शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानी गाठणार ‘माईलस्टोन’

By admin | Updated: September 15, 2015 05:49 IST

स्वातंत्र्यपूर्व काळापासून नागपूर शहर बदलते जग व विकासाचे साक्षीदार राहिले आहे. शिक्षण, आरोग्य सुविधेसोबतच

नागपूर : स्वातंत्र्यपूर्व काळापासून नागपूर शहर बदलते जग व विकासाचे साक्षीदार राहिले आहे. शिक्षण, आरोग्य सुविधेसोबतच सांस्कृतिक वारसा जपण्याचे कामदेखील नागपूरने केले आहे. हे शहर जरी ‘झीरोमाईल’चे असले तरी येणाऱ्या काळात विकासाचा ‘माईलस्टोन’ गाठण्यात नागपूरला यश येईल, असा विश्वास राष्ट्रपती मुखर्जी यांनी व्यक्त केला. नागपूर महानगरपालिकेचा १५१ वर्षे पूर्णत्व सोहळा सोमवारी मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात थाटात पार पडला. त्यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नागपूरबाबत गौरवोद्गार काढले.देशातील अनेक शहरांची ‘मेट्रो’ शहराच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. नागपूर शहरदेखील यात आघाडीवर आहे. रेल्वे, हवाई वाहतूक, रस्ते इत्यादीबाबतीत नागपूर विकसित आहे. शहराशी संबंधित विविध योजना जर समन्वय ठेवून राबविल्या तर नागपूरला ‘स्मार्ट सिटी’ हा लौकिक मिळविण्यास फारसा वेळ लागणार नाही, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले. त्यांनी आपल्या भाषणात नागपूर महानगरपालिकेच्या दीडशेहून अधिक वर्षांच्या कार्याचा धावता आढावा घेतला. १८६४ सालातील छोटे शहर ते आताचे महानगर असा विकास साधत असताना येथील महानगरपालिकेने नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी टाळली नाही.भविष्यातही जनकल्याणाच्या योजना राबवून या शहराला वेगळी ओळख मिळवून देण्याचे काम महानगरपालिका करेल, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले.पाऊण तास चाललेल्या या कार्यक्रमात खा. कृपाल तुमाने, खा. अजय संचेती, पहिल्या महिला महापौर कुंदाताई विजयकर, आ. कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, अनिल सोले, समीर मेघे, नागो गाणार, सुधीर पारवे, आशिष देशमुख, मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यासह विविध मान्यवरांचा सहभाग होता. प्रास्ताविक महापौर प्रवीण दटके यांनी केले. (प्रतिनिधी)सर्वांना आपलेसे करण्याची नागपूरमध्ये शक्तीराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी यावेळी नागपूरची संस्कृती व येथील नागरिकांच्या सहिष्णुवृत्तीचे भरभरून कौतुक केले. आज नागपूर शहराला ‘कॉस्मोपॉलिटन’ स्वरूप आले आहे. देशाच्या विविध भागांतून रोजगारासाठी शहरात येणारे लोक येथील संस्कृतीशी समरस होतात व निवृत्तीनंतरदेखील ते येथेच स्थायिक होतात. सर्व नागरिक एकत्रित मिळून, मिसळून एकतेने राहतात. सर्वांना आपलेसे करणे हीच नागपूरची सर्वात मोठी शक्ती आहे, असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले.