शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

विधानभवन परिसरात तापले दूध : विरोधकांनी केला सरकारविरुद्ध घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 21:14 IST

राज्यभरात सुरू असलेले दुधासाठीचे आंदोलन विधिमंडळ परिसरात चांगलेच तापले. या आंदोलनावरून विरोधकांनी सरकारला टार्गेट करीत निषेधार्थ विधिमंडळाच्या पायऱ्यावर घंटानाद केला. दूध उत्पादक शेतकऱ्याला प्रति लिटर पाच रुपये अनुदान दिलेच पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी रेटून धरली.

ठळक मुद्देमंत्र्यांनी उडविली आंदोलनाची खिल्ली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभरात सुरू असलेले दुधासाठीचे आंदोलन विधिमंडळ परिसरात चांगलेच तापले. या आंदोलनावरून विरोधकांनी सरकारला टार्गेट करीत निषेधार्थ विधिमंडळाच्या पायऱ्यावर घंटानाद केला. दूध उत्पादक शेतकऱ्याला प्रति लिटर पाच रुपये अनुदान दिलेच पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी रेटून धरली.शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळत नाही. त्यामुळे राज्यभरात शेतकरी रस्त्यावर उतरून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दूध रस्त्यावर फेकत आहे. राज्यभरात सुरू असलेल्या या आंदोलनाचे पडसात सभागृहात उमटले. विरोधकांनी आपल्या मागण्या सरकारपुढे मांडून सभात्याग केला. विधानसभेतील दोन्ही मुख्य विरोधी पक्षातील सदस्यांनी सभागृहाच्या आतूनच ‘भाजप सरकार हाय हाय...’, ‘घंटा सरकार हाय हाय...’च्या घोषणा देत विधानभवनाच्या पायऱ्यांवर येऊन उभे राहत घंटानाद करीत सत्तारूढ सरकारच्या धोरणांचा निषेध केला. यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीने तर शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर ताशेरे ओढले. स्थगनप्रस्तावाद्वारे आम्ही आज दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोेलनाला पाठिंबा देत आहोत. सरकारला शेतकऱ्यांशी काही घेणेदेणे नाही म्हणून आम्ही गाईच्या गळ्यातील घंटा हे प्रतीक म्हणून घंटानाद आंदोलन करीत आहोत.राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते दूध विकणाऱ्याला पाच रुपये कमिशन मिळते आणि दूध उत्पादन करतो त्याचा उत्पादन खर्च निघत नाही. शेतकऱ्यांचे हितैशी म्हणणाऱ्या शिवसेनेला हे का दिसत नाही. सत्तेत सहभागी होऊन शिवसेना दुटप्पी भूमिका भूमिका वठवित आहे. तर भाजपाने सत्तेचा गैरवापर सुरू केला आहे.अजित पवार, नेते, राष्ट्रवादी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधावर दरवाढ न देण्यामागे राज्यातील सरकारचे षड्यंत्र असून गुजरातच्या अमूल कंपनीचे दूध महाराष्ट्रात आणावयाचे आहे.जयंत पाटील, नेते, राष्ट्रवादी शेतकऱ्यांना २२ रुपये लिटरने दुधाला भाव मिळतो आणि प्रत्यक्ष ग्राहकांना ५० रुपये लिटरने दूध मिळत आहे. मग मधले पैसे कुठे जातात. गेल्या चार वर्षांपासून देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या सरकारमधील मंत्री आणि आमदार हे शहरी भागातील आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाचे दुखणे त्यांना कळत नाही.सुभाष पाटील, आमदार, शेकाप

खासदार राजू शेट्टी यांनी पुकारलेले आंदोलन लोकसभा व विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून केले आहे. ३० वर्षापासून मी त्यांच्या आंदोलनातूनच वाटचाल करीत आहो, टँकरमधून दूध कसे फेकायचे, त्यात किती पाणी व किती दूध असते, हे मला ठावुक आहे. त्यामुळे या आंदोलनाला फारसे महत्त्व नाही. या आंदोलनात शेतकरी कमी आणि पक्षाचे कार्यकर्तेच जास्त आहेत. सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८milkदूध