शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

मानसिक आरोग्य; लॉकडाऊन संपता संपता ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 20:51 IST

भारतीय मनोविकार संस्थेने असे निरिक्षण नोंदवले आहे की लॉकडाऊन सुरू झाल्याझाल्या अवघ्या आठवड्याच्या कालावधीत भारतात मनोविकार झालेल्या रुग्णांच्या संख्येत वीस टक्के वाढ झाली आहे.

ठळक मुद्देभारत सरकारच्या राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम या उपक्रमात लैंगिकता व प्रजनन या बाबींच्या पलिकडे जाऊन आता या दृष्टीने काही फेरबदल होताना दिसत आहेत. यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यापासून समुपदेशक, सुविधांसह समुपदेशन तसेच सामाजिक व वर्तनातील बदल अशा मुद्द

डॉ. नटचंद्र मनोहर चिमोटेनागपूरजेव्हा २५ मार्च २०२० रोजी १३० करोड अशा महाकाय लोकसंख्या असलेल्या भारतात लॉकडाऊन सुरु झाले तेव्हा जगातील सर्वात मोठ्या कंटेनमेंट (प्रतिबंधननिती) प्रयोगाची सुरवात झाली. कां? तर भयप्रद रितीने वाढणा-या कोरोना विषाणूच्या प्रसाराचा उंचावणारा आलेख खाली आणून तो सपाट करण्यासाठी. बहात्तर दिवसांनी लॉकडाऊन हळूहळू उठवला जात असतानाच आणखी एका नवीन रोगाची साथ जन्माला येत आहे. भारतीय मनोविकार संस्थेने असे निरिक्षण नोंदवले आहे की लॉकडाऊन सुरू झाल्याझाल्या अवघ्या आठवड्याच्या कालावधीत भारतात मनोविकार झालेल्या रुग्णांच्या संख्येत वीस टक्के वाढ झाली आहे.येत्या काही आठवडे वा महिन्यांमध्ये बेरोजगारी, दारुच्या नशेतले वाईट वर्तन, आर्थिक फरफट, घरगुती भांडणे व हिंसाचार आणि कर्जबाजारीपणा अशा विविध मानसिक अस्वास्थ्य व संकटांच्या पेचप्रसंगाला भारतीय समाजव्यवस्थेला सामोरे जायला लागणार आहे.आधीच अस्तित्वात असलेल्या पंधरा (१५) करोड मनोविकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या व्यतिरिक्त, कोरोनाबाधेतून बरे झालेले, आघाडीवर लढणारे वैद्यकीय व प्रशासनिक कोरोना योद्धे, तरूण माणसे, अकुशल कामगार, स्त्रिया, असंघटित क्षेत्रातील मजूर आणि वडिलधा-या वयोगटातील वृद्ध लोकं हे मानसिक अनारोग्याचे शिकार बनू शकतात असे आत्महत्या रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेल्सन मोझेस या आघाडीच्या वकिलाचे म्हणणे आहे.मानसिक आरोग्य सांभाळणारी सरकारी यंत्रणा आताच इतकी तोकडी पडत आहे तर कोरोनोत्तर काळात या समस्या पेलताना ती केव्हाही कोलमडू शकते. याचे निराकरण करण्यासाठी स्थानिक समाजाच्या उपजत सामर्थ्याचा टेकू घेऊन सप्रमाण सिद्ध झालेले उपाय योजणे आवश्यक आहे. याचे तीन मार्ग आहेत.

कोरोनाबाधेचा कलंक पुसणेकोव्हीड १९ हा विषाणूचा रोग नेमका कशामुळे पसरतो वा फैलावतो व तो मानवाच्या शरीरावर कसा हल्ला करतो याबद्दल आपल्या समाजात प्रचंड गैरसमज व चुकीच्या धारणा असल्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण समाजावर कलंक आहे असे समजले जात आहे. कोरोना संकटाविरुद्ध लढणा-या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, परिचारिका व वॉर्ड बॉईज व प्रशासकीय कर्मचारी आणि महत्वाचे म्हणजे पोलीस यंत्रणा या आघाडीवर लढणा-या योद्ध्यांना ते राहात असलेल्या इमारतींमधून त्यांचेच शेजारी त्यांच्याच घरातून हुसकावून लावत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकत आहेत.हे सर्व टाळण्यासाठी सामाजिक / शारीरिक अंतर ( सोशल डिस्टन्सिंग) संबंधीच्या संकल्पनांची संपूर्णपणे नव्याने पुनर्बांधणी करावी लागेल. काही पूर्णपणे बरे झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांनी अलिकडे समाज माध्यमांमध्ये आपले अनुभव वाटण्याची बाब खरोखरच खूप उत्साहवर्धक आहे. यामुळे इतर लोकांमध्ये कोरोना विरुद्ध सामना करण्याचा आत्मविश्वास निर्माण होतोय. जर, असे बरे झालेल्या कोरोनावर मात करणा-या हजारो लोकांना प्रशिक्षित करुन त्यांना इतर लोकांसमोर म्हणजे ज्यांना कोरोना बाधा होण्याची भीती वाटते किंवा जे संशयित रुग्ण आहेत, त्याच्या समोर कोरोना विजेते म्हणुन मित्राच्या स्वरुपात आले तर, तो फार मोठा मानसिक आधार ठरेल.

समाजातील पायाभूत सुविधांचा आधार वाढविणेकोरोनाची टिपेला पोहोचलेली तीव्रता जशी कमी होऊ लागेल तशी काही काळ गेल्यावर स्थानिक पातळींवर मानसिक आरोग्याच्या मुद्द्यांची हाताळणी करण्यासाठी सामाजिक यंत्रणा उभी करण्याची खरी निकड निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासनाच्या देखरेखीत निरिक्षक समुपदेशकांची (काऊन्सेलर) च्या लहानशा चमूला डॉ. विक्रम पटेल याच्या संगत किंवा मानसिक आरोग्यविषयक कायदे व धोरण मंडळाच्या आत्मियता सारख्या संस्थांमध्ये प्रशिक्षिण देऊन तयार करणे हे पहिले पाऊल ठरावे.

पौगंडावस्था व किशोरावस्थेतील मुलांमध्ये आनंदी वृत्ती निर्माण करणे गेले अडीच महिन्याहून अधिक काळ भारतातील २६ करोड (सव्वीस) शाळकरी मुले शैक्षणिक संस्था पूर्णपणे बंद असल्यामुळे घरातच तुरुंगवास भोगताहेत. त्यांची वैयक्तिक मोकळीक वा अवकाश आक्रसून गेला आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या मित्र मैत्रिणींपासून ते दुरावले गेले आहेत. भयंकर वेगाने फैलावणा-या विषाणुमुळे त्यांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. ध्यानीमनी नसताना उद्भवलेल्या अशा वातावरणात मुलांची संपूर्ण पिढी वाढत आहे. त्यांना अकल्पित भवितव्याची उत्तरे स्पष्टपणे मिळत नाहीये. यातून जगाविषयी त्यांचा दृष्टीकोन कसा असेल हा गहन प्रश्न निर्माण झाला आहे.पौगंडावस्थेतील मुलांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्याची चुक केली तर मोठ्या अरिष्टाला आमंत्रण देण्यासारखे आहे. युनिसेफ या जागतिक संघटनेने नमुद करुन ठेवले आहे की या मुलांच्या समस्येत फार मोठी गुंतवणूक असणार नाही पण त्याकडे दुर्लक्ष केले तर मात्र मुलांच्या व तरुणाईच्या मानसिक अनारोग्याचे दुष्परिणाम आताच्या कोव्हीड १९ महामारीच्या आरोग्य आणि आर्थिक परिणामांपेक्षा महाभयंकर असतील आणि ते दीर्घकालीन असतील यांत शंकाच नाही !

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस