शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

मतदार ओळखपत्रात चुका; युवकांत नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 22:52 IST

१८ वर्षावरील युवकांना निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी मतदार नोंदणी करून त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याची मोहीम निवडणूक विभागातर्फे राबविण्यात आली. शहरातील हजारो युवकांनी अर्ज भरून आपली नावे नोंदविली. मात्र अर्जात अचूक माहिती भरलेली असतानाही अनेकांच्या मतदार ओळखपत्रात चुकीची माहिती नोंदविण्यात आली. यामुळे ओळखपत्र असूनही त्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार आहे. ओळखपत्रावरील नावातील चुकामुळे युवकात नाराजी आहे.

ठळक मुद्देमतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १८ वर्षावरील युवकांना निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी मतदार नोंदणी करून त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याची मोहीम निवडणूक विभागातर्फे राबविण्यात आली. शहरातील हजारो युवकांनी अर्ज भरून आपली नावे नोंदविली. मात्र अर्जात अचूक माहिती भरलेली असतानाही अनेकांच्या मतदार ओळखपत्रात चुकीची माहिती नोंदविण्यात आली. यामुळे ओळखपत्र असूनही त्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार आहे. ओळखपत्रावरील नावातील चुकामुळे युवकात नाराजी आहे.विद्यार्थ्यांनी मतदार यादीत नाव नोंदवावे यासाठी महाविद्यालयात मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली. सोबतच जनजागृतीही करण्यात आली. याला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र अर्जात विद्यार्थ्याने आपले नाव श्रेयश राजेश कुंभलकर असे नमूद केले असताना श्रेयश या नावांमध्ये घोळ केला. तसेच वडिलांचे नाव राजेश कुंभारे असे नमूद करण्यात आले आहे, अशा तक्रारी इतरही युवकांनी केलेल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी नागपूर शहरातील २५ हजारांहून अधिक युवकांनी प्रथमच अर्ज भरले. मात्र निवडणूक विभागात नवीन अर्जधारकांची माहिती नोंदविताना चुकीची नोंदविण्यात आली आहे. नावात, वडिलांच्या नावात वा आडनावात चुका आहेत. मतदान करताना मतदार कार्डासोबतच ओळखपत्राची गरज असते. अशावेळी आधार कार्ड, पॅन कार्ड यावरील नाव व मतदार ओळखपत्रातील नावात साम्य नसल्याने अनेकांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही.नावात दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरू असते. परंतु मतदार यादीतील चुकीची दुुरुस्ती १५ मार्चपूर्वी झाली असती तर त्यांची नावे मतदार यादीत आली असती. त्यांना लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हकक बजावता आला असता. परंतु आता ही वेळ संपत आहे. तसेच चुकीची दुरुस्ती करण्याचे अनेक जण टाळतात. अशा मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे.ओळखपत्र बनविण्यापूर्वी पडताळणी व्हावीमतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी आलेल्या अर्जातील मजकूर व बनविण्यात येणाऱ्या ओळखपत्रावरील मजकुराची पडताळणी होण्याची गरज आहे. परंतु पडताळणी होत नसल्याने मतदार ओळखपत्रात चुका राहत असल्याची माहिती युवकांनी दिली.फोटो व मतदार क्रमांकावर मतदान करता येईलमतदार ओळखपत्रात काही चुका असल्या तर त्या दुरुस्तीसाठी बीएलओकडे अर्ज करता येतो. तसेच किरकोळ चुका असल्या तरी ओळखपत्रावर मतदाराचा फोटो आणि मतदान क्रमांक योग्य असला तरी मतदान करता येईल. त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागणार नाही. अशा प्रकारच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येतील.अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpurनागपूर