शहरं
Join us  
Trending Stories
1
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
2
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
3
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
4
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
5
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
6
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
7
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
8
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
9
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
10
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
11
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
12
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
13
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
14
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
15
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
16
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
17
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
18
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
19
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
20
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

मेट्रोरिजन आराखडा शेतकऱ्यांसाठी घातक

By admin | Updated: October 4, 2015 03:21 IST

नागपूर मेट्रो रिजन विकास आराखड्यानुसार शेतकऱ्यांना ले-आऊट विकसित करणे, उद्योग उभारणे शक्य होणार नाही.

दोन लाख घरेही ठरणार अवैध : जय जवान जय किसान संघटनेचा जनसुनावणीत विरोध नागपूर : नागपूर मेट्रो रिजन विकास आराखड्यानुसार शेतकऱ्यांना ले-आऊट विकसित करणे, उद्योग उभारणे शक्य होणार नाही. घर बांधताना ते एमआरटीपीच्या कायद्यानुसार परवानगी घेऊन बांधावे लागणार आहे. त्यामुळे हा आराखडा मंजूर झाल्यास दोन लाख घरे अवैध ठरणार आहेत. हा आराखडा शेतकरी, सर्व सामान्य नागरिकांसाठी घातक आहे, असा आक्षेप नोंदवित हा आराखडा रद्द करण्याची जोरदार मागणी जय जवान जय किसान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नैवेद्यम सभागृहात आयोजित जनसुनावणीत लावून धरली. शेतकऱ्यांनी जोरदार नारेबाजी करून मेट्रो रिजन आराखड्याला विरोध दर्शविला. आराखड्याच्या विरुद्ध आलेल्या ६४०० आक्षेपांवर नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्याम वर्धने यांनी जनसुनावणी घेतली. मात्र, या बंदद्वार झालेल्या या जनसुनावणीत अनेक शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे स्वतंत्र खुली सुनावणी घ्यावी, अशी मागणी जय जवान जय किसान संघटनेचे संयोजक प्रशांत पवार यांनी नासुप्रकडे केली होती. यासाठी संघटनेतर्फे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. शेवटी नासुप्रने मागणी मान्य करीत शुक्रवारी खुली जनसुनावणी घेतली. आराखड्याबाबत बोलताना संघटनेचे प्रशांत पवार म्हणाले, आराखड्यात गरीब शेतकऱ्यांच्या मालमत्तेची नासधूस करण्याचे काम होत असून ७२१ गावावरील अन्याय दूर करण्याची मागणी त्यांनी केली. विजय शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीवर वाटेल ते करण्याची मुभा हवी. परंतु ग्रीन झोननुसार त्यांचे अधिकार संपुष्टात येणार आहेत. त्यासाठी सर्वसमावेशक विकास करण्याचे आवाहन त्यांनी केले. माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मेट्रो रिजनचा आराखडा कचऱ्याच्या पेटीत टाकून नवा प्रस्ताव तयार करण्याची मागणी केली. यावेळी सुनावणी समितीचे प्रमुख नासुप्र सभापती श्याम वर्धने, अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार, व्हीएनआयटीचे प्रो. विजय कापसे उपस्थित होते. (प्रतिनिधी)शेतजमिनीचे भाव कमी होणारआराखड्यामुळे नागपूर जिल्ह्यातील सरकारी रेडीरेकनरनुसार असलेले ८० लाख ते १ कोटी प्रति एकरचे भाव २ ते ३ लाख रुपये प्रति एकरवर येणार आहेत. या जमिनी ग्रीन झोनमध्ये असल्यामुळे त्यावर कुठलाही विकास करणे शक्य नाही. त्यामुळे अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या, भूखंड माफिया या जमिनी कमी दरात खरेदी करून त्यावर वेगवेगळ्या योजना टाकण्याची भीती विजय शिंदे यांनी व्यक्त केली. ग्रीन झोन ठरणार घातकनागपूर सुधार प्रन्यासने ७२० गावांच्या विकास आराखड्यात ग्रीन झोनचे रिझर्व्हेशन केले आहे. यानुसार शेतकऱ्यांना शेतीव्यतिरिक्त कुठलाही व्यवसाय, उद्योग किंवा ले-आऊट विकसित करता येणार नाही. आधीच नापिकीमुळे त्रस्त शेतकरी ग्रीन झोनमुळे आणखीनच अडचणीत येणार आहे. याशिवाय ग्रीन झोनमध्ये बदल करण्याचे अधिकार फक्त मंत्रालयाकडेच असल्यामुळे गरीब शेतकऱ्यांना मंत्रालयाच्या चकरा माराव्या लागतील किंवा त्यांना आपल्या जमिनी बिल्डरला विकण्याची पाळी येणार असल्याचे सुभाष बांते यांनी सांगितले.