शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नागपुरातील वैद्यकीय विद्यार्थी सर्वोच्च न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 10:23 IST

सर्वोच्च न्यायालयाने पदव्युत्तर पदवी वैद्यकीय अभ्यासक्रमातील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाचा कोटा (ईडब्ल्यूएस) रद्द करताना विविध निर्देश दिलेत. त्यात सुधारणा करण्यासाठी शहरातील काही वैद्यकीय विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये दोन अर्ज दाखल केले आहेत.

ठळक मुद्देईडब्ल्यूएस कोटा आदेशात सुधारणेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयाने पदव्युत्तर पदवी वैद्यकीय अभ्यासक्रमातील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाचा कोटा (ईडब्ल्यूएस) रद्द करताना विविध निर्देश दिलेत. त्यात सुधारणा करण्यासाठी शहरातील काही वैद्यकीय विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये दोन अर्ज दाखल केले आहेत.अर्जदारांमध्ये सागर सारडा, समीर देशमुख व इतरांचा समावेश आहे. महाविद्यालयाच्या पर्यायामध्ये बदल करण्याची व रद्द झालेल्या आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाच्या कोट्यातील जागांसाठी अर्ज करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती एका अर्जात करण्यात आली आहे. यापुढे वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशाविषयीची कोणतीही याचिका वा अर्ज कोणत्याही न्यायालयात ऐकला जाणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे. दुसऱ्या अर्जाद्वारे यावर स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. दोन्ही अर्जावर शुक्रवारी न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यांनी प्रकरणावरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली. दरम्यान, राज्य सरकारने दोन्ही अर्जांना विरोध केला. सर्वोच्च न्यायालयाने याविषयी आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे दोन्ही अर्जांवर सुनावणी घेता येणार नाही असे सरकारने सांगितले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय