शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मेट्रोरिजन समिती‘पॉवरलेस’!

By admin | Updated: June 26, 2016 02:45 IST

नागपूर शहरापासून २५ कि.मी. परिसरात प्रस्तावित मेट्रोरिजनच्या विकासावर नियंत्रण ठेवण्यासाठी मेट्रोरिजन समितीची स्थापना करण्यात आली होती.

प्रारूपावर समितीत चर्चाही नाही : समितीचा फायदा काय?नागपूर : नागपूर शहरापासून २५ कि.मी. परिसरात प्रस्तावित मेट्रोरिजनच्या विकासावर नियंत्रण ठेवण्यासाठी मेट्रोरिजन समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीचे सदस्यही निवडणुकीच्या माध्यमातून निवडण्यात आले. मात्र, लोकशाही पद्धतीने निवडलेल्या या समितीला काहीच अधिकार नसल्याचे चित्र समोर आले आहे. नासुप्रने मेट्रोरिजनच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी दिली. विश्वस्त मंडळातील काही सदस्यांनी आक्षेप घेतले असता, त्यांच्यासमक्ष पुन्हा एकदा सादरीकरण करण्यात आले व सुधारणेसह मंजूर करण्यात आला. मात्र, २८ सदस्य असलेल्या मेट्रोरिजन समितीसमोर याचा प्रस्तावदेखील ठेवण्यात आला नाही. समितीची स्थापना कशासाठी ?नागपूर : यावरून ही समिती काय कामाची, समिती स्थापन कशासाठी करण्यात आली, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जनतेचे प्रश्न, तक्रारी ऐकून घेण्यासाठी मेट्रोरिजनच्या समितीमध्ये लोकनियुक्त पदाधिकारी असावेत, असा विचार मांडण्यात आला होता. यातूनच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून समितीचे सदस्य निवडण्यात आले. महापालिकेतील २० व जिल्हा परिषदेतील ८ सदस्यांचा या समितीत समावेश आहे. समितीच्या स्थापनेनंतर फक्त एकदा देखाव्यासाठी समितीची बैठक घेण्यात आली. मात्र, या समितीचे काम काय असेल, अधिकार काय असतील याबाबत समितीतील सदस्यांनाही माहिती देण्यात आलेली नाही. आता तर समितीशी चर्चा न करता मेट्रोरिजनचा आराखडा अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्याची तयारी नासुप्रने केली आहे.या प्रारूपात अजूनही बऱ्याच त्रुटी आहेत. त्याला मंजुरी मिळाली तर मेट्रोरिजनच्या क्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण होईल. नागरिक रस्त्यावर उतरतील. मेट्रोरिजनच्या प्रारूपावर यापूर्वीच ६ हजार ६४९ आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. त्यावर सुनावणी घेण्यात आली. मात्र, नागरिकांनी सुचविलेले बदल किंवा केलेल्या मागणीची दखल घेण्यात आलेली नाही, अशी माहिती आहे.(प्रतिनिधी)