शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

आठवणीतील निवडणूक; ४० हजार खर्च व्हायचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 14:01 IST

लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. विविध पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यासाठी तयार आहेत. मात्र एक काळ होता जेव्हा अवघ्या ४० हजार रुपयांत निवडणूक लढली जायची.

ठळक मुद्देनिवडणूक प्रचार स्वच्छता मोहिमेचे माध्यमप्रभात फेऱ्या निघायच्या

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. विविध पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यासाठी तयार आहेत. मात्र एक काळ होता जेव्हा अवघ्या ४० हजार रुपयांत निवडणूक लढली जायची. विशेष म्हणजे पन्नास साठच्या दशकात निवडणूक प्रचार हा स्वच्छता मोहिमेचे माध्यम असायचा.९० वर्षाचा टप्पा ओलांडलेले माजी आमदार यादवराव देवगडे यांना तो काळ आजही स्पष्टपणे आठवतो. १९५२ आणि १९५७ च्या पहिल्या दोन लोकसभा निवडणूकांवर स्वातंत्र्य संग्रामाचे प्रतिबिंब दिसून आले होते. दोन्ही निवडणूकांत कॉंग्रेसचाच विजय झाला होता. विरोधी पक्ष प्रभावी नव्हता. जनसंघ व हिंदू महासभेसोबतच समाजवादी जनाधार शोधण्याचा प्रयत्न करत होते. त्याकाळी आजसारखा दारू आणि पैशांचा खेळ होत नव्हता. सर्वोदय मंडळाचे कार्यकर्ता व गांधीवादी प्रभातफेरी काढून जनतेत जायचे. ते जेथून जायचे, तेथे स्वच्छता मोहीम राबविण्यात यायची. उमेदवारदेखील घरोघरी जाऊन जनसंपर्कावर भर देत असत. जर रस्त्यात प्रतिस्पर्धी उमेदवार भेटला तर त्याच्याशी आत्मियतेने संवाद व्हायचा. पक्षाच्या विचारधारेला जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भिंतीवर लिहिले जायचे. लाऊडस्पीकरचादेखील मोठ्या प्रमाणात वापर व्हायचा. मात्र थेट संपर्कावर जास्त भर असायचा. निवडणुकींचे चिन्ह असलेले बिल्ले वाटले जायचे व लहान मुलांमध्ये त्याचे प्रचंड आकर्षण होते, असे यादवराव देवगडे यांनी सांगितले.तिकीट तेव्हादेखील कापले जायचेपन्नासच्या दशकात यादवराव देवगडे सेवादलाचे कार्यकर्ता म्हणून शहराच्या राजकारणात सक्रिय होते. १९५७ मध्ये झालेल्या दुसऱ्या लोकसभा निवडणूकीदरम्यान तत्कालिन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्या नावाची शिफारस हायकमांडकडे केली होती. मात्र तिकीट अनसूयाबाई काळे यांना मिळाले होते. मला त्याचे अजिबात वाईट वाटले नव्हते. कॉंग्रेस कार्यकर्ता म्हणून मी मनाने पक्षाचे कार्य केले व काळे सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या, असे त्यांनी सांगितले. पक्षाने १९६७ साली पूर्व नागपुरातून तिकीट देऊन त्यांना विधानसभेत पोहोचविले. त्या वेळेत कॉंग्रेसच्या तिकीटावर विजय मिळाला होता, मात्र तेव्हा विदर्भवाद्यांचे प्रस्थ वाढले होते. १९६२ साली कॉंग्रेसला हरवत बापूजी अणे खासदार बनले होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक