शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गांधीजींच्या योगदानावर संशय घेणाऱ्यांची मानसिकता हिंसक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 20:06 IST

आज काही लोक गांधीजींच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळाले नाही असे बोलतात. अशांची मानसिकताच हिंसक असल्याची टीका ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत अ‍ॅड. मा.म.गडकरी यांनी केली.

ठळक मुद्देमा.म.गडकरी : कस्तुरबा जयंतीनिमित्त बा-बापू मुक्तांगणाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंसेच्या मार्गाने राष्ट्र बळकावली जाऊ शकतात, मात्र त्यातून प्रश्न सुटत नाही. कोणत्याही लढ्यासाठी अहिंसेचा मार्ग हाच पर्याय आहे, याची जाणीव महात्मा गांधी यांनी जगाला करून दिली. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सामान्य जनतेच्या मनात स्वातंत्र्याची आकांक्षा निर्माण व्हावी लागते. गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने ही ज्योत जागविण्याचे काम केले त्यामुळे देशातील जनता त्यांच्यासोबत स्वातंत्र्य लढ्यात सामील झाली. आज काही लोक गांधीजींच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळाले नाही असे बोलतात. अशांची मानसिकताच हिंसक असल्याची टीका ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत अ‍ॅड. मा.म.गडकरी यांनी केली.कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त कस्तुरबा भवन, बजाजनगर येथे बुधवारी बा-बापू मुक्तांगण व चरखा मंदिराचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ गांधीवादी लीलाताई चितळे, सुरेखा देवघरे, महाराष्ट्र गांधी स्मारक समितीचे सुनील पाटील, चित्रा तुर, रवी गुडधे आदी उपस्थित होते. अ‍ॅड. गडकरी म्हणाले, गांधीजींनी देशाला हिंसेच्या मार्गातून अहिंसेकडे नेले. अ‍ॅड. गडकरी यांनी कस्तुरबा पारशिवनीच्या शाळेच्या उद्घाटनाला आल्याची आठवण यावेळी नमूद केली. कस्तुरबांनी मनापासून गांधीजींच्या कार्यात सहभाग घेतल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी लीलाताई चितळे म्हणाल्या, कस्तुरबा हे निष्ठेचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी स्त्रीत्व कमी पडू दिले नाही आणि पुरुषांशी स्पर्धाही केली नाही. कस्तुरबा त्याग अंगिकारणाऱ्या जीवनाची प्रेरणा होत्या. आज दिशा दाखविण्यासाठी नव्या पिढीसमोर कोणते आदर्श ठेवावेत, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहनही तरुणांना केले.यावेळी सुरेखा देवघरे यांनी मोहनदास गांधी ते ‘महात्मा’पर्यंतच्या प्रवासात कस्तुरबा यांच्या योगदानावर प्रकाश टाकला. त्यांचे शिक्षण अल्प असले तरी बुद्धी चाणाक्ष होती व त्यांना वर्तमानाचे भान होते. कस्तुरबाचे पतिव्रत अंधश्रद्ध नव्हते तर त्यांनी अनुभवातून डोळसपणे गांधीजींना स्वीकारले व त्यांच्या देशसेवेत सहभाग घेतला. कस्तुरबा गेल्यानंतर माझ्या जीवनात पोकळी निर्माण झाल्याचे गांधीजींनी नमूद केले होते. गांधीजींच्या जीवनात कस्तुरबा या खरोखर कस्तुरीसारख्या होत्या. मात्र त्यांच्या कार्याची हवी तशी दखल घेतली गेली नाही व गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वात त्यांचे कार्य झाकोळल्या गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. वर्षानुवर्ष धार्मिक ग्रंथाचे पारायण करण्यापेक्षा कस्तुरबाच्या जीवनकार्याचे वाचन होईल अशा कार्यक्रमाची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे संचालन डॉ. अनिल वाघ यांनी केले.

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक