शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

मेट्रो रिजन आराखड्यास पर्यावरण मंजुरी नाही

By admin | Updated: February 3, 2016 03:03 IST

राज्य सरकारने नागपूर शहराचा मेट्रोरिजन आराखडा प्रसिद्ध करीत त्याला मंजुरी दिली. मात्र, ऐकायलाही आश्चर्य वाटेल की या आराखड्याला वन व पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी मिळालेली नाही.

नागपूर : राज्य सरकारने नागपूर शहराचा मेट्रोरिजन आराखडा प्रसिद्ध करीत त्याला मंजुरी दिली. मात्र, ऐकायलाही आश्चर्य वाटेल की या आराखड्याला वन व पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी मिळालेली नाही.मेट्रो रिजन अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील ९ तालुक्यातील ७२१ गावांचा व त्यात अंतर्गत येणाऱ्या ३ हजार ७०० चौरस किलोमीटरच्या क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. सुमारे आठ लाख लोकसंख्येचा अंतर्भाव असलेल्या या आराखड्यात लाखो हेक्टर शेतमजीन, दोन घरे व सुमारे १० लाख रहिवासी ले-आऊटचा समावेष आहे. वन व पर्यावरण विभागाची मंजुरी नसतानाही हा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे हा आराखडा बेकायदेशीर ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हॅलक्रो कन्सलटिंग इंडिया लि. या कंपनी व नासुप्रने मिळून हा आराखडा तयार केला आहे. लाखो लोकांच्या आयुष्याशी संबंधित असतानाही या आराखड्याला पर्यावरण विभागाची परवानगी घेतली गेली नाही याचेच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. २३ जानेवारी रोजी पर्यावरणाशी संबधित असलेल्या संसदीय स्थायी समितीने नागपूरला भेट दिली. या भेटीत मेट्रो रिजनच्या आराखड्यास पर्यावरण विभागाची मंजुरी नसल्याची बाब उघडकीस आली. जय जवान जय किसान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या समितीची भेट घेत या आराखड्याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.सोबत नियमांचे पालन न करता तयार करण्यात आलेल्या या आराखड्यासाठी जबाबदार असलेल्या घटकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी समितीच्या अध्यक्षांनी याची गंभीर दखल घेतली जाईल, असे आश्वस्त केले. याशिवाय जय जवान जय किसान संघटनेते मेट्रोरिजन आराखड्याविरोधात जनमत घेतले असता ५ लाख १४ हजार नागरिकांनी भाग घेतला होता. यापैकी ४ लाख ५५ हजार म्हणजे सुमारे ९० टक्के मतदारांनी आराखड्याच्या विरोधात मतदान केले होते. (विशेष प्रतिनिधी)