शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

 नागपुरात  मेट्रोच्या प्रवासी संख्येत ११ टक्के वाढ : १८,०७७ नागरिकांनी केला प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 00:32 IST

महामेट्रोच्या दोन्ही मार्गावरील सेवा सुरू झाली असून, प्रत्येक आठवड्यात प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत काल रविवारी प्रवाशांच्या संख्येत तब्बल ११ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.

ठळक मुद्देएका दिवसात ३.२५ लाखाचे उत्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रोच्या दोन्ही मार्गावरील सेवा सुरू झाली असून, प्रत्येक आठवड्यात प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत काल रविवारी प्रवाशांच्या संख्येत तब्बल ११ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. रविवारी १८,०७७ नागरिकांनी ऑरेंज आणि अ‍ॅक्वा मार्गावर मेट्रोने प्रवास केला. यातून ३.२५ लाखाचे उत्पन्न महामेट्रोला प्राप्त झाले आहे. ऑरेंज लाईन मार्गिकेवर दर १५ मिनिटांनी तसेच अ‍ॅक्वा लाईन मार्गिकेवर दर ३० मिनिटांनी प्रवासी सेवा सुरू आहे. सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर किवा वासुदेव नगरपर्यंत प्रवास करण्यासाठी प्रवाशांना केवळ २० रुपये मोजावे लागत असून, सीताबर्डी इंटरचेंज ते सुभाषनगर, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स किवा झाशी राणी चौक मेट्रो स्टेशनपर्यंतच्या प्रवासासाठी केवळ १० रुपये मोजावे लागतात. मुख्य म्हणजे मेट्रोने आता शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थी प्रवास करू लागले आहेत.लोकमान्यनगर ते खापरी, न्यू एअरपोर्ट, एअरपोर्ट साऊथ, एअरपोर्ट आणि जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशनदरम्यान प्रवासी दर ३० रुपये आहे. शहराच्या दोन्ही मुख्य रस्त्यावर मेट्रो सेवा सुरू झाल्याने नागरिकांचा मोठा फायदा झाला आहे. अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या मार्गाहून प्रवास करीत आहेत. ऑरेंज लाईन मार्गिकेवर जयप्रकाशनगर, एअरपोर्ट, एअरपोर्ट साऊथ, न्यू एअरपोर्ट आणि खापरी मेट्रो स्टेशन तसेच अ‍ॅक्वा लाईन मार्गिकेवरील झाशी राणी, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स, सुभाषनगर, वासुदेवनगर आणि लोकमान्य नगर मेट्रो स्टेशनवर सेवा उपलब्ध आहे.

टॅग्स :Metroमेट्रोpassengerप्रवासी