शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

विधानभवन परिसरात तापले दूध : विरोधकांनी केला सरकारविरुद्ध घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 21:14 IST

राज्यभरात सुरू असलेले दुधासाठीचे आंदोलन विधिमंडळ परिसरात चांगलेच तापले. या आंदोलनावरून विरोधकांनी सरकारला टार्गेट करीत निषेधार्थ विधिमंडळाच्या पायऱ्यावर घंटानाद केला. दूध उत्पादक शेतकऱ्याला प्रति लिटर पाच रुपये अनुदान दिलेच पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी रेटून धरली.

ठळक मुद्देमंत्र्यांनी उडविली आंदोलनाची खिल्ली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभरात सुरू असलेले दुधासाठीचे आंदोलन विधिमंडळ परिसरात चांगलेच तापले. या आंदोलनावरून विरोधकांनी सरकारला टार्गेट करीत निषेधार्थ विधिमंडळाच्या पायऱ्यावर घंटानाद केला. दूध उत्पादक शेतकऱ्याला प्रति लिटर पाच रुपये अनुदान दिलेच पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी रेटून धरली.शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळत नाही. त्यामुळे राज्यभरात शेतकरी रस्त्यावर उतरून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दूध रस्त्यावर फेकत आहे. राज्यभरात सुरू असलेल्या या आंदोलनाचे पडसात सभागृहात उमटले. विरोधकांनी आपल्या मागण्या सरकारपुढे मांडून सभात्याग केला. विधानसभेतील दोन्ही मुख्य विरोधी पक्षातील सदस्यांनी सभागृहाच्या आतूनच ‘भाजप सरकार हाय हाय...’, ‘घंटा सरकार हाय हाय...’च्या घोषणा देत विधानभवनाच्या पायऱ्यांवर येऊन उभे राहत घंटानाद करीत सत्तारूढ सरकारच्या धोरणांचा निषेध केला. यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीने तर शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर ताशेरे ओढले. स्थगनप्रस्तावाद्वारे आम्ही आज दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोेलनाला पाठिंबा देत आहोत. सरकारला शेतकऱ्यांशी काही घेणेदेणे नाही म्हणून आम्ही गाईच्या गळ्यातील घंटा हे प्रतीक म्हणून घंटानाद आंदोलन करीत आहोत.राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते दूध विकणाऱ्याला पाच रुपये कमिशन मिळते आणि दूध उत्पादन करतो त्याचा उत्पादन खर्च निघत नाही. शेतकऱ्यांचे हितैशी म्हणणाऱ्या शिवसेनेला हे का दिसत नाही. सत्तेत सहभागी होऊन शिवसेना दुटप्पी भूमिका भूमिका वठवित आहे. तर भाजपाने सत्तेचा गैरवापर सुरू केला आहे.अजित पवार, नेते, राष्ट्रवादी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधावर दरवाढ न देण्यामागे राज्यातील सरकारचे षड्यंत्र असून गुजरातच्या अमूल कंपनीचे दूध महाराष्ट्रात आणावयाचे आहे.जयंत पाटील, नेते, राष्ट्रवादी शेतकऱ्यांना २२ रुपये लिटरने दुधाला भाव मिळतो आणि प्रत्यक्ष ग्राहकांना ५० रुपये लिटरने दूध मिळत आहे. मग मधले पैसे कुठे जातात. गेल्या चार वर्षांपासून देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या सरकारमधील मंत्री आणि आमदार हे शहरी भागातील आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाचे दुखणे त्यांना कळत नाही.सुभाष पाटील, आमदार, शेकाप

खासदार राजू शेट्टी यांनी पुकारलेले आंदोलन लोकसभा व विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून केले आहे. ३० वर्षापासून मी त्यांच्या आंदोलनातूनच वाटचाल करीत आहो, टँकरमधून दूध कसे फेकायचे, त्यात किती पाणी व किती दूध असते, हे मला ठावुक आहे. त्यामुळे या आंदोलनाला फारसे महत्त्व नाही. या आंदोलनात शेतकरी कमी आणि पक्षाचे कार्यकर्तेच जास्त आहेत. सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८milkदूध