शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

संसारातील किरकोळ भांडणे क्रूरता नव्हे! हायकोर्टाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 10:25 IST

संसार करताना पत्नी किरकोळ भांडणे करीत असेल आणि पतीचे म्हणणे ऐकत नसेल तर, संबंधित पत्नीला क्रूर ठरवले जाऊ शकत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व नितीन सूर्यवंशी यांनी एका प्रकरणात दिला

ठळक मुद्दे पतीची घटस्फोट मिळण्याची विनंती अमान्य

राकेश घानोडे

नागपूर : संसार करताना पत्नी किरकोळ भांडणे करीत असेल आणि पतीचे म्हणणे ऐकत नसेल तर, केवळ एवढ्याशा कारणावरून संबंधित पत्नीला क्रूर ठरवले जाऊ शकत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व नितीन सूर्यवंशी यांनी एका प्रकरणात दिला व पतीची घटस्फोट मिळण्याची विनंती अमान्य केली.

हिंदू विवाह कायद्यानुसार, पती किंवा पत्नीचे वागणे त्यांना एकमेकांसाेबत राहणे अशक्य करणारे असेल तरच, ते वागणे क्रूरतेमध्ये मोडते. संसार करताना होणाऱ्या सामान्य स्वरूपाच्या वादांना क्रूरता म्हटले जाऊ शकत नाही, असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले. अकोला येथील राजीवने पत्नी दीपालीची वागणूक क्रूरतापूर्ण असल्याचा आरोप करून घटस्फोट मागितला होता. दीपाली किरकोळ मुद्द्यांवरून भांडण करते. त्यामुळे तिच्यासोबत सुखाने संसार करणे अशक्य झाले आहे. तिच्या वागण्यामुळे मानसिक ताण वाढला आहे. ती कोणत्याही ठोस कारणाशिवाय घर सोडून निघून गेली आहे. ती सासरी परत येण्यास तयार नाही. तिची संसार करण्याची इच्छा नाही, असे राजीवचे म्हणणे होते. उच्च न्यायालयाने हा निर्णय देताना राजीवचे आरोप सामान्य स्वरूपाचे ठरवले व दीपालीला क्रूर ठरवणारा कोणताही ठोस पुरावा रेकॉर्डवर नसल्याचे नमूद केले.

कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम

राजीवने सुरुवातीला कुटुंब न्यायालयात घटस्फोट याचिका दाखल केली होती. २७ ऑक्टोबर २०१४ रोजी ती याचिका खारीज झाल्यामुळे त्याने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने ते अपील फेटाळून कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय