शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

मनपात १५१ नगरसेवक

By admin | Updated: May 13, 2016 03:09 IST

राज्य सरकारने नागपूर महापालिकेत चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सहा नगरसेवक वाढले : शेवटचा प्रभाग तीन सदस्यांचा कमलेश वानखेडे नागपूरराज्य सरकारने नागपूर महापालिकेत चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या प्रभाग रचनेत महापालिकेत सहा नगरसेवक आणखी वाढणार आहेत. नगरसेवकांची संख्या १४५ वरून १५१ होणार आहे. वाढीव लोकसंख्या व नव्या वस्त्यांचा शहरात समावेश होणार असल्याने ही संख्या वाढणार आहे. यामुळे राजकीय पक्षांनाही आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन खूश करण्याची संधी मिळणार आहे.हुडकेश्वर- नरसाळा या भागाचा समावेश नव्यानेच नागपूर शहरात करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात दोन नगरसेवक वाढतील.यापूर्वीची प्रभाग रचना २००१ च्या लोकसंख्येनुसार करण्यात आली होती. त्यामुळे नगरसेवकांची संख्या १४५ वर पोहोचली होती. आता तर २०११ च्या लोकसंख्येनुसार प्रभाग रचना होणार आहे. वाढीव लोकसंख्येमुळे नगरसेवकांची संख्या वाढून १५१ होणार आहे. प्रत्येकी चार सदस्यांचे ३७ प्रभाग होतील. शेवटचा प्रभाग ३ सदस्यांचा असेल. ५० टक्के महिला आरक्षणामुळे प्रत्येक प्रभागात दोन महिला सदस्य असतील व शेवटच्या तीन सदस्यांच्या प्रभागातही दोन महिला सदस्य राहतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्य सरकारतर्फे लवकरच अधिसूचना जारी होणार असून त्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल. सध्या दोन नगरसेवकांचा एक प्रभाग आहे. चार सदस्यांचा प्रभाग करायचा असल्याचे सध्या असलेले दोन प्रभाग एकत्र केले जातील, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, नगरसेवकांची संख्या वाढणार असल्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या जवळपास सर्वच प्रभागांच्या भौगोलिक रचनेत काहीअंशी बदल होणार आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या दोन सदस्यीय प्रभाग रचनेत शेवटच्या जयताळा प्रभागात तीन सदस्य आहेत. यापूर्वी महापालिकेत तीन सदस्यीय प्रभाग रचना असताना महाल दक्षिणामूर्ती चौक हा शेवटचा प्रभाग ठरला होता व तेथे चार सदस्य आले होते. आता नवीन प्रभाग रचना ‘क्लॉक वाईज’ होते की ‘झिग झॅग’ पद्धतीने, यावर बरेच काही अवलंबून आहे. अधिकृत ‘अ’ दर्जासह फायदेही मिळणारनगरसेवकांची संख्या १५० पेक्षा जास्त झाली तर संबंधित महापालिकेला राज्य सरकारतर्फे ‘अ’ दर्जा दिला जातो. महापालिकेत १४५ नगरसेवक असतानाही राज्य सरकारने गेल्या वेळी महापालिकेला ‘अ’ दर्जा देण्यास तत्त्वत: मंजुरी दिली होती. मात्र, त्याचे फारसे फायदे महापालिकेला मिळाले नाहीत. आता नगरसेवकांची संख्या १५१ होणार असल्यामुळे महापालिकेला अधिकृतपणे ‘अ’ दर्जा मिळेल व त्याचे सर्व फायदेही मिळतील. भाजप खूश, काँग्रेसचे मंथन चार सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती मिळाल्याने भाजप नेते व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. पक्ष व संघटनेच्या बळावर आता निवडणूक जिंकणे सोपे होईल, असा दावा भाजप नेते करीत आहेत. दुसरीकडे काँग्रेस नेत्यांचे या विषयावर मंथन सुरू असून नफा-तोट्याचा हिशेब मांडला जात आहे. अपक्ष नगरसेवकांमध्ये नाराजी असून राष्ट्रवादी व शिवसेनेने तर या निर्णयावर नापसंती व्यक्त केली आहे.