शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

आठवणीतील निवडणूक; ४० हजार खर्च व्हायचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 14:01 IST

लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. विविध पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यासाठी तयार आहेत. मात्र एक काळ होता जेव्हा अवघ्या ४० हजार रुपयांत निवडणूक लढली जायची.

ठळक मुद्देनिवडणूक प्रचार स्वच्छता मोहिमेचे माध्यमप्रभात फेऱ्या निघायच्या

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. विविध पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यासाठी तयार आहेत. मात्र एक काळ होता जेव्हा अवघ्या ४० हजार रुपयांत निवडणूक लढली जायची. विशेष म्हणजे पन्नास साठच्या दशकात निवडणूक प्रचार हा स्वच्छता मोहिमेचे माध्यम असायचा.९० वर्षाचा टप्पा ओलांडलेले माजी आमदार यादवराव देवगडे यांना तो काळ आजही स्पष्टपणे आठवतो. १९५२ आणि १९५७ च्या पहिल्या दोन लोकसभा निवडणूकांवर स्वातंत्र्य संग्रामाचे प्रतिबिंब दिसून आले होते. दोन्ही निवडणूकांत कॉंग्रेसचाच विजय झाला होता. विरोधी पक्ष प्रभावी नव्हता. जनसंघ व हिंदू महासभेसोबतच समाजवादी जनाधार शोधण्याचा प्रयत्न करत होते. त्याकाळी आजसारखा दारू आणि पैशांचा खेळ होत नव्हता. सर्वोदय मंडळाचे कार्यकर्ता व गांधीवादी प्रभातफेरी काढून जनतेत जायचे. ते जेथून जायचे, तेथे स्वच्छता मोहीम राबविण्यात यायची. उमेदवारदेखील घरोघरी जाऊन जनसंपर्कावर भर देत असत. जर रस्त्यात प्रतिस्पर्धी उमेदवार भेटला तर त्याच्याशी आत्मियतेने संवाद व्हायचा. पक्षाच्या विचारधारेला जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भिंतीवर लिहिले जायचे. लाऊडस्पीकरचादेखील मोठ्या प्रमाणात वापर व्हायचा. मात्र थेट संपर्कावर जास्त भर असायचा. निवडणुकींचे चिन्ह असलेले बिल्ले वाटले जायचे व लहान मुलांमध्ये त्याचे प्रचंड आकर्षण होते, असे यादवराव देवगडे यांनी सांगितले.तिकीट तेव्हादेखील कापले जायचेपन्नासच्या दशकात यादवराव देवगडे सेवादलाचे कार्यकर्ता म्हणून शहराच्या राजकारणात सक्रिय होते. १९५७ मध्ये झालेल्या दुसऱ्या लोकसभा निवडणूकीदरम्यान तत्कालिन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्या नावाची शिफारस हायकमांडकडे केली होती. मात्र तिकीट अनसूयाबाई काळे यांना मिळाले होते. मला त्याचे अजिबात वाईट वाटले नव्हते. कॉंग्रेस कार्यकर्ता म्हणून मी मनाने पक्षाचे कार्य केले व काळे सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या, असे त्यांनी सांगितले. पक्षाने १९६७ साली पूर्व नागपुरातून तिकीट देऊन त्यांना विधानसभेत पोहोचविले. त्या वेळेत कॉंग्रेसच्या तिकीटावर विजय मिळाला होता, मात्र तेव्हा विदर्भवाद्यांचे प्रस्थ वाढले होते. १९६२ साली कॉंग्रेसला हरवत बापूजी अणे खासदार बनले होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक