शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

मिल मजुराने बांधली दीक्षाभूमीवर विहीर

By admin | Updated: October 21, 2015 03:11 IST

कसल्याही पद्धतीच्या सुखदु:खाची चिंता न करता आंबेडकरी चळवळीसाठी कष्ट उपासणाऱ्यांची संख्या कमी नाही.

भागरथीबाई नंदेश्वर : मजुरीसोबतच बांगडी, कुंकू विकून उभा केला होता पैसासुमेध वाघमारे  नागपूर कसल्याही पद्धतीच्या सुखदु:खाची चिंता न करता आंबेडकरी चळवळीसाठी कष्ट उपासणाऱ्यांची संख्या कमी नाही. यातीलच एक भागरथीबाई नंदेश्वर. एम्प्रेस मिलमध्ये कामगार म्हणून असलेल्या भागरथीबाईने मानवी सन्मानाच्या मार्गातील अवरोध म्हणजे विषमतेला कडाडून विरोध करीत जनमानसात बाबासाहेबांचे विचार पेरले. त्याकाळी पोटाला चिमटा देत पै-पै करून जमवलेल्या पैशातून दीक्षाभूमीवर येणाऱ्या लोकांची तहान भागविण्यासाठी स्वखर्चाने विहीर बांधून दिली.'मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही', अशी गर्जना करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली लाखो दलित बांधवांसह बौद्ध धम्म स्वीकारला. या ऐतिहासिक क्रांतीने दलितांना स्वत्व आणि सत्त्व दोन्हीही दिलं. कर्मविपाकाच्या गाळात रुतलेल्या शोषितांच्या लढ्याला बळ दिलं. जगायला प्रयोजन दिलं. म्हणूनच भागरथीबाईसारख्या अनेक महिलांनी चळवळीच्या निखाऱ्यावर जळत, अपेक्षा न बाळगता समाजासाठी होईल ती मदत केली.नागपुरातील खलासी लाईन येथे राहणाऱ्या भागरथीबाई एम्प्रेस मिलमध्ये कामगार होत्या. त्याकाळचे प्रसिद्ध दलित समाज सुधारक किसन फागू बनसोडे आणि जाईबाई चौधरी यांच्याशी त्यांची ओळख होती. यांच्या प्रभावातूनच त्या दलित चळवळीशी जुळल्या. आपल्या कामगार वस्तीतील अस्पृश्यांच्या वाईट चालीरीतींचा विरोध करून त्या टाकून देण्याचे त्या नेहमीच उपदेश द्यायच्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध धम्माने भागीरथीबाई प्रभावित झाल्या होत्या. समाजाला आपलेही काही देणं लागते म्हणून मोठ्या कष्टाने जमा केलेल्या पैशातून दीक्षाभूमीवर विहीर बांधून दिली. हा पैसा त्यांनी मिलमधील कामासोबतच बांगडी, कुंकू, शिकेकाई विकून उभा केला होता. तसेच भदंत आनंद कौसल्यायन याच्या बुद्धभूमीला जमीन विकत घेण्यासाठी म्हणून त्याकाळी ६०० रुपयांची देणगी दिली. त्याकाळी बाईने बांगड्याचा व्यवसाय करणे नवलाईचा विषय होता. पण महिला भागरथीबाईकडूनच बांगड्या भरून घेत, मात्र त्या बांगड्या भरून घेतल्यानंतर आंघोळ करून घेत असत. समाजातील पोटजाती, भेद नाहिसे व्हावे याकरिता भागरथीबाईंनी आपल्या मुलींचे विवाह इतर पोटजातीमध्ये केले. अस्पृश्यतेचे चटके सहन करणाऱ्या भागरथीबाईनी शेवटपर्यंत विषमतेच्या वाळवंटात समतेची कारंजी फुलविण्याचा प्रयत्न केला. विदर्भातील दलित चळवळीचा (डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणापर्यंत) शोध आर.एस.मुंडले धरमपेठ कॉलेजच्या समाजशास्त्राचे विभाग प्रमुख मोहन भानुदास नगराळे हे घेत आहेत. भागरथीबाई नंदेश्वर यांच्याबद्दलची ही माहिती त्यांनी उपलब्ध करून दिली आहे.