शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मिहान कर्मचारी अपघात; चार कुटुंबे उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 22:45 IST

Nagpur News मिहानमध्ये काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांचा चिचभुवनच्या जवळ शुक्रवारी पहाटे काळाने झडप घातली. या अपघाताने चार कुटुंबे अक्षरश: उद्ध्वस्त झाली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: मिहानमध्ये काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांचा चिचभुवनच्या जवळ शुक्रवारी पहाटे काळाने झडप घातली. या अपघाताने चार कुटुंबे अक्षरश: उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांचा आक्रोश शब्दातीत आहे. मृतांपैकी पीयूष त्याच्या आईवडिलांचा एकमात्र आधार होता. तो चार महिन्यांपूर्वीच कंपनीत लागला होता. त्यामुळे कुटुंबीय स्थिरस्थावर होण्याच्या प्रयत्नात होते. नेहाच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती जेमतेम आहे. तिला अंकित आणि प्रियांशू नामक दोन भाऊ आहेत. आईवडील मिळेल ते काम करतात. सहा महिन्यांपूर्वी नेहाला नोकरी मिळाल्याने तिच्या कुटुंबीयांना मोठा आधार झाला होता. मात्र, नेहासोबत तो आधार हिरावला गेल्याने आईवडिलांची अवस्था फारच वाईट झाली आहे. पायलला आईवडील आणि बहीण आहे. तिच्या कुटुंबीयांचा आक्रोशही पाहवला जात नव्हता. तर वाहनचालक उईकेला वृद्ध वडील, पत्नी, मुलगी आणि एक भाऊ आहे. उईके कुटुंबातील तो एकमात्र कमावता व्यक्ती होता. कंपनीकडून या चार जिवांचे मोल कसे चुकविले जाते, त्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.दोष कुणाचा, पत्ता नाहीया भीषण अपघाताला कोण दोषी आहे, ते कळायला मार्ग नाही. अपघातातून वाचलेला एकमात्र आशीष सरनायकची अवस्था गंभीर आहे. त्यामुळे हा अपघात कसा झाला, ते पोलिसांना कळलेले नाही. माहिती कळाल्यानंतर परिमंडळ एकचे उपायुक्त नुरूल हसन, गुन्हे शाखेचे गजानन शिवलिंग राजमाने आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग अवाड, सोनेगावचे ठाणेदार दिलीप सागर यांनी अपघातस्थळी भेट देऊन हा अपघात कसा झाला, कारला धडक देणारे दुसरे वाहन कोणते, त्याचा शोध घेण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र, शुक्रवारी रात्रीपर्यंत ते स्पष्ट होऊ शकले नाही. कारची समोरासमोर दुसऱ्या वाहनासोबत धडक झाली की समोर चालणाऱ्या अवजड वाहनावर मागून वेगात असलेली अर्टिका धडकली, त्याबाबत नेमका तर्क काढणे अद्याप शक्य झाले नसल्याचे उपायुक्त नुरूल हसन यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :Accidentअपघात