शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
3
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
4
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
5
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
6
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
7
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
8
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
9
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
10
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
11
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
12
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
13
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
14
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
15
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
16
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
17
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

उपराजधानी गाठणार ‘माईलस्टोन’

By admin | Updated: September 15, 2015 05:49 IST

स्वातंत्र्यपूर्व काळापासून नागपूर शहर बदलते जग व विकासाचे साक्षीदार राहिले आहे. शिक्षण, आरोग्य सुविधेसोबतच

नागपूर : स्वातंत्र्यपूर्व काळापासून नागपूर शहर बदलते जग व विकासाचे साक्षीदार राहिले आहे. शिक्षण, आरोग्य सुविधेसोबतच सांस्कृतिक वारसा जपण्याचे कामदेखील नागपूरने केले आहे. हे शहर जरी ‘झीरोमाईल’चे असले तरी येणाऱ्या काळात विकासाचा ‘माईलस्टोन’ गाठण्यात नागपूरला यश येईल, असा विश्वास राष्ट्रपती मुखर्जी यांनी व्यक्त केला. नागपूर महानगरपालिकेचा १५१ वर्षे पूर्णत्व सोहळा सोमवारी मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात थाटात पार पडला. त्यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नागपूरबाबत गौरवोद्गार काढले.देशातील अनेक शहरांची ‘मेट्रो’ शहराच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. नागपूर शहरदेखील यात आघाडीवर आहे. रेल्वे, हवाई वाहतूक, रस्ते इत्यादीबाबतीत नागपूर विकसित आहे. शहराशी संबंधित विविध योजना जर समन्वय ठेवून राबविल्या तर नागपूरला ‘स्मार्ट सिटी’ हा लौकिक मिळविण्यास फारसा वेळ लागणार नाही, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले. त्यांनी आपल्या भाषणात नागपूर महानगरपालिकेच्या दीडशेहून अधिक वर्षांच्या कार्याचा धावता आढावा घेतला. १८६४ सालातील छोटे शहर ते आताचे महानगर असा विकास साधत असताना येथील महानगरपालिकेने नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी टाळली नाही.भविष्यातही जनकल्याणाच्या योजना राबवून या शहराला वेगळी ओळख मिळवून देण्याचे काम महानगरपालिका करेल, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले.पाऊण तास चाललेल्या या कार्यक्रमात खा. कृपाल तुमाने, खा. अजय संचेती, पहिल्या महिला महापौर कुंदाताई विजयकर, आ. कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, अनिल सोले, समीर मेघे, नागो गाणार, सुधीर पारवे, आशिष देशमुख, मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यासह विविध मान्यवरांचा सहभाग होता. प्रास्ताविक महापौर प्रवीण दटके यांनी केले. (प्रतिनिधी)सर्वांना आपलेसे करण्याची नागपूरमध्ये शक्तीराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी यावेळी नागपूरची संस्कृती व येथील नागरिकांच्या सहिष्णुवृत्तीचे भरभरून कौतुक केले. आज नागपूर शहराला ‘कॉस्मोपॉलिटन’ स्वरूप आले आहे. देशाच्या विविध भागांतून रोजगारासाठी शहरात येणारे लोक येथील संस्कृतीशी समरस होतात व निवृत्तीनंतरदेखील ते येथेच स्थायिक होतात. सर्व नागरिक एकत्रित मिळून, मिसळून एकतेने राहतात. सर्वांना आपलेसे करणे हीच नागपूरची सर्वात मोठी शक्ती आहे, असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले.