शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
4
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
5
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
6
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
7
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
9
Viral Video: लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
10
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
11
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
12
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम
13
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
14
पैशाचा खेळ! ऑनलाईन सेलचं धक्कादायक सत्य; घाईत महागड्या वस्तुंची खरेदी, बेस्ट डील कोणती?
15
GST कपात व्यतिरिक्त नवीन गाडी घेताना १५ हजारांची करा बचत! खरेदी करण्यापूर्वी वापरा 'या' ५ स्मार्ट टिप्स!
16
इस्रायलवर भारताचे मोठे उपकार! १०० वर्षांनी समोर आलं 'हाइफा' शहराच्या इतिहासातील सत्य, काय घडलं?
17
जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय...
18
कपडे खराब होऊ नयेत..; पूरग्रस्त पाण्यात अन् खासदार बजरंग सोनवणे होडीवर, VIDEO व्हायरल
19
Rakhi Sawant : Video - "डोनाल्ड ट्रम्प माझे खरे वडील, मी तान्या मित्तलपेक्षा श्रीमंत..."; राखी सावंतचा मोठा दावा
20
लिस्टिंगसोबतच शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, पहिल्याच दिवशी मोठं नुकसान; लागलं लोअर सर्किट

आठवणीतील निवडणूक; ४० हजार खर्च व्हायचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 14:01 IST

लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. विविध पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यासाठी तयार आहेत. मात्र एक काळ होता जेव्हा अवघ्या ४० हजार रुपयांत निवडणूक लढली जायची.

ठळक मुद्देनिवडणूक प्रचार स्वच्छता मोहिमेचे माध्यमप्रभात फेऱ्या निघायच्या

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. विविध पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यासाठी तयार आहेत. मात्र एक काळ होता जेव्हा अवघ्या ४० हजार रुपयांत निवडणूक लढली जायची. विशेष म्हणजे पन्नास साठच्या दशकात निवडणूक प्रचार हा स्वच्छता मोहिमेचे माध्यम असायचा.९० वर्षाचा टप्पा ओलांडलेले माजी आमदार यादवराव देवगडे यांना तो काळ आजही स्पष्टपणे आठवतो. १९५२ आणि १९५७ च्या पहिल्या दोन लोकसभा निवडणूकांवर स्वातंत्र्य संग्रामाचे प्रतिबिंब दिसून आले होते. दोन्ही निवडणूकांत कॉंग्रेसचाच विजय झाला होता. विरोधी पक्ष प्रभावी नव्हता. जनसंघ व हिंदू महासभेसोबतच समाजवादी जनाधार शोधण्याचा प्रयत्न करत होते. त्याकाळी आजसारखा दारू आणि पैशांचा खेळ होत नव्हता. सर्वोदय मंडळाचे कार्यकर्ता व गांधीवादी प्रभातफेरी काढून जनतेत जायचे. ते जेथून जायचे, तेथे स्वच्छता मोहीम राबविण्यात यायची. उमेदवारदेखील घरोघरी जाऊन जनसंपर्कावर भर देत असत. जर रस्त्यात प्रतिस्पर्धी उमेदवार भेटला तर त्याच्याशी आत्मियतेने संवाद व्हायचा. पक्षाच्या विचारधारेला जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भिंतीवर लिहिले जायचे. लाऊडस्पीकरचादेखील मोठ्या प्रमाणात वापर व्हायचा. मात्र थेट संपर्कावर जास्त भर असायचा. निवडणुकींचे चिन्ह असलेले बिल्ले वाटले जायचे व लहान मुलांमध्ये त्याचे प्रचंड आकर्षण होते, असे यादवराव देवगडे यांनी सांगितले.तिकीट तेव्हादेखील कापले जायचेपन्नासच्या दशकात यादवराव देवगडे सेवादलाचे कार्यकर्ता म्हणून शहराच्या राजकारणात सक्रिय होते. १९५७ मध्ये झालेल्या दुसऱ्या लोकसभा निवडणूकीदरम्यान तत्कालिन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्या नावाची शिफारस हायकमांडकडे केली होती. मात्र तिकीट अनसूयाबाई काळे यांना मिळाले होते. मला त्याचे अजिबात वाईट वाटले नव्हते. कॉंग्रेस कार्यकर्ता म्हणून मी मनाने पक्षाचे कार्य केले व काळे सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या, असे त्यांनी सांगितले. पक्षाने १९६७ साली पूर्व नागपुरातून तिकीट देऊन त्यांना विधानसभेत पोहोचविले. त्या वेळेत कॉंग्रेसच्या तिकीटावर विजय मिळाला होता, मात्र तेव्हा विदर्भवाद्यांचे प्रस्थ वाढले होते. १९६२ साली कॉंग्रेसला हरवत बापूजी अणे खासदार बनले होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक