शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मिलिंद पखाले यांची ‘वंचित’ला सोडचिठ्ठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 11:42 IST

भाजपला निवडून आणण्यासाठीच वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्यात आली आहे, असा थेट आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते मिलिंद पखाले यांनी केला असून पूर्व विदर्भातील पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांसह भारिप सोडत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

ठळक मुद्देपूर्व विदर्भातील आघाडीला खिंडार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपला निवडून आणण्यासाठीच वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्यात आली आहे, असा थेट आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते मिलिंद पखाले यांनी केला असून पूर्व विदर्भातील पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांसह भारिप सोडत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.मिलिंद पखाले यांनी बुधवारी पत्रपरिषद घेऊन भारिप बहुजन महासंघप्रणित वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या एकूणच राजकारणावर टीका केली. ते म्हणाले, राज्यात काहीही ताकद नसताना ४७ जागी उमेदवार उभे करून वंचित बहुजन आघाडीने आरएसएस व भाजपला सरळ व स्पष्ट पाठिंबा दिला आहे.आंबेडकरी जनतेसह वंचित बहुजनांची मते कुजवण्याचे काम यातून झाले आहे. तसेच वंचित हे नवे लेबलही आम्हाला मान्य नसल्याचे ते म्हणाले. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, असा दावाही त्यांनी केला.यावेळी पत्रकारांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात गौतम वासनिक, विवेक वाकोडे, जोगेंद्र सरदारे, डॉ. जयप्रकाश धोंगडे, अरुण देठे, यशवंत म्हैसके, जगदीश फुलझेले, नरेंद्र ढोणे, दिनकर रामटेके, अजय खळसिंगे, अशोक खंडाळे, ज्ञानदेव इंदुरकर, अंबादास धोंगडे, ज्ञानेश्वर टेंभुर्णे यांची नावे स्वाक्षरीसह होती. तर डॉ. बिंदुसार उके, शालिक नन्नावरे, अंगराज शेंडे, भारत थुलकर यांचीही नावे आहेत. परंतु त्यांची स्वाक्षरी नाही. हे सर्व भारिप सोडत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.‘मिलिंद पखाले आणि त्यांची टीम गेल्या वर्षभरापासून पक्षासाठी कुठलेही काम करीत नव्हती. पक्ष वाढवणे दूर उलट पक्षविरोधी काम करण्याचेच कार्य केले. याउलट प्रकाश आंबेडकरांनी त्यांना प्रवक्तेपद देऊन त्यांना संधी दिली. परंतु त्यांचे पक्षविरोधी कार्य सुरूच होते. याची पक्ष नेतृत्वालाही माहिती झाल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई होणार होती. त्यापूर्वीच त्यांनी पक्ष सोडला हे बरे झाले. ते गेल्याने पक्षाला काहीही फरक पडणार नाही. उलट पक्ष अधिक मजबूत होईल.’-सागर डबरासे, महासचिव,भारिप बहुजन महासंघ.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी