शहरं
Join us  
Trending Stories
1
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
2
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
3
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
4
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
5
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्य तयार
6
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
7
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
8
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
9
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
10
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
11
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
12
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
13
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
14
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
15
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
16
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
17
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
18
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
19
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
20
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी

संवादाची दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:11 IST

- कोरोनाचा काळ पडतोय भारी : मेंटल स्ट्रेसमुळे वाढतोय ताणतणाव लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणापासून अनेक समस्यांना ...

- कोरोनाचा काळ पडतोय भारी : मेंटल स्ट्रेसमुळे वाढतोय ताणतणाव

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमणापासून अनेक समस्यांना प्रारंभ झाला आहे. अनेकांचा रोजगार गेला, व्यवसाय बुडाला आणि आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. जिथे आर्थिक गणिते कोलमडतात, तिथे व्यवहाराची घडी विस्कटायला लागते. यातून निर्माण होणाऱ्या ताणतणावातून कौटुंबिक सलोखाही लोप पावत असतो. अशा वेळी संवाद हे अत्यंत महत्त्वाचे औषध ठरते. त्यामुळे, कुठल्याही परिस्थितीत कौटुंबिक म्हणा वा व्यावहारिक पातळीवरील संवाद जपणे महत्त्वाचे ठरते.

-----------

तणावाची लक्षणे

- अचानक राग येणे, नैराश्य, भीती वाटणे.

- पोटाचे विकार सुरू होणे. त्यात आम्ल वाढणे, बद्धकोष्ठता होणे, आतड्यांतील जळजळीचे विकार, हृदयात जळजळ होणे, वायूचे विकार.

- पाठदुखी, डोकेदुखी, जबड्यातील वेदना, अस्थिसंबंधतातील समस्या.

- उत्तेजित होणे, चक्कर येणे, खूप घाम येणे, हातपाय गारठणे, श्वसन समस्या, रक्तदाब वाढणे, हात-तळहाताला घाम येणे.

----------

अल्पकालीन तणावाची लक्षणे

- आक्रमकता, अधीरता, साधारणत: शत्रुत्वाची भावना, अंतरंगातील भीती.

- सगळ्यांची न संपणारी भीती, नकारात्मकता, अविश्वासाचा भाव.

- उच्च रक्तदाब, छातीत दुखणे, मायग्रेन, हृदयाच्या समस्या.

-----------

तीव्र लक्षणे

- सतत मूल्यांकन होत असल्याची भावना.

- पूर्णवेळ उत्कृष्ट दिसण्याचा प्रयत्न करणे.

- अनुभवत असलेल्या दीर्घकालीन तणावांची अनभिज्ञता.

- हृदयाचे आजार, हृदयरोगाचे झटके, कर्करोग होण्याच्या संभावनेत वृद्धी होणे.

- हिंसक व आत्महत्येची वृत्ती बळावणे.

- दीर्घकालीन तणावांमुळे गंभीररीत्या कोलमडणे.

----------

तणावावरील उपचार

तणावावर उपचार करणारी विशेष अशी कोणतीही औषधे नसली तरी निद्रानाश, भीती, नैराश्य, पोटाशी संबंधित आजारांवर औषधे दिली जाऊ शकतात. समुपदेशन किंवा संवाद हा महत्त्वाचा उपचार ठरतो. स्ट्रेस कमी करण्यासाठी योगासने, ॲक्युपंक्चर, अरोमाथेरपी महत्त्वाची भूमिका बजावतात. विशेष म्हणजे, तणावापासून मनाला डायव्हर्ट करण्यासाठी मनोरंजन उत्तम माध्यम ठरू शकते. सिनेमा बघणे, विनोदी कार्यक्रमाचा आनंद घेणे, गायन-वादन आदींमध्ये मन रमवणे.

-------------

भीती वाटणे, ही मानसिक तणावाची सुरुवात

मानसिक तणाव वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. जसे स्ट्रेस, एंग्झायटी, सिजोफेमिया आदी. या सर्वात प्रमुख लक्षण ही भीतीच असते. ती कोणत्याही प्रकारची असू शकते. आर्थिक गणित काेलमडले की व्यवसाय, कुटुंब कसे चालवायचे, हप्ते कसे भरायचे, भविष्य कसे असेल अशा अनेक संभावनेने तणावात वृद्धी होत जाते. त्यामुळे, जिथे समस्या असेल तिथे संवाद अत्यंत महत्त्वाचा ठरतो. तो कुटुंब म्हणा किंवा व्यावसायिक असो, संवाद साधा आणि मार्ग काढा आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

- डॉ. अविनाश जोशी, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ

............