसी नेतृत्वच तयार होणार नाही. ओबीसी समाजाच नेतृत्व घालून टाकण्याची भूमिका या सरकारने घेतली असल्याची टीका त्यांनी केली.

या सरकारचे बोलघेवडे मंत्री फक्त बोलत राहिले आणि समाजाचं नुकसान म्हणत राहिले. त्यांच्यामुळेच ओबीसींचं आरक्षण गेलं आहे. आजच्या स्थितीला महाविकास आघाडी सरकारचे ओबीसी मंत्रीच जबाबदार असून त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी तातडीने राजीनामे द्यावे अशी मागणी बोवनकुळे यांनी केली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणOBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय