शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

देशाचा मध्यबिंदू झिरो माईल स्तंभ : नागपुरातून मोजले गेले होते चहुबाजूचे अंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 00:36 IST

भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्यभागी असलेले शहर म्हणून संत्रानगरीची ओळख आहे. जी आज आहे तीच ओळख दोन-अडीचशे वर्षापूर्वीही होती. म्हणूनच भारताचे क्षेत्रफळ आणि चहुबाजूचे अंतर मोजता यावे म्हणून नागपुरातच एक मध्यबिंदू ठरविण्यात आला होता. ब्रिटिशांनी नाव दिलेला तोच हा झिरो माईल स्टोन म्हणून शून्य मैलाचा दगड होय.

ठळक मुद्देब्रिटिशांनी १९०७ मध्ये उभारला होता स्तंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्यभागी असलेले शहर म्हणून संत्रानगरीची ओळख आहे. जी आज आहे तीच ओळख दोन-अडीचशे वर्षापूर्वीही होती. म्हणूनच भारताचे क्षेत्रफळ आणि चहुबाजूचे अंतर मोजता यावे म्हणून नागपुरातच एक मध्यबिंदू ठरविण्यात आला होता. ब्रिटिशांनी नाव दिलेला तोच हा झिरो माईल स्टोन म्हणून शून्य मैलाचा दगड होय.या ठिकाणी एक स्तंभ आणि एका ठिकाणाहून चारही दिशांचे प्रतीक म्हणून चार धावत्या घोड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. वाळूच्या दगडांनी याची निर्मिती करण्यात आल्याचे आणि चार घोडे राजस्थानहून आणण्यात आल्याचे सांगण्यात येते. या झिरो माईलची कथासुद्धा मजेदार अशीच आहे. १७६७ मध्ये देशाचा नकाशा तयार करण्यासाठी ब्रिटिशांनी ट्रिग्नोमॅट्रिक सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना केली होती. या विभागाच्या मार्फत त्यांनी देशात दळणवळणासाठी रस्ते बांधण्याचे काम हाती घेतले होते. देशाचा नकाशा तयार करण्याची जबाबदारी विल्यम लॅम्टन या सैन्य अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आली. विशेष म्हणजे त्यावेळी सध्याचे पाकिस्तान आणि बांग्लादेशही भारताचाच भाग होता व त्यानुसार नागपूर हे मध्यवर्ती केंद्रबिंदू होते. त्यानुसार नकाशाचे काम सुरू झाले. मात्र हे काम सुरू असताना वाटेत वर्ध्याजवळ लॅम्टनचा मृत्यू झाला. त्यामुळे नकाशा तयार करण्याचे काम रखडले. हे काम जवळजवळ थंडबस्त्यात गेले. तब्बल ८४ वर्षांनी म्हणजे १९०७ साली पुन्हा नकाशा तयार करण्याचे काम सुरू झाले. त्याअंतर्गत सीताबर्डी किल्ल्याच्या पायथ्याशी झिरो माईल स्टोन उभारण्यात आला होता. ट्रिग्नोमॅट्रिक सर्व्हेनुसार या झिरो माईल स्तंभाची उंची समुद्र सपाटीपासून १०२०.१७१ फूट इतकी आखण्यात आली होती. हा नकाशा तयार करण्यात आल्यानंतर जवळजवळ १९४७ ला भारताच्या फाळणीपर्यंत याच ठिकाणाहून देशातील शहराचे अंतर मोजले जायचे. पुढे पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर जबलपूरजवळ भारताचा मध्यबिंदू निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे.वर्तमान काळात उपग्रह तंत्रज्ञानाच्या मदतीने कुठलेही अंतर सहज मोजले जाऊ शकते. मात्र त्याकाळात हे कठीण काम झिरो माईलजवळून करण्यात आले. या स्तंभावर देशातील आठ शहरांची लांबी मैलाच्या स्वरूपात उल्लेखित आहे. नागपूर शहर मध्यवर्ती आहे किंवा नाही हा चर्चेचा मुद्दा असू शकतो, मात्र झिरो माईल स्तंभाचे ऐतिहासिक महत्त्व नाकारता येत नाही. १०० वर्षाचा इतिहास या या स्तंभाच्या माध्यमातून चिन्हांकित झाला आहे, म्हणून तो ऐतिहासिक वारसा जोपासण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे.नागपूर मेट्रो करणार सौंदर्यीकरणसीताबर्डी ते कामठी रोडवरील नागपूर मेट्रोचे एक स्टेशन झिरो माईलजवळ राहणार आहे. याअंतर्गत झिरो माईल व बाजूला असलेल्या आदिवासी गोवारी शहीद स्मारकाचे सौंदर्यीकरण मेट्रो प्रशासनाद्वारे करण्यात येणार आहे. परिसरात २० माळ्याच्या दोन इमारती आणि वॉक वे तयार करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Zero Mileझीरो माईलnagpurनागपूर