शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

नागपुरातील क्वारंटाईन केंद्र असलेल्या आमदार निवासात जेवणावरुन गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 11:08 IST

संस्थात्मक ‘क्वारंटाईन’ केंद्र असलेल्या आमदार निवासातील जेवण व नाश्त्याचे कंत्राट संपल्याने क्वॉरंटाईन असलेल्या संशयितांना रविवारी सकाळी ८ वाजता दिला जाणारा नाश्ता सकाळी ११ वाजता तर दुपारचे १२ वाजताचे जेवण सायंकाळी ४ वाजता मिळाले. या प्रकारावरून आमदर निवासात चांगलाच गोंधळ उडाला.

ठळक मुद्देदुपारचे जेवण दिले ४ वाजताजेवणाचा कंत्राटदार बदलला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संस्थात्मक ‘क्वारंटाईन’ केंद्र असलेल्या आमदार निवासातील जेवण व नाश्त्याचे कंत्राट संपल्याने क्वॉरंटाईन असलेल्या संशयितांना रविवारी सकाळी ८ वाजता दिला जाणारा नाश्ता सकाळी ११ वाजता तर दुपारचे १२ वाजताचे जेवण सायंकाळी ४ वाजता मिळाले. या प्रकारावरून आमदर निवासात चांगलाच गोंधळ उडाला.आमदार निवासात ४५० हून अधिक संशयित ‘क्वॉरंटाईन’ आहेत. यांच्या दोन वेळचे जेवण, दोन वेळचा नाश्ता व चहाचे कंत्राट आमदार निवासातील कंत्राटदाराला देण्यात आले होते. परंतु आज या कंत्राटदाराचे कंत्राट संपले. यामुळे सकाळचा नाश्ता व जेवणाचे कंत्राट दुसऱ्या पुरवठादाराला देण्यात आले. परंतु पहिल्याच दिवशी त्याने उशीर केला. येथे ‘क्वारंटाईन’ असलेल्या एकाने ‘लोकमत’ला फोन करून सांगितले, सकाळचा ८ वाजता मिळणारा नाश्ता १०.३० ते ११ वाजताच्या दरम्यान मिळाला. हा नाश्ता अस्वच्छ वाहनातून आणण्यात आला होता. त्याचा दर्जा चांगला नव्हता. जुना कंत्राटदार प्रत्येकाच्या खोलीपर्यंत जेवण नेऊन द्यायचा, परंतु नव्या कंत्राटदाराने खालीच नाश्त्याचे साहित्य ठेवल्याने अनेकांना अडचणीचे गेले. याला घेऊन गोंधळ उडाला. यामुळे येथील अधिकाऱ्यांनी पोलिसांना सूचना दिली. शीघ्र कृती पथकही तैनात करण्यात आले. दुपारचे जेवणही ३.३० ते ४ वाजताच्या दरम्यान आले. खोलीत पोहचायलाही बराच वेळ लागला.या संदर्भात उपविभागीय अधिकारी शेखर गाडगे म्हणाले, जुन्या कंत्राटदाराचे दर खूप जास्त होते. यामुळे आजपासून नवीन कंत्राटदार नेमण्यात आला. परंतु त्याला सेवा देणे शक्य होत नसल्याचे दिसून आले. त्याच्याकडून सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवण देण्यात आले. यात थोडा उशीर झाला. यामुळे हा कंत्राटदार बदलवून नव्या कंत्राटदाराला नाश्ता, चहा, व भोजनाचे कंत्राट देण्यात आले. आता सर्वकाही सुरळीत असल्याचेही गाडगे म्हणाले.स्वच्छता व पाण्याची समस्याआमदार निवासात ‘क्वारंटाईन’ असलेल्या दोन युवकांनी एक व्हिडीओ व्हायरल करून येथे पाण्याची समस्या असल्याचे सांगितले. तसेच सफाई नियमित होत नसल्याचीही तक्रार केली. विशेष म्हणजे, नमुन्याचा अहवाल लवकर मिळत नाही. जे पॉझिटिव्ह रुग्ण आले आहेत त्यांचा अहवालाही उशिरा येत असल्याने त्यांच्यापासून इतरांना लागण होण्याची भीती असल्याचेही त्यांनी व्हिडीओत म्हटले आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस