शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

मेट्रो रेल्वे प्रकल्प जनतेच्या सहभागातून पूर्ण व्हावा

By admin | Updated: September 19, 2016 02:41 IST

शहरात ३० हजार कोटींच्या प्रकल्पांचा एकत्रित विकास होणार आहेत. त्यात नऊ हजार कोटींच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा समावेश आहे.

नितीन गडकरी यांचे प्रतिपादन : एसीसीईतर्फे अभियंता दिवसनागपूर : शहरात ३० हजार कोटींच्या प्रकल्पांचा एकत्रित विकास होणार आहेत. त्यात नऊ हजार कोटींच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा समावेश आहे. येणाऱ्या काळात पर्यटन वाढणार असून त्यासाठी मेट्रो रेल्वे हा महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी जनतेचे सहकार्य आवश्यकअसल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. असोसिएशन आॅफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्सच्या (इंडिया) नागपूर शाखेतर्फे पी.टी. मसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अभियंता दिनानिमित्त ‘मेट्रो रेल्वे व नागपूरचा विकास’ या विषयावर लक्ष्मीनगर चौक येथील सायंटिफिक सभागृहात रविवारी आयोजित कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून गडकरी बोलत होते. मंचावर नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे उपमहाव्यवस्थापक (जनसंपर्क व समन्वयक) शिरीष आपटे, असोसिएशन आॅफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्सच्या (इंडिया) नागपूर शाखेचे अध्यक्ष सतीश रायपुरे, उपाध्यक्ष नारायण पळसापुरे, वरिष्ठ सदस्य रवींद्र गंधे उपस्थित होते. (प्रतिनिधी)नागपूर देशातील पहिल्या क्रमांकाचे शहर होणार एकत्रित विकास कामानंतर नागपूर हे देशातील पहिल्या क्रमांकाचे शहर होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, मेट्रो प्रकल्पाला गती मिळाली असून जानेवारी २०१६ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य दिले आहे. विमानतळ ते मिहान या मार्गावर यावर्षीच्या डिसेंबरअखेर ट्रायल होईल, असा संकल्प आहे. यासाठी कार्यरत यंत्रणा आणि अभियंतांचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. त्यासाठी गडकरी यांनी दिल्ली येथे बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांचे उदाहरण दिले. अडीच वर्षे कालावधीत पूर्ण होणारा रस्ता पंतप्रधानांनी ४०० दिवसात पूर्ण करण्यास सांगितले होते. आता या रस्त्याचे काम वेगात सुरू असून सर्व समस्यांवर मात करीत कालवधीत पूर्ण होणार आहे. ग्रामीण भागात विकास कामे करताना जागेचे चारपट आणि शहरात दुप्पट रक्कम देण्याचे निर्धारित केले आहे. त्यामुळे अडचणी सुटल्या आहेत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये यासाठी २० हजार रुपये जमा असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. २८५ लाख टन सिमेंट जमासिमेंटचे रस्ते बांधण्याचे जाहीर केले तेव्हा सिमेंट कंपन्यांनी कार्टेल करून सिमेंट बोरीचे दर ३०० वरून ३५० रुपयांवर नेले. आज आमच्याकडे १२०, १३०, १४० रुपये बोरीप्रमाणे २८५ लाख टन सिमेंट पडून आहे. भ्रष्टाचारमुक्त कामे झाल्यास विकास शक्य असल्याचा टोला गडकरी यांनी लगावला. एकत्रित विकासप्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेस्थानक, विमानतळ आणि बसस्थानकांचा एकत्रित विकास करण्यात येणार आहे. अहमदाबाद, सूरत व बडोदाच्या धर्तीवर नागपुरात बसपोर्टचा विकास होईल. बसपोर्ट एनएचएआय बांधणार आहे. भूमिगत पार्किंग राहील. याशिवाय अपघात जागा शोधून त्याचा विकास करणार असल्याचे गडकरी म्हणाले.अंबाझरी तलावात विवेकानंद यांच्या जीवनावर लाईट व साऊंड शो आणि तेलंखेडी येथे म्युझिकल फाऊंटेन तयार करण्यात येणार आहे.स्टेशनचे डिझाईन विदेशातील स्टेशनसारखेमेट्रो रेल्वेचे प्रत्येक स्टेशन जपान, जर्मनी, इंग्लंड, अमेरिकेतील स्टेशनसारखे राहील. वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बस व सायकल सर्व्हिस राहील. प्रकल्पात ६५ टक्के सोलरचा उपयोग होणार असून त्यावर रेल्वे धावणार असून स्टेशनवरसुद्धा उपयोग होईल. पार्किंग त्रासमुक्त राहील. अजनी ते प्राईड हॉटेलपर्यंत रस्ता, उड्डाण पूल आणि मेट्रो रेल्वे हा तिहेरी संगम राहील. याच मार्गावर मनीषनगर येथील रेल्वेवर उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. एल अ‍ॅण्ड टीचे अभियंते व्यंकटरमन यांनी डिझाईन तयार केले आहे. कमी किंमतीत रोलिंग स्टॉक उपलब्ध व्हावेत म्हणून राज्यात उत्पादन प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. सी-प्लेनची योजनानागपुरात सी-प्लेनची योजना आहे. त्याचे नाव फ्लोटिंग बोट अ‍ॅक्ट असे राहील. कॅनडाच्या धर्तीवर प्रस्ताव तयार करून नागरी उड्डयण विभागाकडे दिला आहे. ९, १२ आणि २८ जागांचे विमान राहील. त्यांची निर्मिती मिहानमध्ये करण्याचा विचार आहे. हे विमान अंबाझरी आणि तेलंखेडी वॉटर पोर्ट येथून चार तासात शेगाव, शिर्डी आणि परत नागपुरात येणार आहे.लंडन स्ट्रीटचा विकासदुसऱ्या टप्प्यात वर्धा रोडवरील लंडन स्ट्रीटवर ३५ हेक्टर जागेचा विकास करण्यात येणार आहे. हफीज कॉन्ट्रक्टर यांनी डिझाईन तयार केले आहे. दोन्ही बाजूला व्यावसायिक झोन उभे राहतील. जवळपास १ ते १.५ लाख चौरस फूट जागा हॉस्पिटलला देण्याचे ठरले आहे. प्रकल्प मनपा बांधणार आहे. एक कि़मी. मेट्रो रेल्वेसाठी ३०० ते ३५० कोटींचा खर्च येतो. तर मेट्रो रेल्वेसाठी ५० कोटी रुपये लागतात. त्यामुळे या भागात मेट्रो रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याचे गडकरी म्हणाले.