शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

मिहान कर्मचारी अपघात; चार कुटुंबे उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 22:45 IST

Nagpur News मिहानमध्ये काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांचा चिचभुवनच्या जवळ शुक्रवारी पहाटे काळाने झडप घातली. या अपघाताने चार कुटुंबे अक्षरश: उद्ध्वस्त झाली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: मिहानमध्ये काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांचा चिचभुवनच्या जवळ शुक्रवारी पहाटे काळाने झडप घातली. या अपघाताने चार कुटुंबे अक्षरश: उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांचा आक्रोश शब्दातीत आहे. मृतांपैकी पीयूष त्याच्या आईवडिलांचा एकमात्र आधार होता. तो चार महिन्यांपूर्वीच कंपनीत लागला होता. त्यामुळे कुटुंबीय स्थिरस्थावर होण्याच्या प्रयत्नात होते. नेहाच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती जेमतेम आहे. तिला अंकित आणि प्रियांशू नामक दोन भाऊ आहेत. आईवडील मिळेल ते काम करतात. सहा महिन्यांपूर्वी नेहाला नोकरी मिळाल्याने तिच्या कुटुंबीयांना मोठा आधार झाला होता. मात्र, नेहासोबत तो आधार हिरावला गेल्याने आईवडिलांची अवस्था फारच वाईट झाली आहे. पायलला आईवडील आणि बहीण आहे. तिच्या कुटुंबीयांचा आक्रोशही पाहवला जात नव्हता. तर वाहनचालक उईकेला वृद्ध वडील, पत्नी, मुलगी आणि एक भाऊ आहे. उईके कुटुंबातील तो एकमात्र कमावता व्यक्ती होता. कंपनीकडून या चार जिवांचे मोल कसे चुकविले जाते, त्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.दोष कुणाचा, पत्ता नाहीया भीषण अपघाताला कोण दोषी आहे, ते कळायला मार्ग नाही. अपघातातून वाचलेला एकमात्र आशीष सरनायकची अवस्था गंभीर आहे. त्यामुळे हा अपघात कसा झाला, ते पोलिसांना कळलेले नाही. माहिती कळाल्यानंतर परिमंडळ एकचे उपायुक्त नुरूल हसन, गुन्हे शाखेचे गजानन शिवलिंग राजमाने आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग अवाड, सोनेगावचे ठाणेदार दिलीप सागर यांनी अपघातस्थळी भेट देऊन हा अपघात कसा झाला, कारला धडक देणारे दुसरे वाहन कोणते, त्याचा शोध घेण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र, शुक्रवारी रात्रीपर्यंत ते स्पष्ट होऊ शकले नाही. कारची समोरासमोर दुसऱ्या वाहनासोबत धडक झाली की समोर चालणाऱ्या अवजड वाहनावर मागून वेगात असलेली अर्टिका धडकली, त्याबाबत नेमका तर्क काढणे अद्याप शक्य झाले नसल्याचे उपायुक्त नुरूल हसन यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :Accidentअपघात