शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

मिल मजुराने बांधली दीक्षाभूमीवर विहीर

By admin | Updated: October 21, 2015 03:11 IST

कसल्याही पद्धतीच्या सुखदु:खाची चिंता न करता आंबेडकरी चळवळीसाठी कष्ट उपासणाऱ्यांची संख्या कमी नाही.

भागरथीबाई नंदेश्वर : मजुरीसोबतच बांगडी, कुंकू विकून उभा केला होता पैसासुमेध वाघमारे  नागपूर कसल्याही पद्धतीच्या सुखदु:खाची चिंता न करता आंबेडकरी चळवळीसाठी कष्ट उपासणाऱ्यांची संख्या कमी नाही. यातीलच एक भागरथीबाई नंदेश्वर. एम्प्रेस मिलमध्ये कामगार म्हणून असलेल्या भागरथीबाईने मानवी सन्मानाच्या मार्गातील अवरोध म्हणजे विषमतेला कडाडून विरोध करीत जनमानसात बाबासाहेबांचे विचार पेरले. त्याकाळी पोटाला चिमटा देत पै-पै करून जमवलेल्या पैशातून दीक्षाभूमीवर येणाऱ्या लोकांची तहान भागविण्यासाठी स्वखर्चाने विहीर बांधून दिली.'मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही', अशी गर्जना करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली लाखो दलित बांधवांसह बौद्ध धम्म स्वीकारला. या ऐतिहासिक क्रांतीने दलितांना स्वत्व आणि सत्त्व दोन्हीही दिलं. कर्मविपाकाच्या गाळात रुतलेल्या शोषितांच्या लढ्याला बळ दिलं. जगायला प्रयोजन दिलं. म्हणूनच भागरथीबाईसारख्या अनेक महिलांनी चळवळीच्या निखाऱ्यावर जळत, अपेक्षा न बाळगता समाजासाठी होईल ती मदत केली.नागपुरातील खलासी लाईन येथे राहणाऱ्या भागरथीबाई एम्प्रेस मिलमध्ये कामगार होत्या. त्याकाळचे प्रसिद्ध दलित समाज सुधारक किसन फागू बनसोडे आणि जाईबाई चौधरी यांच्याशी त्यांची ओळख होती. यांच्या प्रभावातूनच त्या दलित चळवळीशी जुळल्या. आपल्या कामगार वस्तीतील अस्पृश्यांच्या वाईट चालीरीतींचा विरोध करून त्या टाकून देण्याचे त्या नेहमीच उपदेश द्यायच्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध धम्माने भागीरथीबाई प्रभावित झाल्या होत्या. समाजाला आपलेही काही देणं लागते म्हणून मोठ्या कष्टाने जमा केलेल्या पैशातून दीक्षाभूमीवर विहीर बांधून दिली. हा पैसा त्यांनी मिलमधील कामासोबतच बांगडी, कुंकू, शिकेकाई विकून उभा केला होता. तसेच भदंत आनंद कौसल्यायन याच्या बुद्धभूमीला जमीन विकत घेण्यासाठी म्हणून त्याकाळी ६०० रुपयांची देणगी दिली. त्याकाळी बाईने बांगड्याचा व्यवसाय करणे नवलाईचा विषय होता. पण महिला भागरथीबाईकडूनच बांगड्या भरून घेत, मात्र त्या बांगड्या भरून घेतल्यानंतर आंघोळ करून घेत असत. समाजातील पोटजाती, भेद नाहिसे व्हावे याकरिता भागरथीबाईंनी आपल्या मुलींचे विवाह इतर पोटजातीमध्ये केले. अस्पृश्यतेचे चटके सहन करणाऱ्या भागरथीबाईनी शेवटपर्यंत विषमतेच्या वाळवंटात समतेची कारंजी फुलविण्याचा प्रयत्न केला. विदर्भातील दलित चळवळीचा (डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणापर्यंत) शोध आर.एस.मुंडले धरमपेठ कॉलेजच्या समाजशास्त्राचे विभाग प्रमुख मोहन भानुदास नगराळे हे घेत आहेत. भागरथीबाई नंदेश्वर यांच्याबद्दलची ही माहिती त्यांनी उपलब्ध करून दिली आहे.