शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
3
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
4
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
5
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
6
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
7
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
8
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
9
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
10
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
11
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
12
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
13
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
15
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
16
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
17
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
18
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
19
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
20
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

याकूबची कुटुंबीयांसोबत दर महिन्याला भेट

By admin | Updated: July 31, 2015 02:55 IST

१९९३ साली मुंबईत झालेल्या भीषण बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी म्हणून याकूब मेमन याच्याविरुद्ध दोष सिद्ध झाला होता.

आठ वर्षात अनेकदा घेतल्या भेटी : हॉटेल द्वारकात असायचा मुक्कामआनंद डेकाटे  नागपूर१९९३ साली मुंबईत झालेल्या भीषण बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी म्हणून याकूब मेमन याच्याविरुद्ध दोष सिद्ध झाला होता. गेल्या २२ वर्षांपासून तो तुरुंगात असून मागील आठ वर्षांपासून तो नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त होता. यादरम्यान त्याच्या कुटुंबीयांमध्ये भाऊ सुलेमान व उस्मान, पत्नी रेहान आणि मुलगी जुबेदा या नियमितपणे त्यांच्या भेटीला येत असत. महिन्यातून एकदा नागपूरला त्यांचा दौरा असायचाच. नागपुरात ते केवळ याकूबलाच भेटण्यासाठी येत होते. नागपुरात आले की, सीताबर्डीतील हॉटेल द्वारका येथे त्यांचा मुक्काम राहात होता. त्यामुळे या हॉटेलचे व्यवस्थापक रवी तेलमोरे यांच्याशी त्यांची चांगली ओळख झाली होती. त्यामुळे त्यांना कधीही नागपुरात यायचे झाल्यास ते रवी यांना फोन वरच बुकिंग करून घ्यायचे. एकाचवेळी सर्वजण येत नव्हते. कधी भाऊ तर कधी पत्नी अशी आळीपाळीने भेट घेतली जात होती. सकाळी आले की भेट घेऊन सायंकाळी निघून जायचे असा त्यांचा नित्यक्रम होता. त्यांच्या कुटुंबीयांपैकी सर्वांचा स्वभावसुद्धा सर्वसामान्यांप्रमाणेच होता. याकूबने नागपूरच्या तुरुंगात राहून आपला अभ्यासही सुरू ठेवला होता. जून महिन्यापर्यंत सर्व व्यवस्थित सुरू होते. याकूबचा ‘डेथ वॉरंट’ कुटुंबीयांना मिळाला आणि ते अस्वस्थ झाले. महिन्यातून एकदा येणारे वारंवार येऊ लागले. तेव्हापासून त्यांच्या स्वभावात विशेषत: सुलेमानच्या स्वभावात थोडा फरक पडला. ते शांत-शांत राहू लागले. हॉटेल द्वारकातील सूत्रांनुसार गेले दोन दिवस याकूबचे कुटुंबीय झोपले नाही. द्वारका हॉटेलमध्ये सुलेमान आणि उस्मान हे दोघेच होते. बुधवारी याकूबच्या फाशीवर निर्णय व्हायचा होता. सर्वोच्च न्यायालयात मध्यरात्री याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. पहाटे ४.४५ वाजेपर्यंत ती चालली. हा सर्व घटनाक्रम दोन्ही भाऊ हॉटेलच्या आपल्या खोलीत टीव्हीवर पाहात होते. त्या दिवशी ते झोपले नाही. सुलेमानने भोजन करण्यासही नकार दिला होता. परंतु व्यवस्थापक रवी यांनी आग्रह केल्यावर केवळ डाळ भात घेतला. पहाटे ८ वाजताच्या सुमारास दोघेही भाऊ हॉटेलबाहेर पडले आणि तुरुंगातून याकूबचा मृतदेह घेऊन मुंबईला रवाना झाले.स्कायलार्कमध्ये थांबले इतर नातलग दरम्यान, मुंबईवरून याकूबसाठी ५ ते ६ आप्तेष्ट आले होते. याकूब व उस्मान हे हॉटेल द्वारका येथे थांबले होते. याशिवाय शेख जाफर, शेख इर्शाद आणि अंसारी खलीद हे नातेवाईकही नागपुरात आले होते. ते तिघे सीए रोडवरील हॉटेल स्कायलार्क येथील ५०४ क्रमांकाच्या खोलीत थांबले होते. याशिवाय काही महिला नातेवाईक जाफरनगर येथील नातलगाकडे थांबल्याचेही सांगण्यात आले. अजब बंगल्याला दोन सुरक्षा रक्षकपोलीस आयुक्तांनी संत्रानगरीतील प्रसिद्ध मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला) येथे दोन सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. ही व्यवस्था तात्पुरती असून कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी राज्य शासनाला आठ आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका प्रलंबित आहे. मध्यवर्ती संग्रहालयात सोन्याचांदीचे अनेक मौल्यवान दागिने व पुरातन कलाकृती आहेत. असे असतानाही संग्रहालयात काहीच सुरक्षा व्यवस्था नाही. यामुळे संग्रहालयातील मौल्यवान कलाकृती धोक्यात आहेत. कधीही अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे ही बाब न्यायालयाच्या निदर्शनात आणून देण्यात आली होती. न्यायालयाने अजब बंगल्याच्या दूरवस्थेची स्वत:च दखल घेऊन जनहित याचिका दाखल केली आहे. अ‍ॅड. देवेंद्र चव्हाण न्यायालय मित्र आहेत.