शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
4
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
5
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
6
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
7
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
8
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
9
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
10
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
11
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
12
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
13
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
14
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
15
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
16
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
17
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
18
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
19
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
20
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...

काश्मीरच्या हिंसाचारला मेहबुबा मुफ्ती आणि फारुक अब्दुल्ला हेच जबाबदार : मेजर गौरव आर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 21:53 IST

काश्मीरच्या हिंसाचाराला केवळ तेथील राजकीय नेते मेहबुबा मुफ्ती आणि फारुक अब्दुल्ला हेच जबाबदार आहेत. या हिंसाचारामुळे त्यांचा तिजोऱ्या भरत आहे. त्यांना तिथे कधीच शांतता नको आहे. काश्मीरबद्दलची देशाची ठोस पॉलिसी नसल्यामुळे हिंसाचाराचा ड्रामा वर्षानुवर्षे सुरू असल्याचे मत मेजर गौरव आर्य यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देदगडफेक करणाऱ्यांना मिळतात पैसे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काश्मीरच्या हिंसाचाराला केवळ तेथील राजकीय नेते मेहबुबा मुफ्ती आणि फारुक अब्दुल्ला हेच जबाबदार आहेत. या हिंसाचारामुळे त्यांचा तिजोऱ्या भरत आहे. त्यांना तिथे कधीच शांतता नको आहे. काश्मीरबद्दलची देशाची ठोस पॉलिसी नसल्यामुळे हिंसाचाराचा ड्रामा वर्षानुवर्षे सुरू असल्याचे मत मेजर गौरव आर्य यांनी व्यक्त केले.जम्मू काश्मीर स्टडी सर्कलद्वारे काश्मीर विलय दिवसानिमित्त मेजर गौरव आर्य यांच्या व्याख्यानाचे आयोजन मंगळवारी चिटणवीस सेंटर येथे करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष म्हणून मीरा खडक्कार व स्टडी सर्कलचे संचालक मनु नायर उपस्थित होते. यावेळी त्यांनी काश्मीरच्या अवस्थेवर भाष्य करीत, तिथे सुरू असलेल्या हिंसाचाराला तेथील नेतेच खतपाणी घालत असून हा निव्वळ पॉलिटिकल ड्रामा असल्याचे म्हणाले. काश्मीरच्या आतंकवादाबद्दल बोलताना ते म्हणाले की, १९८९ च्या सुमारास काश्मिरात पाकिस्ताना आतंकवाद फोफावला. त्यावेळी १० हजारावर आतंकवादी काश्मिरात शिरले होते. उघड्यावर एके-४७ व पाकिस्तानचा झेंडा फडकवित होते. त्यावेळी भारतीय सेनेने सरकारला एक डॉक्युमेंट पाठविले. सरकारने ते मान्य केल्यानंतर भारतीय सेनेने राष्ट्रीय रायफल सेना तयार करून पाठविली. या सेनेने आंतकवाद्यांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर दिले. राष्ट्रीय रायफ ल सेनेने तेव्हा दररोज शेकडो एन्काऊंटर काश्मिरात केले. आज तर काश्मिरात दीडशेही आंतकवादी नाहीत.त्यामुळे पाकिस्तानने तिथे आता इस्लामिक आयडॉलॉजी वापरणे सुरू केले आहे. काश्मिरात गेल्या १० वर्षात शेकडो मदरसे बनले आहे. यातून हिंसा शिकविली जात आहे. हिंसाचारासाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर सुरू आहे. हिंसाचारात दगडफेक, जाळपोळ करण्यात येते, त्यांना पैसे दिले जात आहे. काश्मिरातले हे दोन्ही नेते त्यास जबाबदार आहेत.भारत सरकारला काश्मीरचा आतंकवाद संपवायचा असेल तर राष्ट्रपती राजवट किमान १० ते १५ वर्षासाठी लावली पाहिजे. हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या मदरशांना, सोशल मीडियातून हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या यंत्रणांवर निर्बंध लावावे लागेल. सर्जिकल स्ट्राईक करून फायदा नाही, तर पाकिस्तानी सेनेवर जबर हल्ला करणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरMehbooba Muftiमेहबूबा मुफ्ती