शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
3
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
4
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
5
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
6
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
7
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
8
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
9
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
10
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
11
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
12
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
13
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
14
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
15
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
16
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
17
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
18
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
20
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त

उपराजधानी गाठणार ‘माईलस्टोन’

By admin | Updated: September 15, 2015 05:49 IST

स्वातंत्र्यपूर्व काळापासून नागपूर शहर बदलते जग व विकासाचे साक्षीदार राहिले आहे. शिक्षण, आरोग्य सुविधेसोबतच

नागपूर : स्वातंत्र्यपूर्व काळापासून नागपूर शहर बदलते जग व विकासाचे साक्षीदार राहिले आहे. शिक्षण, आरोग्य सुविधेसोबतच सांस्कृतिक वारसा जपण्याचे कामदेखील नागपूरने केले आहे. हे शहर जरी ‘झीरोमाईल’चे असले तरी येणाऱ्या काळात विकासाचा ‘माईलस्टोन’ गाठण्यात नागपूरला यश येईल, असा विश्वास राष्ट्रपती मुखर्जी यांनी व्यक्त केला. नागपूर महानगरपालिकेचा १५१ वर्षे पूर्णत्व सोहळा सोमवारी मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात थाटात पार पडला. त्यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नागपूरबाबत गौरवोद्गार काढले.देशातील अनेक शहरांची ‘मेट्रो’ शहराच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. नागपूर शहरदेखील यात आघाडीवर आहे. रेल्वे, हवाई वाहतूक, रस्ते इत्यादीबाबतीत नागपूर विकसित आहे. शहराशी संबंधित विविध योजना जर समन्वय ठेवून राबविल्या तर नागपूरला ‘स्मार्ट सिटी’ हा लौकिक मिळविण्यास फारसा वेळ लागणार नाही, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले. त्यांनी आपल्या भाषणात नागपूर महानगरपालिकेच्या दीडशेहून अधिक वर्षांच्या कार्याचा धावता आढावा घेतला. १८६४ सालातील छोटे शहर ते आताचे महानगर असा विकास साधत असताना येथील महानगरपालिकेने नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी टाळली नाही.भविष्यातही जनकल्याणाच्या योजना राबवून या शहराला वेगळी ओळख मिळवून देण्याचे काम महानगरपालिका करेल, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले.पाऊण तास चाललेल्या या कार्यक्रमात खा. कृपाल तुमाने, खा. अजय संचेती, पहिल्या महिला महापौर कुंदाताई विजयकर, आ. कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, अनिल सोले, समीर मेघे, नागो गाणार, सुधीर पारवे, आशिष देशमुख, मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यासह विविध मान्यवरांचा सहभाग होता. प्रास्ताविक महापौर प्रवीण दटके यांनी केले. (प्रतिनिधी)सर्वांना आपलेसे करण्याची नागपूरमध्ये शक्तीराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी यावेळी नागपूरची संस्कृती व येथील नागरिकांच्या सहिष्णुवृत्तीचे भरभरून कौतुक केले. आज नागपूर शहराला ‘कॉस्मोपॉलिटन’ स्वरूप आले आहे. देशाच्या विविध भागांतून रोजगारासाठी शहरात येणारे लोक येथील संस्कृतीशी समरस होतात व निवृत्तीनंतरदेखील ते येथेच स्थायिक होतात. सर्व नागरिक एकत्रित मिळून, मिसळून एकतेने राहतात. सर्वांना आपलेसे करणे हीच नागपूरची सर्वात मोठी शक्ती आहे, असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले.